शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांची वीज वितरण कंपनीवर नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:40 IST

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून होत असून यामुळे ग्रामस्थ वीज वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल रोष निर्माण होत आहे.

ठळक मुद्देवीज अभियंत्यांना निवेदने देऊनही कुठलाच निर्णय नाही

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून होत असून यामुळे ग्रामस्थ वीज वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल रोष निर्माण होत आहे.परिसरात अजून दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेक ऑनलाईन कामांना देखील अडचण निर्माण होत आहे. हा विद्युत पुरवठा सात ते आठ गावान जोडल्यापासून जास्त खंडीत होत असल्याचा ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूर्वी आराई, जुनी शेमळी, नवी शेमळी या तीन गाव आर आणि गावठाणला होते त्याच पद्धतीने विद्युत पुरवठा करून तिन्ही गावांची होणारी गैरसोय विद्युत महामंडळाने लवकरच पूर्ववत करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.जुनी शेमळी ग्रामपंचायतीचे वतीने निवेदन देऊन देखील यामध्ये फेरबदल न झाल्यामुळे येणाऱ्या काळात विद्युत महामंडळातील अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा आराईच्या सरपंच मनीषा आहिरे, जुनी शेमळीच्या सरपंच वैशाली शेलार, नवी शेमळीच्या सरपंच सीमा बधान व तिन्ही गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.एवढ्या आठ दिवसात जर विद्युत महामंडळाने पहिल्यासारखा विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेचे गटप्रमुख कैलास खैरनार यांनी पुण्यनगरी शी बोलताना सांगितले. गेल्या अनेक दिवसापासून गावातील विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे संपूर्ण गावामध्ये अंधाराचे साम्राज्य असते यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील वाढू शकते. रात्रीच्या वेळेस बाहेर निघण्यासाठी महिलावर्ग घाबरतात, गावातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून होणारी अडचण दूर करावी.जुनी शेमळी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून आराई गावठाणला आठ गाव जोडला असून या गावांमध्ये विजेची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास सर्व गावांचा वीज पुरवठा खंडित होतो. यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांना गेल्या दोन वर्षापासून दोन वेळा निवेदन देऊन हा प्रश्न सोडवला जात नाही. या विषयावर मार्ग निघाला नाही तर वीज बिल न भरण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थ मिळवून घेऊ.- अमोल बच्छाव, माजी सरपंच, जुनी शेमळी.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज