शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

पाणलोट क्षेत्रावर वरूणराजा रूसलेलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:09 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थान तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत ८० दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देधरणातील साठा आटला । गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थान तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत ८० दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.कमीअधिक प्रमाणात सर्वच भागात पाऊस पडत आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मागील आठवड्यात पावसाचा जोर ओसरला होता; परंतु पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने शेतशिवार हिरवेगार झाले आहे. काही भागात शेतात पाणी साचल्याने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यावरच लाभक्षेत्रातील शेतीचे गणित अवलंबून असते. परंतु पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.दरम्यान, धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत़ पाऊस कधी पडेल आणि धरण कधी भरेल यासाठी शेतकरी परिसरातील महादेव मंदिरामध्ये साकडे घालत आहेत़ दोन महिन्यापासून प्रतीक्षमागील वर्षी भोजापूर धरण २ आँगस्ट रोजी पूर्ण भरले होते. यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे, मात्र धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत वाढला नाही. गतवर्षी भोजापूर धरणात २७ जुलैपासून पाण्याची पातळी वाढणास सुरूवात झाली होती. मात्र यंदा दोन महिन्यापासून धरण क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा आहे़ धरण साठा वाढला नाही तर परिसरातल लाभधारक शेतकºयांवर पिके सोडून देण्याची वेळ येणार आहे़ आधीच कोरोनाच्या संकटांचा सामना करताना नाकीनव आलेले असतांना पुन्हा नव्हे संकट उभे राहू नाही याची अपेक्षा शेतकरी करीत आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण