शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

वातावरण बदलामुळे द्राक्षबागांवर किटकांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:23 IST

परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण यावर्षी अल्प राहिल्याने द्राक्षांना पुरेसे पाणी मिळणेही अवघड झाले आहे. एकूणच द्राक्ष बागायतदार वातावरण बदलाच्या या दुष्परिणामामुळे संकटात सापडल्याचे चित्र आहे.नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जात असल्याने वायनरींची संख्याही वाढली आहे. येथील वाइन, द्राक्षांना आंतरराष्टÑीय बाजारपेठेत मागणी आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांवर ‘संक्रांत’ आली आहे. वातावरण बदलामुळे आर्द्रता वाढत असल्याने द्राक्षांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्याने द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागल्याचे द्राक्ष उत्पादक मदन ढेरिंगे यांनी सांगितले. द्राक्षाचा मणी तयार होत असताना वातावरण बदल, मुबलक पाण्याच्या अभावामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. हिरवे तुडतुडे, अळीचे प्रमाण अधिक झाल्याने किटकनाशक फवारणी अधिक प्रमाणात शेतकºयांना करावी लागत आहे. जमिनीमध्ये पाण्याची पातळी घटल्याने द्राक्षांच्या घडाचा आकारही कमी राहत आहे. द्राक्षबागांमधील झाडांवर फळधारणाही कमी-जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम जाणवणार आहे.पावसाची हुलकावणीसप्टेंबर छाटणी शेतकºयांनी पावसाच्या भरवशावर केली; मात्र त्यानंतर पाऊस झाला नाही, परिणामी द्राक्ष उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. जानेवारीमध्ये या छाटणीचा माल बाजारात येईल त्यावेळी आवक जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी द्राक्षबागांमध्ये उत्पादनाच्या तफावतीमुळे त्याचा परिणाम आवकेवर निश्चित स्वरूपात होईल.

टॅग्स :TemperatureतापमानagricultureशेतीNashikनाशिक