शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

शेतीमालाची आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:52 IST

सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा ...

ठळक मुद्देआर्थिक गणित कोलमडले आहे.

सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे.मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतीमाल अल्प प्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे, वाढते बाजारभाव शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले तरी सर्व सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.वर्षभर शेतीमाल कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला, अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारे भांडवल देखील वसूल झाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विक्र ीसाठी नेला नाही. डिसेंबर महिन्यापासून विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असतांना शेतीसाठी पाणी कुठून येणार? अशा परिस्थितीत शेतातील उभी पिके सुकू लागली आहेत. आठवडे बाजारात शेतीमालाची आवक घटली आहे. भाजीपाल्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. बाजारात विक्र ीसाठी येणाºया अवक घटल्याचा परिणाम बाजार भावावर झाला आहे. वर्षभर न मिळालेला भाव मिळत आहे.दुष्काळाची झळ सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. उन्हाळ्यात हाताला काम मिळत नाही, मजुरी नाही, शेतकºयांकडे पैसे नाही अशा परिस्थितीत कुटुंब चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.आजचे बाजारभावमेथी २० रुपये जुडी, कोबी ३० रुपये गड्डा, फ्लॉवर ७० रु पये किलो, मिरची ८० रुपये किलो, दोडका ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो, शेपू २० रुपये जुडी, टमाटे ४० रुपये किलो, गिलके ६० रुपये किलो.चौकटदुष्काळ परिस्थितीमुळे विहिरींनी लवकर तळ गाठला. उभे पिके करपून गेले. त्यामुळे शेतीमालाचा आज तुटवडा निर्माण झाला आहे. वर्षभर कवडीमोल भावाने विक्र ी केलेल्या शेतीमालाला आज चार पैसे मिळत असले तरी, केवळ ५ टक्के लोकांना त्याचा फायदा होईल, ९५ टक्के शेतकºयांकडे मालाच विक्र ीसाठी उपलब्ध नाही.ज्ञानेश्वर पोटे, भुसे.आठवडे बाजारात गगनाला भिडलेले. भाजीपाल्याचे दर आज खिशाला महाग होत आहे. कोणताही भाजीपाला किमान ५० रुपये किलो दराच्या पुढे खरेदी करावा लागत आहे, उन्हाळा असल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे कुटुंब खर्च करणे अवघड झाले आहे.रवींद्र शिंदे, भेंडाळी.शेतकºयांकडे शेतीमाल कमी झाला की बाजारभाव वाढतात. शेती मालाचे भाव स्थिर राहिले पाहिजे. शेतकºयांना कायम भाव मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल. आज केवळ मालाचा तुडवडा झाल्याने भावात तेजी आली, नाही तर वर्षभर कवडीमोल भावात विक्र ी करावी लागली.कैलास डेर्ले, शिंगवे.