शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

गोदाकाठ भागात नागरिकांकडून उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:01 IST

सायखेडा : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचे अनेक नागरिकांनी उल्लंघन केल्याचे चित्र गोदाकाठ भागात पहायला मिळाले. दिवसभर बाजारपेठा बंद असूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे लॉकडाऊन आहे की लोक जाणूनबुजून रस्त्यावर येतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसायखेडा येथील मेनरोडवर अनेक भाजी विक्रेते बसले आहेत.

सायखेडा : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचे अनेक नागरिकांनी उल्लंघन केल्याचे चित्र गोदाकाठ भागात पहायला मिळाले. दिवसभर बाजारपेठा बंद असूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे लॉकडाऊन आहे की लोक जाणूनबुजून रस्त्यावर येतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.गोदाकाठ भागात मागील चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. करंजगाव, चांदोरी, चापडगाव, औरंगपूर, म्हाळसाकोरे ही गावे प्रशासनाने या अगोदरच हाय प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. गावागावात प्रत्येक दिवसाला अनेक रुग्ण वाढत आहेत. काही गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेऊन जनता कर्फ्यू लागू केला आहे. मात्र, काही गावांनी शासनाने निश्चित केलेली आचारसंहिता देखील पायदळी तुडवली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.शासनाने अनेक व्यवसाय बंद असल्याचे घोषित करून देखील दुकानदार अर्धे शटर उघडून व्यवसाय करीत आहेत. तर काही ठिकाणी घरातच दुकान असल्यामुळे दोन्ही जोरात सुरू आहेत. बँका चालू असल्या तरी बँकेत कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसले नाही. काही ठिकाणी मास्कविना ग्राहक बँकेत दिसले. बँकेचा कोणताही कर्मचारी नियम पाळा असे सांगताना किंवा प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझर फवारणी करताना दिसले नाहीत.सायखेडा येथील मेनरोडवर अनेक भाजी विक्रेते बसले आहेत. त्याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. लोकांची नेहमीप्रमाणे गर्दी आहे. सायखेडा परिसरातील नागरिक मुख्य बाजारपेठ म्हणून सायखेडा येथे येतांना मात्र गर्दी करतात. त्याचे दुष्परिणाम स्थानिक लोकांना भोगावे लागतील अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.भेंडाळी, करंजगाव, चांदोरी, औरंगपूर या गावांनी स्वयंस्फूर्तीने सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला आहे. या गावातील आरोग्य व्यवसाय सोडले तर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत.इतर गावातील नागरिक कठोर निर्णय घ्यावा, लॉकडाऊन कडकडीत पाळून संसर्गाची साखळी तोडावी अशी मागणी करीत आहेत.कोट...भेंडाळी ग्रामपंचायत स्तरावर शासन निर्णय होण्याच्या अगोदर कडकडीत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दवाखाना आणि मेडिकल सोडली तर सर्व व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद केले आहेत. सहा दिवस गाव बंद असल्यामुळे संसर्गाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.- भारती खालकर,सरपंच भेंडाळी 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या