शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वेळुंजेला भात लावणीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:23 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने व भातलावणीच्या रोपांना समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भातलावणीस सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देसमाधान : ग्रामीण भागात रोजगाराला मिळाली चालना

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने व भातलावणीच्या रोपांना समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भातलावणीस सुरुवात झाली आहे.गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजूरवर्गाची चांगली तारांबळ उडत होती. आता भात लावणीस सुरुवात झाल्याने हाताला काम मिळाल्याने मजूरवर्ग समाधान व्यक्त करीत आहे. कोरोनोच्या महाभयंकर महामारीतून कामधंद्यासाठी शहरात जायला ग्रामीण भागातून मजूरवर्ग तयार होत नव्हता, त्यामुळे मजूर कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले होते. आता गावातच रोजगार मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वाधिक भात, नागली, वरईसारखी प्रमुख पिके घेतली जातात. ऐन अवणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण असते. परिसरात भात लावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे किमान दोन महिने भात लावणीतून रोजगार उपलब्ध होणार आहे.

तीन महिन्यांपासून रोजगार नव्हता. पाऊस वेळेत पडल्याने भात लावणीस सुरुवात झाली. त्यामुळे काम मिळू लागल्याने हाती दोन पैसे मिळतील. कोरोनामुळे कुठेच जाता येत नव्हते. कामधंदे सर्व बंद होते. त्यामुळे रोजगार मिळत नव्हता. आता किमान तीन महिने रोजगार मिळणार आहे. त्याचे समाधान आहे.

- दशरथ काशीद, मजूर

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी