शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पर्जन्याभिषेकात फुलला वैष्णवमेळा !

By admin | Updated: September 18, 2015 22:59 IST

कुंभपर्व : अखेरच्या पर्वणीला नाशिकच्या रामकुंडात स्नानासाठी लोटला अथांग भक्तिसागर

नाशिक : पहाटेपासून अखंड कोसळणाऱ्या धुवाधार पावसाच्या साक्षीने विकार-अवगुणांचे दमन करीत निर्मळतेची चैतन्यदायी अनुभूती घेण्यासाठी अवघ्या वैष्णव साधू-महंतांनी आपले देह गोदेच्या खळाळत्या प्रवाहात झोकून दिले आणि शाहीस्नानाच्या या पवित्र, विस्मयकारी प्रत्ययाने गोदाकाठही जणू थरारून निघाला... सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नाशिकमधील तिसऱ्या व अखेरच्या पर्वणीला देशभरातून आलेल्या लाखो श्रद्धाळूंनीही पाऊसधारा अंगावर झेलत रामकुंडात डुबकी मारून आयुष्याचे सार्थक केले. पर्जन्याभिषेकात रंगलेल्या या पर्वणीबरोबरच नाशिकमधील यंदाच्या कुंभमेळ्याचा अध्याय सुफळ संपूर्ण झाला. कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीला विक्रमी भाविकांनी हजेरी लावल्यानंतर आजच्या तिसऱ्या पर्वणीकडे देशाचे लक्ष होते. गुरुवारीच लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर आलेल्या या पर्वणीला भाविकांचा किती प्रतिसाद लाभतो, (पान ५ वर)याकडे सर्वांच्याच नजरा लागून होत्या; मात्र ही पर्वणी साधू-महंत आणि भाविकांपेक्षाही पावसानेच अधिक गाजवली. शुक्रवारी पहाटे तीन वाजेपासूनच नाशिक शहरात मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. सायंकाळपर्यंत संततधार सुरूच असल्याने साधू-महंतांची शाही मिरवणूक, शाहीस्नान व भाविकांचे स्नान पावसातच पार पडले; मात्र त्यामुळे भाविकांच्या उत्साहात तसूभरही उणेपणा आला नव्हता. सर्वांचेच प्रमुख आकर्षण असलेली साधू-महंतांची मिरवणूक सकाळी सहा वाजता तपोवनातील साधुग्रामच्या लक्ष्मीनारायण मंदिरापासून निघाली. आखाड्याचे ध्वज, निशाण नाचवत, इष्टदेवतांचा मान सांभाळत साधूंनी रामकुंडाच्या दिशेने प्रयाण केले. गेल्या वेळेप्रमाणेच यंदाही मिरवणुकीच्या अग्रभागी निर्मोही आखाडा होता. त्यानंतर दिगंबर व अखेरीस निर्वाणी आखाडा मिरवणुकीत सहभागी झाला होता. ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय’चा अखंड जयघोष करीत, मर्दानी खेळांचे दर्शन घडवत, बॅण्डपथकाच्या तालावर साधूंचे आखाडे गोदाघाटावर दाखल होत होते. दरम्यान, परंपरेनुसार आज निर्वाणी आखाड्याच्या महंतांचा स्नानाचा प्रथम मान असल्याने निर्मोही व दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत गोदाघाटावर पोहोचूनही ध्वज, निशाणांसह भाजीबाजार पटांगणावरच थांबून राहिले. यावेळी त्यांच्या खालशांची स्नाने मात्र सुरू ठेवण्यात आली. सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी निर्मोही आखाड्याचे खालसे रामकुंडात स्नानासाठी उतरले. सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दिगंबर आखाड्याच्या खालशांनी स्नान सुरू केले. ८ वाजून ४५ मिनिटांनी निर्वाणी आखाडा गोदाघाटावर पोहोचला. ध्वज, निशाण व इष्टदेवतांचे विधिवत पूजन झाल्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष तथा निर्वाणी आखाड्याचे श्री महंत ग्यानदास, श्री महंत धरमदास, चतु:संप्रदायाचे श्री महंत फुलडोल बिहारीदास, महंत रासबिहारीदास, श्री पंच हरिव्यासी खाकी आखाड्याचे महंत जगन्नाथ संतदास, राधेश्यामदास, जगद्गुरू निम्बार्कचार्य अजमेरद्वारा श्री जी महाराज यांच्यासह महंतांनी स्नान केले. यावेळी श्री महंत ग्यानदास यांनी भाविकांना हात उंचावून अभिवादन करताच भाविकांची एकच जल्लोष केला. यानंतर दिगंबर आखाड्याचे श्री महंत कृष्णदास, श्री रामकिशोरदास शास्त्री, चतु:संप्रदायाचे महंत बर्फानीदादा महाराज, महंत वैष्णवदास, महंत भक्तिचरणदास व त्यांच्यानंतर निर्मोही आखाड्याचे श्री महंत अयोध्यादास, श्री महंत राजेंद्रदास, चतु:संप्रदायाचे रामलखनदास, सुरतच्या षष्ठपीठाचे जगद्गुरू वल्लभाचार्य स्वामी वल्लभराय महाराज, स्वामी अनुरागराय महाराज यांनी पवित्र गोदास्नान केले. यावेळी साधू-महंतांनी आपल्या जटांचे प्रदर्शन करीत भाविकांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, यानंतर निर्वाणी, दिगंबर व निर्मोही या क्रमाने आखाडे साधुग्रामकडे परतले. जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महापौर अशोक मुर्तडक, श्री गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी साधू-महंतांचे स्वागत केले. मनसेचे आमदार बाळा नांदगावकर उपस्थित होते. दिनेश गायधनी, विनायक गायधनी, गजानन गायधनी आदि ब्रह्मवृंदांनी आखाड्यांच्या इष्टदेवता पूजाविधीचे पौरोहित्य केले. सकाळी साडेनऊ वाजताच तिन्ही आखाड्यांचे शाहीस्नान आटोपल्याने प्रशासनावरचा ताण हलका झाला. त्यानंतर गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या स्नानासाठी रामकुंड खुले करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत गोदाघाट भाविकांनी गजबजून गेला होता. दरम्यान, याबरोबरच नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पर्वण्या संपुष्टात आल्या असून, आता त्र्यंबकेश्वर येथे येत्या शुक्रवारी (दि. २५) शैव साधूंचे अखेरचे शाहीस्नान होणार आहे. पावसाने गाजवली पर्वणीपहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली होती. पावसामुळे पहाटे पाचच्या सुमारासही रामकुंड परिसरात शुकशुकाट होता. संततधार पावसामुळे गोदेच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने भाविकांना गोदापात्रात न जाण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रामकुंडावर लाइफबोट, जॅकेटस् सज्ज ठेवले होते. पावसामुळे मिरवणुकीला उशीर होण्याचीही शक्यता वर्तवली जात होती; मात्र सुदैवाने मिरवणुकीवर पावसाचा परिणाम झाला नाही. पावसाचा जोर जरा कमी झाल्यावर भाविकांनीही स्नानासाठी गर्दी केली. दरम्यान, गणरायापाठोपाठ पावसानेही जोरदार पुनरागमन केल्याने तिसरी पर्वणी पावल्याची भावना नाशिककरांत व्यक्त होत होती.