शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

भाजीविक्रेत्यांचा वाद विकोपाला ; दोन वर्षांपासून  जागेचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:29 IST

येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील भाजीविक्रेते आणि बाहेरील विक्रेते यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, हा वाद मिटेपर्यंत मंडईतील विक्रेत्यांनी मंडई बाहेर रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिक त्रस्त झालेले आहेत. मनपा प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाहीतर दोन्ही विक्रे त्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देविक्रेत्यांनी मंडई बाहेर रस्त्यावर ठाण मांडले मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीतीमनपा प्रशासन विक्रेत्यांमधील वाद सोडविण्यास अपयशी

सातपूर : येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील भाजीविक्रेते आणि बाहेरील विक्रेते यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, हा वाद मिटेपर्यंत मंडईतील विक्रेत्यांनी मंडई बाहेर रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिक त्रस्त झालेले आहेत. मनपा प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाहीतर दोन्ही विक्रे त्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.  सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईच्या आतील उर्वरित जागेवर मंडईबाहेरील विक्रेत्यांना बसविण्यात यावे आणि रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा, अशी मागणी मंडईतील भाजीविकेत्यांची आहे. या मागणीसाठी या विक्रेत्यांनी वेळोवेळी मनपाच्या विभागीय कार्यालयाजवळ आंदोलन छेडलेले आहे. जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी या मागणीकडे मनपा प्रशासनाने फारसे गांभीर्याने घेतलेले नाही, असा आरोप केला जात आहे.  मनपा प्रशासन विक्रेत्यांमधील वाद सोडविण्यास अपयशी ठरल्याने अखेर मंडईतील भाजीविक्रेत्यांनी मंगळवारपासून ठोस आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या विक्रेत्यांनी मंडईबाहेर रस्त्यावर भाजीविक्र ीचा व्यवसाय सुरू करून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय ग्राहक आणि रहिवाशांनी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने हा वाद लवकर निकाली काढावा, अशी मागणी केली जात आहे. नगरसेवकाचे आश्वासन प्रभागाचे नगरसेवक सीमा निगळ यांनी व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मनपा आयुक्त रजेवर असून, ते आल्यानंतर यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन  निगळ यांनी भाजीविक्रे त्यांना दिले.  शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक लोंढे यांनीही भाजीविक्रेत्यांची भेट घेऊन वाद मिटविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हा वाद तसाच असल्याने विक्रेत्यांनी  आंदोलन सुरू केले आहे.

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्या