शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

विरगावी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 15:45 IST

सटाणा/विरगाव : प्रलंबित केळझर चारी क्र मांक आठच्या कामास तात्काळ सुरु वात व्हावी यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकºयांनी शहादा - शिर्डी राष्ट्रीय महामार्ग विरगाव (ता.बागलाण) येथे सुमारे एक तास अडवून ठिय्या आंदोलन केले.

सटाणा/विरगाव : प्रलंबित केळझर चारी क्र मांक आठच्या कामास तात्काळ सुरु वात व्हावी यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकºयांनी शहादा - शिर्डी राष्ट्रीय महामार्ग विरगाव (ता.बागलाण) येथे सुमारे एक तास अडवून ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत महामार्गावरून हलणार नाहीत अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र यावेळी खासदार सुभाष भामरे यांच्या वतीने डॉ. शेषराव पाटील यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकारी वर्गासमवेत आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या कामात असलेल्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच ३० सप्टेंबरच्या आत कोणत्याही परिस्थितीत चारीच्या कामास सुरु वात करण्याबाबत ठोस लेखी आश्वासन शेतकरी वर्गाला दिल्यानंतर अखेर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सन १९९९ साली युती शासनाच्या कालावधीत डोंगरेज ते मूळाणे या ११ किमी लांबीच्या चारी क्र ं आठच्या कामास सुधारित मान्यता प्राप्त झाली आहे. या चारीसाठी सुमारे अडीच कोटींचा निधी मंजूर होऊन यातून या चारीचे सुमारे साठ टक्के कामही मार्गी लागले आहे. मात्र गत दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत उर्वरित कामासाठी शासन पातळीवरून भरीव निधीच उपलब्ध होत नसल्याने हे काम सद्यस्थितीत प्रलंबित अवस्थेत पडून आहे. सदर काम तात्काळ चालू व्हावे यासाठी या गावातील शेतकरीवर्गाने अनेक वेळा एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनास वारंवार निवेदनही दिले आहेत. मात्र यानंतर ही ढिम्म प्रशासन तसूभरही हालत नसल्याने या गावांतील जनतेने अखेर स्वातंत्रिदनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात विरगाव, डोंगरेज, भंडारपाडे, वनोली, तरसाळी, औंदाणे, कौतीकपाडे, भाक्षी, मूळाने, चौगाव, रातीर, सुराणे, देवळाणे, वायगाव या गावातील शेकडोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर या शेकडो आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सुमारे एक तास आंदोलनकर्त्यांनी हा महामार्ग अडवून धरल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत चारीचे काम चालू झालेच पाहिजे, काम चालू होईपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही, काम चालू करण्याचे लेखी आश्वासन मिळावे, आमदार व खासदार यांनी आंदोलनस्थळी येऊन या कामात असलेल्या अडीअडचणी व प्रगती जनतेला सांगावी यासाठी आंदोलनकर्ते अडून बसल्याने व या कालावधीत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने हे आंदोलन चिघळण्याची स्थिती निर्माण झाली होती. यातच या आंदोलनकर्त्यांना आश्वासन देण्यासाठी तब्बल एक तास कोणताही शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी सामोरे न गेल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

टॅग्स :Nashikनाशिक