शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

भाजीपाला विक्रेत्यांचा स्थलांतरास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 9:00 PM

मनमाड:- पालिका प्रशासनातर्फे शहरातील भाजी मार्केट गावाबाहेर स्टेडियमवर हलविण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी आज पालिकेवर मोर्चा काढून धरणे ...

ठळक मुद्देमनमाड पालिकेत धरणे आंदोलन

मनमाड:- पालिका प्रशासनातर्फे शहरातील भाजी मार्केट गावाबाहेर स्टेडियमवर हलविण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी आज पालिकेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले .

यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजी मार्केटचे अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यात यावे व भाजी मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भगतसिंग मैदानाजवळ जुने भाजी मार्केट तोडून त्या ठिकाणी १९९८ साली नवीन भाजी मार्केटचे काम सुरू करण्यात आले.

मात्र तब्बल २२ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील मार्केटचे काम अर्धवट आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रते मिळेल त्या जागी दुकाने लावून आपला उदरनिर्वाह करतात. मुख्याधिकारी विजय कुमार मुंडे यांच्याकडे वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, भाजीपाला मार्केट आययूडीपी भागात असलेले महर्षी वाल्मिकी स्टेडियममध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भाजी विक्रेत्यांवर अचानक बेरोजगारीचे संकट आल्याने कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला.

अखेर संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. आम्हाला व्यवसाय करू द्या नाही तर आत्महत्त्या करण्याची परवानगी द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष रहेमान शहा यांनीदेखील भाजी विक्रेत्यांची बाजू मांडली.प्रशासनातर्फे आश्वासनमुख्याधिकारी मुंडे यांनी भाजी विक्रेते आणि हातगाडी लावणारे तरुण यांच्या व्यथा जाणून घेतल्या. भाजी मार्केटचे अर्धवट असलेल्या कामाला सुरुवात केली जाईल तोपर्यंत पालिका प्रशासनातर्फे मार्केटच्या आतील साफसफाई करून आणि तेथे सर्व व्यवस्था करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आंदोलनात मोठ्या संख्येने भाजी विक्रेते सहभागी झाले होते.

टॅग्स :Marketबाजारroad safetyरस्ते सुरक्षा