शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रानभाज्या गावातच हिरमुसल्या; कोरोनामुळे मिळेना बाजारपेठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 15:02 IST

देवगाव : साधारण पावसाळा सुरू झाला की, निसर्ग हिरवाईचा शालू पांघरतो. सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. अशा वातावरणात अनेकांची पावले रानभाज्या खरेदीसाठी वळतात. ती थोडी महाग मिळते, पण हौसेला मोल नाही म्हणतात. या भाज्या लांब जंगलात जाऊन आणाव्या लागतात. पण,यंदा कोरोनाने सर्वांच्या आयुष्यात असा काही शिरकाव केला आहे, की तो जीवनच उद्ध्वस्त करून गेला. कालपर्यंत चांगल्या पगाराच्या नोकरीला असलेले आज बेरोजगार झाले. पावसाळ्यात रानभाज्या विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्या विकता न आल्याने आमचा आधारच हिरावून गेला, अशी भावना आदिवासींनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे लॉकडाऊनचा फटका : आदिवासी बांधव रोजगाराला मुकले

मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊन म्हणजे काय याची कल्पना या भोळ्याभाबड्यांना नसल्याने ते बेसावधच राहिले.जसेजसे दिवस जाऊ लागले, तसतशी लॉकडाऊनची कल्पना त्यांना येऊ लागली. मात्र, हिच स्थिती राहील हे त्यांना माहीत नव्हते. पावसाळ्याच्या सुरु वातीला व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जंगलात रानभाज्या उगवतात. या रानभाज्या गावागावांत, शहरी भागांत विकल्याने आदिवासी, कातकरी बांधवांना मोठा रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांच्या हातात चार पैसे येतात. त्यातून पावसाळ्याा त्यांना लागणाºया जीवनावश्यक वस्तू ते खरेदी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, यावर्षी उदरनिर्वाहाचा प्रश निर्माण झाला आहे. रानभाज्या आणून विकण्यासाठी त्यांना गावांत किंवा शहरात बाजारपेठच मिळाली नाही.स्थानिक ग्रामस्थांनीही कोरोनाच्या भितीपोटी आणलेल्या रानभाज्या विकत घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या टोपल्यातच सुकल्या. परिणामी, जे चार पैसे मिळायचे, तेही न मिळाल्याने आनंदावर विरजण पडले. यामुळे जीवन जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रानभाज्या विकल्या न गेल्याने रोजची समाधानाची भाकरी तर हिरावून गेलीच, पण खाऊची वाट पाहणारी लहान मुले, खाऊविनाच झोपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात पडल्याने अनेक रानभाज्या उगवल्याच नसल्याचे आदिवासी विक्र ेत्यांनी सांगितले. मात्र ज्या उगवल्या त्या कोरोनाच्या भितीपोटी विकल्या न गेल्याने घरातील अनेक जीवनावश्यक वस्तू घेता आल्या नाहीत याची खंत आदिवासी व्यक्त करतात.

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या