शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ग्रामस्थांची वीज वितरण कंपनीवर नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:40 IST

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून होत असून यामुळे ग्रामस्थ वीज वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल रोष निर्माण होत आहे.

ठळक मुद्देवीज अभियंत्यांना निवेदने देऊनही कुठलाच निर्णय नाही

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून होत असून यामुळे ग्रामस्थ वीज वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल रोष निर्माण होत आहे.परिसरात अजून दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेक ऑनलाईन कामांना देखील अडचण निर्माण होत आहे. हा विद्युत पुरवठा सात ते आठ गावान जोडल्यापासून जास्त खंडीत होत असल्याचा ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूर्वी आराई, जुनी शेमळी, नवी शेमळी या तीन गाव आर आणि गावठाणला होते त्याच पद्धतीने विद्युत पुरवठा करून तिन्ही गावांची होणारी गैरसोय विद्युत महामंडळाने लवकरच पूर्ववत करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.जुनी शेमळी ग्रामपंचायतीचे वतीने निवेदन देऊन देखील यामध्ये फेरबदल न झाल्यामुळे येणाऱ्या काळात विद्युत महामंडळातील अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा आराईच्या सरपंच मनीषा आहिरे, जुनी शेमळीच्या सरपंच वैशाली शेलार, नवी शेमळीच्या सरपंच सीमा बधान व तिन्ही गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.एवढ्या आठ दिवसात जर विद्युत महामंडळाने पहिल्यासारखा विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेचे गटप्रमुख कैलास खैरनार यांनी पुण्यनगरी शी बोलताना सांगितले. गेल्या अनेक दिवसापासून गावातील विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे संपूर्ण गावामध्ये अंधाराचे साम्राज्य असते यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील वाढू शकते. रात्रीच्या वेळेस बाहेर निघण्यासाठी महिलावर्ग घाबरतात, गावातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून होणारी अडचण दूर करावी.जुनी शेमळी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून आराई गावठाणला आठ गाव जोडला असून या गावांमध्ये विजेची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास सर्व गावांचा वीज पुरवठा खंडित होतो. यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांना गेल्या दोन वर्षापासून दोन वेळा निवेदन देऊन हा प्रश्न सोडवला जात नाही. या विषयावर मार्ग निघाला नाही तर वीज बिल न भरण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थ मिळवून घेऊ.- अमोल बच्छाव, माजी सरपंच, जुनी शेमळी.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज