शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

२२३ गावात एक गाव, एक गणपती उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:10 AM

ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे.

येवला : ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. ग्रामीण पोलीस दलात गणेशोत्सव मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आली आहे. यासाठी दराडे व डॉ. खाडे यांनी येवल्यात, मनमाडला येऊन मंडळाची बैठका घेतल्या. प्रत्येक पोलीस ठाणे पातळीवर गणेश मंडळ, डॉल्बी मालकांचे प्रबोधन करण्यात आले. स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाºयांनीदेखील गावोगावी जनजागृती केली. अधीक्षक दराडे यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला बळ देण्यासाठी गावागावात ‘एक गाव, एक गणपती’चा पुरस्कार करीत हा उपक्र म गावागावांत पोहोचविण्यासाठी पोलीस दलावर जवाबदारी दिली, ती मनमाड उपविभागात यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘‘गावांतील जास्त गणपतीमुळे होणारे वाद,गुन्हे,गटबाजी थांबून गावातील सामाजिक एकोपा,सलोखा राखावा हि भूमिका घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी येवला,मनमाडला बैठका घेऊन आम्हांला प्रेरणा दिली सर्व पोलीस अधिकारी,पोलीस पाटलांच्या बैठका घेऊन तंटामुक्त गावे करण्यासाठी एकच गणपतीची स्थापना करून असे आवाहन केले.मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येवला,मनमाड,नांदगाव या तालुक्यात यंदा विक्र मी गावात हा उपक्र म राबवला आहे.अश्या आदर्श मंडळातून विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे मानकरी देखील निवडून त्यांना सन्मानित करणार आहोत.’’ -डॉ.राहुल खाडे,  पोलीस उपअधीक्षक,मनमाड उपविभागमनमाड पोलीस ठाण्याअंतर्गत १४३ लहान व मोठे मंडळ असून, १९ गावांत एक गाव, एक गणपती संकल्पना राबविली आहे. नांदगावमध्ये ८८ मंडळांपैकी ५० गावांत, चांदवडमध्ये ७४ मंडळांपैकी ३९ गावात ही संकल्पना राबविली गेली आहे. येवला शहर हद्दीतील छोटी-मोठी १३७ मंडळे असून, १९ गावांत तर येवला तालुक्यात तब्बल ७० गावांत एक गणपतीची स्थापना झाली आहे. वडनेरभैरव ठाणे अंतर्गत २६ गावात एक गणपती आहे. म्हणजेच नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांचे हे विक्र मी यश मानले जात आहे. विशेष म्हणजे २०१६ मध्ये हाच आकडा फक्त ७७ तर २०१४ व २०१५ मध्ये ७० च्या आसपास होता. या आकड्यानुसार येवला तालुक्यात सर्वाधिक ८९ ,नांदगाव तालुक्यात ६९ तर चांदवड तालुक्यात ६५ गावांत हि संकल्पना यशस्वी झाली असल्याचे मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.राहुल खाडे यांनी सांगितले.