शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

गोदाकाठ भागात नागरिकांकडून उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:01 IST

सायखेडा : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचे अनेक नागरिकांनी उल्लंघन केल्याचे चित्र गोदाकाठ भागात पहायला मिळाले. दिवसभर बाजारपेठा बंद असूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे लॉकडाऊन आहे की लोक जाणूनबुजून रस्त्यावर येतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसायखेडा येथील मेनरोडवर अनेक भाजी विक्रेते बसले आहेत.

सायखेडा : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचे अनेक नागरिकांनी उल्लंघन केल्याचे चित्र गोदाकाठ भागात पहायला मिळाले. दिवसभर बाजारपेठा बंद असूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे लॉकडाऊन आहे की लोक जाणूनबुजून रस्त्यावर येतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.गोदाकाठ भागात मागील चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. करंजगाव, चांदोरी, चापडगाव, औरंगपूर, म्हाळसाकोरे ही गावे प्रशासनाने या अगोदरच हाय प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. गावागावात प्रत्येक दिवसाला अनेक रुग्ण वाढत आहेत. काही गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेऊन जनता कर्फ्यू लागू केला आहे. मात्र, काही गावांनी शासनाने निश्चित केलेली आचारसंहिता देखील पायदळी तुडवली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.शासनाने अनेक व्यवसाय बंद असल्याचे घोषित करून देखील दुकानदार अर्धे शटर उघडून व्यवसाय करीत आहेत. तर काही ठिकाणी घरातच दुकान असल्यामुळे दोन्ही जोरात सुरू आहेत. बँका चालू असल्या तरी बँकेत कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसले नाही. काही ठिकाणी मास्कविना ग्राहक बँकेत दिसले. बँकेचा कोणताही कर्मचारी नियम पाळा असे सांगताना किंवा प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझर फवारणी करताना दिसले नाहीत.सायखेडा येथील मेनरोडवर अनेक भाजी विक्रेते बसले आहेत. त्याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. लोकांची नेहमीप्रमाणे गर्दी आहे. सायखेडा परिसरातील नागरिक मुख्य बाजारपेठ म्हणून सायखेडा येथे येतांना मात्र गर्दी करतात. त्याचे दुष्परिणाम स्थानिक लोकांना भोगावे लागतील अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.भेंडाळी, करंजगाव, चांदोरी, औरंगपूर या गावांनी स्वयंस्फूर्तीने सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला आहे. या गावातील आरोग्य व्यवसाय सोडले तर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत.इतर गावातील नागरिक कठोर निर्णय घ्यावा, लॉकडाऊन कडकडीत पाळून संसर्गाची साखळी तोडावी अशी मागणी करीत आहेत.कोट...भेंडाळी ग्रामपंचायत स्तरावर शासन निर्णय होण्याच्या अगोदर कडकडीत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दवाखाना आणि मेडिकल सोडली तर सर्व व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद केले आहेत. सहा दिवस गाव बंद असल्यामुळे संसर्गाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.- भारती खालकर,सरपंच भेंडाळी 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या