शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांची वीज वितरण कंपनीवर नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:40 IST

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून होत असून यामुळे ग्रामस्थ वीज वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल रोष निर्माण होत आहे.

ठळक मुद्देवीज अभियंत्यांना निवेदने देऊनही कुठलाच निर्णय नाही

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून होत असून यामुळे ग्रामस्थ वीज वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल रोष निर्माण होत आहे.परिसरात अजून दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेक ऑनलाईन कामांना देखील अडचण निर्माण होत आहे. हा विद्युत पुरवठा सात ते आठ गावान जोडल्यापासून जास्त खंडीत होत असल्याचा ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूर्वी आराई, जुनी शेमळी, नवी शेमळी या तीन गाव आर आणि गावठाणला होते त्याच पद्धतीने विद्युत पुरवठा करून तिन्ही गावांची होणारी गैरसोय विद्युत महामंडळाने लवकरच पूर्ववत करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.जुनी शेमळी ग्रामपंचायतीचे वतीने निवेदन देऊन देखील यामध्ये फेरबदल न झाल्यामुळे येणाऱ्या काळात विद्युत महामंडळातील अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा आराईच्या सरपंच मनीषा आहिरे, जुनी शेमळीच्या सरपंच वैशाली शेलार, नवी शेमळीच्या सरपंच सीमा बधान व तिन्ही गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.एवढ्या आठ दिवसात जर विद्युत महामंडळाने पहिल्यासारखा विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेचे गटप्रमुख कैलास खैरनार यांनी पुण्यनगरी शी बोलताना सांगितले. गेल्या अनेक दिवसापासून गावातील विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे संपूर्ण गावामध्ये अंधाराचे साम्राज्य असते यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील वाढू शकते. रात्रीच्या वेळेस बाहेर निघण्यासाठी महिलावर्ग घाबरतात, गावातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून होणारी अडचण दूर करावी.जुनी शेमळी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून आराई गावठाणला आठ गाव जोडला असून या गावांमध्ये विजेची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास सर्व गावांचा वीज पुरवठा खंडित होतो. यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांना गेल्या दोन वर्षापासून दोन वेळा निवेदन देऊन हा प्रश्न सोडवला जात नाही. या विषयावर मार्ग निघाला नाही तर वीज बिल न भरण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थ मिळवून घेऊ.- अमोल बच्छाव, माजी सरपंच, जुनी शेमळी.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज