शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शेतीमालाची आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:52 IST

सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा ...

ठळक मुद्देआर्थिक गणित कोलमडले आहे.

सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे.मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतीमाल अल्प प्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे, वाढते बाजारभाव शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले तरी सर्व सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.वर्षभर शेतीमाल कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला, अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारे भांडवल देखील वसूल झाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विक्र ीसाठी नेला नाही. डिसेंबर महिन्यापासून विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असतांना शेतीसाठी पाणी कुठून येणार? अशा परिस्थितीत शेतातील उभी पिके सुकू लागली आहेत. आठवडे बाजारात शेतीमालाची आवक घटली आहे. भाजीपाल्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. बाजारात विक्र ीसाठी येणाºया अवक घटल्याचा परिणाम बाजार भावावर झाला आहे. वर्षभर न मिळालेला भाव मिळत आहे.दुष्काळाची झळ सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. उन्हाळ्यात हाताला काम मिळत नाही, मजुरी नाही, शेतकºयांकडे पैसे नाही अशा परिस्थितीत कुटुंब चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.आजचे बाजारभावमेथी २० रुपये जुडी, कोबी ३० रुपये गड्डा, फ्लॉवर ७० रु पये किलो, मिरची ८० रुपये किलो, दोडका ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो, शेपू २० रुपये जुडी, टमाटे ४० रुपये किलो, गिलके ६० रुपये किलो.चौकटदुष्काळ परिस्थितीमुळे विहिरींनी लवकर तळ गाठला. उभे पिके करपून गेले. त्यामुळे शेतीमालाचा आज तुटवडा निर्माण झाला आहे. वर्षभर कवडीमोल भावाने विक्र ी केलेल्या शेतीमालाला आज चार पैसे मिळत असले तरी, केवळ ५ टक्के लोकांना त्याचा फायदा होईल, ९५ टक्के शेतकºयांकडे मालाच विक्र ीसाठी उपलब्ध नाही.ज्ञानेश्वर पोटे, भुसे.आठवडे बाजारात गगनाला भिडलेले. भाजीपाल्याचे दर आज खिशाला महाग होत आहे. कोणताही भाजीपाला किमान ५० रुपये किलो दराच्या पुढे खरेदी करावा लागत आहे, उन्हाळा असल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे कुटुंब खर्च करणे अवघड झाले आहे.रवींद्र शिंदे, भेंडाळी.शेतकºयांकडे शेतीमाल कमी झाला की बाजारभाव वाढतात. शेती मालाचे भाव स्थिर राहिले पाहिजे. शेतकºयांना कायम भाव मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल. आज केवळ मालाचा तुडवडा झाल्याने भावात तेजी आली, नाही तर वर्षभर कवडीमोल भावात विक्र ी करावी लागली.कैलास डेर्ले, शिंगवे.