शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वरखेडा-कादवा रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 18:39 IST

दिंडोरी तालुक्यातील वरखेडा ते कादवा सहकारी साखर कारखाना या रस्त्याची चाळण झाली असून, हा रस्ता त्वरित दुरु स्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; तातडीने दुरुस्तीची मागणी

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा ते कादवा सहकारी साखर कारखाना या रस्त्याची चाळण झाली असून, हा रस्ता त्वरित दुरु स्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.कादवा ते मातेरेवाडी या दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. सर्व रस्ते खड्ड्यांमध्ये हरवून गेले आहेत. रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ असते. परंतु या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढे असूनही शासनाला या रस्त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हे रस्ते महत्त्वपूर्ण आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. या रस्त्याची दयनीय स्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेण्यास विलंब होत असतो. परिणामी त्याचा फटका बसत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाºया प्रवाशांची अक्षरश: हाडे खिळखिळी होत आहेत. या रस्त्याचे कामे होऊन जास्त कालावधी लोटलेला नाही. एवढा कालावधी उलटूनही किरकोळ डागडुजीवगळता काहीही कामे करण्यात आलेली नाहीत. रस्त्याच्या या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका जनतेला पावसाळ्यात बसत असतो. रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढतो. परंतु याकडे लक्ष देण्यासाठी शासनाला वेळ आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सर्वांगीण विकास साधण्यासाठी रस्त्याचा विकास महत्त्वाचा आहे. रस्त्यांचा विकास झाला म्हणजे दळणवळण वाढेल परिणामी परिसराचा विकास होईल, हे दस्तूरखुद्द शासनाचेच धोरण आहे. परंतु सरकार ग्रामीण भागात दळणवळणासाठी निधी उपलब्ध करून देत नाही. त्याचा परिणाम जाणवत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक