शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

पाणलोट क्षेत्रावर वरूणराजा रूसलेलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:09 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थान तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत ८० दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देधरणातील साठा आटला । गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थान तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत ८० दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.कमीअधिक प्रमाणात सर्वच भागात पाऊस पडत आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मागील आठवड्यात पावसाचा जोर ओसरला होता; परंतु पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने शेतशिवार हिरवेगार झाले आहे. काही भागात शेतात पाणी साचल्याने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यावरच लाभक्षेत्रातील शेतीचे गणित अवलंबून असते. परंतु पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.दरम्यान, धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत़ पाऊस कधी पडेल आणि धरण कधी भरेल यासाठी शेतकरी परिसरातील महादेव मंदिरामध्ये साकडे घालत आहेत़ दोन महिन्यापासून प्रतीक्षमागील वर्षी भोजापूर धरण २ आँगस्ट रोजी पूर्ण भरले होते. यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे, मात्र धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत वाढला नाही. गतवर्षी भोजापूर धरणात २७ जुलैपासून पाण्याची पातळी वाढणास सुरूवात झाली होती. मात्र यंदा दोन महिन्यापासून धरण क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा आहे़ धरण साठा वाढला नाही तर परिसरातल लाभधारक शेतकºयांवर पिके सोडून देण्याची वेळ येणार आहे़ आधीच कोरोनाच्या संकटांचा सामना करताना नाकीनव आलेले असतांना पुन्हा नव्हे संकट उभे राहू नाही याची अपेक्षा शेतकरी करीत आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण