शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

परसूल धरणात अत्यल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:07 IST

चिंतेत भर : चणकापूरमधून पाणी टाकण्याची मागणी

ठळक मुद्देचालूवर्षी तालुक्याच्या पूर्व भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण रिकामेच राहिले आहे

उमराणे : येथील ब्रिटिशकालीन परसूल धरणातील पाणीसाठा अत्यंत अल्प प्रमाणात शिल्लक राहिल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या धरणात चणकापुर कालव्याचे पाणी सोडण्यात यावे,अशी मागणी उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावातील सरपंच व ग्रामस्थांनी केली असून तसा ठरावही लोकप्रतिनिधींसह शासनाकडे पाठविण्यात आला आहे.उमराणे येथे १८८५ साली ब्रिटिशकालीन परसुल धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाण्यावर उमराणे येथील शेतीसाठीच्या आवर्तनासह परिसरातील तिसगाव, दहिवड, रामवाडी आदी गावांसाठी पेयजल योजना कार्यान्वित आहेत. परंतु चालूवर्षी तालुक्याच्या पूर्व भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण रिकामेच राहिले आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा बघता साधारणत: एक महिना पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याने आगामी काळात उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर होणार आहे. यावर उपाययोजना म्हणून चणकापूर धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे उमराणे येथील परसुल धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी प.स.सदस्य धर्मा देवरे, उमराणेच्या सरपंच लताबाई देवरे, गिरणारेचे उपसरपंच ईश्वर पाटील, खारीपाडाचे सरपंच कैलास अहिरे, तिसगावचे सरपंच दत्तू अहेर, कुंभार्डेच्या सरपंच प्रतिभा वाघ,चिंचवेचे सरपंच रविंद्र पवार, सांगवीचे सरपंच पंडित बस्ते, वर्हाळेच्या सरपंच सरला खैरणार आदिंसह नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Damधरण