शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
4
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
5
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
6
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
7
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
8
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
9
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
10
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
11
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
12
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
13
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
14
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
15
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
16
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
17
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
18
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
20
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

जंगलातील पाण्याचे श्रोत आटल्याने ेबिबट्या पाण्याच्या शोधार्थ गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 6:13 PM

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरातील कसाड शिवारात बिबट्याचा उपद्रव वाढला असून काल रात्री बिबट्याने गिरणा नदी काठालगत असलेल्या कसाड मळा शिवारातील शेतकरी समाधान आहेर या शेतकºयाच्या घरालगत असलेल्या खळ्यातुन शेळी चा फडशा पाडून उसाच्या शेतात नेऊन फस्त केल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने गिरणा नदीकाठ लागून असलेल्या पिळकोस ग्रामस्थांनी बिबट्याचा मोठा धसका घेतला आहे. वनविभागाने बिबट्याला पिंजरा लाऊन जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देपिळकोस : शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले अनुभवाचे बोल

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरातील कसाड शिवारात बिबट्याचा उपद्रव वाढला असून काल रात्री बिबट्याने गिरणा नदी काठालगत असलेल्या कसाड मळा शिवारातील शेतकरी समाधान आहेर या शेतकºयाच्या घरालगत असलेल्या खळ्यातुन शेळी चा फडशा पाडून उसाच्या शेतात नेऊन फस्त केल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने गिरणा नदीकाठ लागून असलेल्या पिळकोस ग्रामस्थांनी बिबट्याचा मोठा धसका घेतला आहे. वनविभागाने बिबट्याला पिंजरा लाऊन जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.परिसरात बिबट्या येण्याचे प्रमाण हे दहा वर्षापासून वाढले असून आजवर या जंगलात पाणी मुबलक असल्याने बिबट्या हा पिळकोस येथील मेंगदर, फांगदर डोंगरातील जंगलात आढळून येत होता. परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने जंगलातील पाण्याचे श्रोत पूर्णपणे आटल्यामुळे बिबट्या हा पाण्याच्या शोधार्थ नदीकाठालाकडे आल्याचे यावेळी शेतकºयांकडून सांगण्यात आले. नदीकाठ परिसरात रात्रीच्या वेळेस परिसर हा बिबट्याच्या डर्काळ्यांनी दणाणून निघत असून शेतकरी, पशुपालक व शिवारातील वास्तव्यास असलेले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीमुळे आपले पशुधन वाचण्यासाठी रात्र जागून काढत आहेत.पिळकोस येथील गिरणाकाठच्या कसाड शिवारातील परिसरातील बिबट्या जेरबंद करणे अत्यंत गरजेचे झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.कळवण तालुक्यातील मोकभनिग, विसापूर, पांढरीपाडा, भादवण, पिळ्कोस, गांगवन, धनगरपाडा हि गावे चौरंगनाथ किल्ला व देवडोंगाराच्या पायथ्याजवळील गावे असून या गावांना बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. बिबट्यामुळे परिसरातील शेकडो पशुधनाचा आजवर फडशा पडला असून शेतकरी व पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे नुकसान झाले आहे. तरी संबंधित विभागाने परीसरात पिंजरा लावावा व परीसारतील बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी पशुपालक व शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.गावातील बहुतेक आदिवाशी बांधव हे वडिलोपार्जित शेळीपालन व्यवसाय करतात तर गावातील सर्व शेतकºयांकडे गाई, म्हशी, बैल, शेळ्या आदी जनावरे आहेत. बिबट्या कसाड परिसरात आढळून आल्याने गावातील शेळीपालन करणारे आदिवासी बांधव व शेतकरी धास्तावले असून वनविभागाने पशुधनाचा विचार करता त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे व ग्रामस्थांना दिलासा द्यावा.- सुनील मोतीराम जाधव,शेतकरी व पशुपालक, पिळकोस.