शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहू’ रिफाईन्ड शुगर बनविणार विक्रमसिंह घाटगे

By admin | Updated: October 16, 2014 22:50 IST

शाहू साखर कारखान्याचा ३५ वा बॉयलर प्रदीपन समारंभ

कागल : देशामध्ये साखर आणि ऊस उत्पादन भरपूर झाले आहे. साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाला आहे. साखरेचा ग्राहकही चोखंदळ बनला आहे. म्हणून छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना रिफाईन्ड शुगर बनविणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी दिली. शाहू साखर कारखान्याचा ३५ वा बॉयलर प्रदीपन समारंभ विक्रमसिंह घाटगे आणि सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते विधीवत करण्यात आला. यावेळी समरजितसिंह घाटगे, नवोदितादेवी घाटगे प्रमुख उपस्थित होते. विक्रमसिंह घाटगे म्हणाले, सोलापूर, पुणे विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस प्रचंड असल्याने गळीत हंगाम तेथे सुरू झाला आहे. आपणही लवकरच हंगाम सुरू करूया. वीज प्रकल्पाचे कर्ज फिटत आले आहे. बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती करण्याचाही विचार आहे. वार्षिक सभेत जाहीर केल्याप्रमाणे दसरा-दिवाळीसाठी १५० रुपयांचा उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. देशात सध्या ६५ लाख क्विंटल, तर राज्यात २५ लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. शाहू साखर कारखान्यातही २ लाख ५५ हजार ७३७ क्विंटल साखर शिल्लक आहे. कारखान्याने १ लाख ५९ हजार ९०० क्विंटल साखर निर्यात केलेली आहे. चालू हंगामात ८ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण करूया. कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे म्हणाले, नवीन-नवीन साखर कारखान्यांची भर पडत आहे. आपल्या कारखान्याकडे पुरेसा ऊस आहे. मात्र, आठ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम वेळेवर सुरू झाला पाहिजे, याची दक्षता घेऊया. कार्यकारी संचालक विजय औताडे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, कागलच्या उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, कागल बॅँकेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, शाहू कृषी संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खराडे, सुनील सूर्यवंशी, बाळ पाटील, दत्तामामा, खराडे, नम्रता कुलकर्णी, शाहू साखरचे सर्व संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी) पहिला हप्ता २५३० विक्रमसिंह घाटगे म्हणाले, शाहू साखर कारखान्याची एफ.आर.पी. २४०० च्या पुढे पोहोचली आहे. चालू वर्षी कारखान्याला २५३० इतकी एफ.आर.पी. बसली आहे. ती द्यावीच लागते. त्यामुळे आता हंगामाची लवकरच सुरुवात करूया.