शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाची आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:52 IST

सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा ...

ठळक मुद्देआर्थिक गणित कोलमडले आहे.

सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे.मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतीमाल अल्प प्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे, वाढते बाजारभाव शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले तरी सर्व सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.वर्षभर शेतीमाल कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला, अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारे भांडवल देखील वसूल झाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विक्र ीसाठी नेला नाही. डिसेंबर महिन्यापासून विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असतांना शेतीसाठी पाणी कुठून येणार? अशा परिस्थितीत शेतातील उभी पिके सुकू लागली आहेत. आठवडे बाजारात शेतीमालाची आवक घटली आहे. भाजीपाल्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. बाजारात विक्र ीसाठी येणाºया अवक घटल्याचा परिणाम बाजार भावावर झाला आहे. वर्षभर न मिळालेला भाव मिळत आहे.दुष्काळाची झळ सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. उन्हाळ्यात हाताला काम मिळत नाही, मजुरी नाही, शेतकºयांकडे पैसे नाही अशा परिस्थितीत कुटुंब चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.आजचे बाजारभावमेथी २० रुपये जुडी, कोबी ३० रुपये गड्डा, फ्लॉवर ७० रु पये किलो, मिरची ८० रुपये किलो, दोडका ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो, शेपू २० रुपये जुडी, टमाटे ४० रुपये किलो, गिलके ६० रुपये किलो.चौकटदुष्काळ परिस्थितीमुळे विहिरींनी लवकर तळ गाठला. उभे पिके करपून गेले. त्यामुळे शेतीमालाचा आज तुटवडा निर्माण झाला आहे. वर्षभर कवडीमोल भावाने विक्र ी केलेल्या शेतीमालाला आज चार पैसे मिळत असले तरी, केवळ ५ टक्के लोकांना त्याचा फायदा होईल, ९५ टक्के शेतकºयांकडे मालाच विक्र ीसाठी उपलब्ध नाही.ज्ञानेश्वर पोटे, भुसे.आठवडे बाजारात गगनाला भिडलेले. भाजीपाल्याचे दर आज खिशाला महाग होत आहे. कोणताही भाजीपाला किमान ५० रुपये किलो दराच्या पुढे खरेदी करावा लागत आहे, उन्हाळा असल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे कुटुंब खर्च करणे अवघड झाले आहे.रवींद्र शिंदे, भेंडाळी.शेतकºयांकडे शेतीमाल कमी झाला की बाजारभाव वाढतात. शेती मालाचे भाव स्थिर राहिले पाहिजे. शेतकºयांना कायम भाव मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल. आज केवळ मालाचा तुडवडा झाल्याने भावात तेजी आली, नाही तर वर्षभर कवडीमोल भावात विक्र ी करावी लागली.कैलास डेर्ले, शिंगवे.