शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

ग्रामपंचायतीपासून युनेस्कोपर्यंतची माहिती असणारा लोकनेता, गावागावात 'ईडी'चीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 16:39 IST

शरद पवार यांची ‘लोकनेता’ ही ओळखच लोकसंग्रहातून झाली आहे.

-  संजय पाठक

नाशिक : शरद पवार! राजकारणातील दिग्गज नेतृत्व! मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदे भुषवलेली! जिल्ह्यावर प्रेम असलेल्या या नेत्याने नाशिककरांवर अतोनात प्रेम केले तसेच नाशिककरांनीदेखील अलोट प्रेम केलं. १९८५ मध्ये जिल्ह्यातील पंधराच्या पंधरा आमदार निवडून शरद पवार यांच्या पुलोद प्रयोगाला साथ दिली. काळ बदलला, राजकारणाची कूस बदलली तरी शरद पवार यांचे जिल्ह्याशी असलेले स्नेहसंबंध कधी दुरावले नाही. म्हणून शिखर बॅँक प्रकरणात शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यांनतर जे जे वातावरण बदलले, त्यात नाशिकमधील ग्रामीण भागात या घडामोडींचा परिणाम जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शरद पवार यांची ‘लोकनेता’ ही ओळखच लोकसंग्रहातून झाली आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर पवार यांना भेटणाऱ्यांची रीघ लागते. त्यात तरुणांबरोबरच ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक असते. पवार साहेब आले म्हणजे आपण भेटावं आणि संवाद साधावा एवढीच माफक अपेक्षा त्यात असते. शरद पवार हेदेखील चांगदेवराव, यंदा कांदा काय म्हणतो? लासलगाव बाजार समिती काय म्हणते किंवा यावेळी द्राक्षाकडे लक्ष घालायला उशीर केला का शेतकºयांनी, असे विचारून त्यांच्याशी जवळीक साधतात. भर गर्दीत उभे असलेले श्रीराम शेटे असो अथवा येवल्याचे मारोतराव पवार असो, शरद पवार यांनी त्यांचे नाव घेऊन वास्तपुस्त केली की, ते सुद्धा भरून पावतात.

जिल्ह्यातील कसबे सुकेण्याच्या ग्रामपंचायतीपासून युनोस्कोपर्यंतची सर्व ताजी माहिती असणा-या पवार यांनी जिल्ह्यातील वर्तमानस्थिती विषयी काही विषय काढून त्यांच्याकडील अद्ययावत माहिती सांगितली की, सारेच थक्क होतात. पवार यांचे नेटवर्कच इतके तगडे आहे. परवाकडे नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची मते अजमावणीसाठी आलेल्या शरद पवार यांनी बागलाण तालुक्यातील आमदाराला शिवसेनेत जाणार की येथे राहणार हे स्पष्ट सांगा आमच्याकडे दुसरे अनेक इच्छुक आहेत, असे सांगून एकेक इच्छुकांची नात्यागोत्यासहीत नावे सांगितल्याने आमदार महोदया थक्क झाल्या नसतील तर नवलच!

नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज असो किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ किंवा कुसुमाग्रज प्रतिष्ठान. पवार साहेबांचा संबंध अशा शेकडो संस्थांशी कायम राहिला. नाशिक जिल्हा शेतीत प्रयोगशील असल्याने येथे शेती वाढावी, कृषी आधारित उद्योग वाढावे हा त्यांचा आग्रह. त्यावर मतमतांतरे आक्षेप जरी असले तरी पवार यांच्याबरोबर राजकारणातील अनेक जण थकलेले असताना पवार मात्र त्यांच्या तिसºया पिढीचेदेखील नेतृत्व म्हणून लढत आहेत. नाशिक जिल्हा आता कधी काँगेसचा, कधी राष्ट्रवादीचा, तर कधी भाजप- सेनेचा जिल्हा मानला गेला असला तरी मुळात तो पवार यांचा जिल्हा म्हणूनच पुलोदच्या घटनेनंतर ओळखला गेला. शिखर बॅँक घोटाळ्याचा ठपका पवार यांच्यावर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या इतकाच धक्का नाशिक जिल्ह्यातील लाखो नागरिकांना बसला. पवार यांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ आणि यापूर्वी ग्रामीण भागातील पोहोचण्यासाठी असलेल्या सहकारी संस्था या सर्वांशीच संबंध! पवार यांनी सहकारी संस्था वाचविण्यासाठी वेळोवेळी धडपड केली आहे.

सार्वजनिक जीवनातील सुवर्ण महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये एका प्रकट मुलाखतीत काही वर्षांपूर्वी पवार यांनी युती सरकारच्या विरोधात आपण स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले होते आणि तेच आज ते करीत आहेत. राष्ट्रवादीतील पक्षांतरे आणि सोयीने वागणाºया नेत्यांची कमी होणारी साथ यानंतरदेखील पवार हे आज खंबीरपणे लढताना, ग्रामीण भागातील जनतेला आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, असे असताना पवार यांच्यावर झालेली कारवाई आणि कोणत्याही बॅँकेचे संचालक नसताना आपल्यावर कारवाई केल्याबद्दल पवार यांनी व्यक्त केलेली अनभिज्ञता यामुळे ग्रामीण भागात सहानुभूती तर आहेच परंतु यानिमित्ताने कार्यकर्तेदेखील पेटून उठले आहेत. त्याचे शक्तिप्रदर्शन लक्षात घेऊन थेट पोलीस यंत्रणेला आणि ईडीला माघार घेण्याची नामुष्की आली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले, आंदोलने होऊ दिली नाहीत. हे जरी खरे असले तरी त्याचे परिणाम या निवडणुकीत विशेषत: ग्रामीण भागात जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNashikनाशिक