शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 00:57 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय आहेर यांनी सांगितले.

ठळक मुद्देगावांना ऐन टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यात येईल.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय आहेर यांनी सांगितले.मुलवड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वळण सावरीचा माळ, उंबरघोडा, घोटबारी, काकडवळण आदी गावांमध्ये डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या गावातील पाणीटंचाई त्वरित दूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी आहेर यांना सिताराम चौधरी व त्यांच्या सहका-यांनी साकडे घातले आहे. तथापि, मुळवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ यांनी या गावांना पाणीटंचाई असल्याची कबूली देताना सांगितले, की अजून पाण्याचे स्त्रोत सहसा आटले नसले तरी ऐन रणरणत्या उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत झपाट्याने कमी होत गेले तर त्यावेळी काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला. त्यापेक्षा सध्या या राखीव असलेल्या विहीरीवरुन पंपिंगद्वारे वळण चौरापाडा, काकडवळण, घोटबारी, उंबरघोडा आदी गावांना ऐन टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे तालुक्यात इतरत्र पाणीटंचाई भासत असल्यास दीड-दोन किलोमीटर परिसरातून पाणी आणून ती समस्या सोडविता येते, असेही परस्परविरोधी सूर ऐकावयास मिळत आहेत.प्रत्येक गावात पाण्याचे स्त्रोत आहेत, परंतु वास्तवात टंचाई परिस्थिती नाही. मात्र मार्च, एप्रिल, मे व जूनमध्ये टंचाई भासेल तेव्हा मुलवड वळण रस्त्यावरील विहीरीवर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पाईपलाईन टाकून मोटारद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आम्ही ठरविले आहे. आताच या विहीरीचा उपसा केला तर खरोखरच्या टंचाई काळात पाणी कुठून आणायचे?- संजय आहेर, ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत