शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

शेतीमालाची आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:52 IST

सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा ...

ठळक मुद्देआर्थिक गणित कोलमडले आहे.

सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे.मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतीमाल अल्प प्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे, वाढते बाजारभाव शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले तरी सर्व सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.वर्षभर शेतीमाल कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला, अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारे भांडवल देखील वसूल झाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विक्र ीसाठी नेला नाही. डिसेंबर महिन्यापासून विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असतांना शेतीसाठी पाणी कुठून येणार? अशा परिस्थितीत शेतातील उभी पिके सुकू लागली आहेत. आठवडे बाजारात शेतीमालाची आवक घटली आहे. भाजीपाल्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. बाजारात विक्र ीसाठी येणाºया अवक घटल्याचा परिणाम बाजार भावावर झाला आहे. वर्षभर न मिळालेला भाव मिळत आहे.दुष्काळाची झळ सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. उन्हाळ्यात हाताला काम मिळत नाही, मजुरी नाही, शेतकºयांकडे पैसे नाही अशा परिस्थितीत कुटुंब चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.आजचे बाजारभावमेथी २० रुपये जुडी, कोबी ३० रुपये गड्डा, फ्लॉवर ७० रु पये किलो, मिरची ८० रुपये किलो, दोडका ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो, शेपू २० रुपये जुडी, टमाटे ४० रुपये किलो, गिलके ६० रुपये किलो.चौकटदुष्काळ परिस्थितीमुळे विहिरींनी लवकर तळ गाठला. उभे पिके करपून गेले. त्यामुळे शेतीमालाचा आज तुटवडा निर्माण झाला आहे. वर्षभर कवडीमोल भावाने विक्र ी केलेल्या शेतीमालाला आज चार पैसे मिळत असले तरी, केवळ ५ टक्के लोकांना त्याचा फायदा होईल, ९५ टक्के शेतकºयांकडे मालाच विक्र ीसाठी उपलब्ध नाही.ज्ञानेश्वर पोटे, भुसे.आठवडे बाजारात गगनाला भिडलेले. भाजीपाल्याचे दर आज खिशाला महाग होत आहे. कोणताही भाजीपाला किमान ५० रुपये किलो दराच्या पुढे खरेदी करावा लागत आहे, उन्हाळा असल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे कुटुंब खर्च करणे अवघड झाले आहे.रवींद्र शिंदे, भेंडाळी.शेतकºयांकडे शेतीमाल कमी झाला की बाजारभाव वाढतात. शेती मालाचे भाव स्थिर राहिले पाहिजे. शेतकºयांना कायम भाव मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल. आज केवळ मालाचा तुडवडा झाल्याने भावात तेजी आली, नाही तर वर्षभर कवडीमोल भावात विक्र ी करावी लागली.कैलास डेर्ले, शिंगवे.