शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीपासून युनेस्कोपर्यंतची माहिती असणारा लोकनेता, गावागावात 'ईडी'चीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 16:39 IST

शरद पवार यांची ‘लोकनेता’ ही ओळखच लोकसंग्रहातून झाली आहे.

-  संजय पाठक

नाशिक : शरद पवार! राजकारणातील दिग्गज नेतृत्व! मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदे भुषवलेली! जिल्ह्यावर प्रेम असलेल्या या नेत्याने नाशिककरांवर अतोनात प्रेम केले तसेच नाशिककरांनीदेखील अलोट प्रेम केलं. १९८५ मध्ये जिल्ह्यातील पंधराच्या पंधरा आमदार निवडून शरद पवार यांच्या पुलोद प्रयोगाला साथ दिली. काळ बदलला, राजकारणाची कूस बदलली तरी शरद पवार यांचे जिल्ह्याशी असलेले स्नेहसंबंध कधी दुरावले नाही. म्हणून शिखर बॅँक प्रकरणात शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यांनतर जे जे वातावरण बदलले, त्यात नाशिकमधील ग्रामीण भागात या घडामोडींचा परिणाम जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शरद पवार यांची ‘लोकनेता’ ही ओळखच लोकसंग्रहातून झाली आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर पवार यांना भेटणाऱ्यांची रीघ लागते. त्यात तरुणांबरोबरच ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक असते. पवार साहेब आले म्हणजे आपण भेटावं आणि संवाद साधावा एवढीच माफक अपेक्षा त्यात असते. शरद पवार हेदेखील चांगदेवराव, यंदा कांदा काय म्हणतो? लासलगाव बाजार समिती काय म्हणते किंवा यावेळी द्राक्षाकडे लक्ष घालायला उशीर केला का शेतकºयांनी, असे विचारून त्यांच्याशी जवळीक साधतात. भर गर्दीत उभे असलेले श्रीराम शेटे असो अथवा येवल्याचे मारोतराव पवार असो, शरद पवार यांनी त्यांचे नाव घेऊन वास्तपुस्त केली की, ते सुद्धा भरून पावतात.

जिल्ह्यातील कसबे सुकेण्याच्या ग्रामपंचायतीपासून युनोस्कोपर्यंतची सर्व ताजी माहिती असणा-या पवार यांनी जिल्ह्यातील वर्तमानस्थिती विषयी काही विषय काढून त्यांच्याकडील अद्ययावत माहिती सांगितली की, सारेच थक्क होतात. पवार यांचे नेटवर्कच इतके तगडे आहे. परवाकडे नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची मते अजमावणीसाठी आलेल्या शरद पवार यांनी बागलाण तालुक्यातील आमदाराला शिवसेनेत जाणार की येथे राहणार हे स्पष्ट सांगा आमच्याकडे दुसरे अनेक इच्छुक आहेत, असे सांगून एकेक इच्छुकांची नात्यागोत्यासहीत नावे सांगितल्याने आमदार महोदया थक्क झाल्या नसतील तर नवलच!

नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज असो किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ किंवा कुसुमाग्रज प्रतिष्ठान. पवार साहेबांचा संबंध अशा शेकडो संस्थांशी कायम राहिला. नाशिक जिल्हा शेतीत प्रयोगशील असल्याने येथे शेती वाढावी, कृषी आधारित उद्योग वाढावे हा त्यांचा आग्रह. त्यावर मतमतांतरे आक्षेप जरी असले तरी पवार यांच्याबरोबर राजकारणातील अनेक जण थकलेले असताना पवार मात्र त्यांच्या तिसºया पिढीचेदेखील नेतृत्व म्हणून लढत आहेत. नाशिक जिल्हा आता कधी काँगेसचा, कधी राष्ट्रवादीचा, तर कधी भाजप- सेनेचा जिल्हा मानला गेला असला तरी मुळात तो पवार यांचा जिल्हा म्हणूनच पुलोदच्या घटनेनंतर ओळखला गेला. शिखर बॅँक घोटाळ्याचा ठपका पवार यांच्यावर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या इतकाच धक्का नाशिक जिल्ह्यातील लाखो नागरिकांना बसला. पवार यांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ आणि यापूर्वी ग्रामीण भागातील पोहोचण्यासाठी असलेल्या सहकारी संस्था या सर्वांशीच संबंध! पवार यांनी सहकारी संस्था वाचविण्यासाठी वेळोवेळी धडपड केली आहे.

सार्वजनिक जीवनातील सुवर्ण महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये एका प्रकट मुलाखतीत काही वर्षांपूर्वी पवार यांनी युती सरकारच्या विरोधात आपण स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले होते आणि तेच आज ते करीत आहेत. राष्ट्रवादीतील पक्षांतरे आणि सोयीने वागणाºया नेत्यांची कमी होणारी साथ यानंतरदेखील पवार हे आज खंबीरपणे लढताना, ग्रामीण भागातील जनतेला आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, असे असताना पवार यांच्यावर झालेली कारवाई आणि कोणत्याही बॅँकेचे संचालक नसताना आपल्यावर कारवाई केल्याबद्दल पवार यांनी व्यक्त केलेली अनभिज्ञता यामुळे ग्रामीण भागात सहानुभूती तर आहेच परंतु यानिमित्ताने कार्यकर्तेदेखील पेटून उठले आहेत. त्याचे शक्तिप्रदर्शन लक्षात घेऊन थेट पोलीस यंत्रणेला आणि ईडीला माघार घेण्याची नामुष्की आली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले, आंदोलने होऊ दिली नाहीत. हे जरी खरे असले तरी त्याचे परिणाम या निवडणुकीत विशेषत: ग्रामीण भागात जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNashikनाशिक