शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

रानभाज्या गावातच हिरमुसल्या; कोरोनामुळे मिळेना बाजारपेठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 15:02 IST

देवगाव : साधारण पावसाळा सुरू झाला की, निसर्ग हिरवाईचा शालू पांघरतो. सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. अशा वातावरणात अनेकांची पावले रानभाज्या खरेदीसाठी वळतात. ती थोडी महाग मिळते, पण हौसेला मोल नाही म्हणतात. या भाज्या लांब जंगलात जाऊन आणाव्या लागतात. पण,यंदा कोरोनाने सर्वांच्या आयुष्यात असा काही शिरकाव केला आहे, की तो जीवनच उद्ध्वस्त करून गेला. कालपर्यंत चांगल्या पगाराच्या नोकरीला असलेले आज बेरोजगार झाले. पावसाळ्यात रानभाज्या विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्या विकता न आल्याने आमचा आधारच हिरावून गेला, अशी भावना आदिवासींनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे लॉकडाऊनचा फटका : आदिवासी बांधव रोजगाराला मुकले

मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊन म्हणजे काय याची कल्पना या भोळ्याभाबड्यांना नसल्याने ते बेसावधच राहिले.जसेजसे दिवस जाऊ लागले, तसतशी लॉकडाऊनची कल्पना त्यांना येऊ लागली. मात्र, हिच स्थिती राहील हे त्यांना माहीत नव्हते. पावसाळ्याच्या सुरु वातीला व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जंगलात रानभाज्या उगवतात. या रानभाज्या गावागावांत, शहरी भागांत विकल्याने आदिवासी, कातकरी बांधवांना मोठा रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांच्या हातात चार पैसे येतात. त्यातून पावसाळ्याा त्यांना लागणाºया जीवनावश्यक वस्तू ते खरेदी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, यावर्षी उदरनिर्वाहाचा प्रश निर्माण झाला आहे. रानभाज्या आणून विकण्यासाठी त्यांना गावांत किंवा शहरात बाजारपेठच मिळाली नाही.स्थानिक ग्रामस्थांनीही कोरोनाच्या भितीपोटी आणलेल्या रानभाज्या विकत घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या टोपल्यातच सुकल्या. परिणामी, जे चार पैसे मिळायचे, तेही न मिळाल्याने आनंदावर विरजण पडले. यामुळे जीवन जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रानभाज्या विकल्या न गेल्याने रोजची समाधानाची भाकरी तर हिरावून गेलीच, पण खाऊची वाट पाहणारी लहान मुले, खाऊविनाच झोपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात पडल्याने अनेक रानभाज्या उगवल्याच नसल्याचे आदिवासी विक्र ेत्यांनी सांगितले. मात्र ज्या उगवल्या त्या कोरोनाच्या भितीपोटी विकल्या न गेल्याने घरातील अनेक जीवनावश्यक वस्तू घेता आल्या नाहीत याची खंत आदिवासी व्यक्त करतात.

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या