शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:44 IST

मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हिंदू संस्कृतीमध्ये कोजागरी पौर्णिमेप्रमाणे कार्तिकी पौर्णिमेलाही महत्त्व असते. या दिवशी स्नान करून भगवान कार्तिकेच्या दर्शनाला अत्यंत महत्त्व असल्याचे मानले जाते. वर्षभर महिलांना दर्शन न दिले जाणाऱ्या भगवान कार्तिकेच्या मंदिरात एक दिवसासाठी महिलांना दर्शन खुले असते. कार्तिक मासात येणाºया पौर्णिमेच्या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा, असेही संबोधले जाते. ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असे म्हणतात. याच दिवशी देवदिवाळी हा सणदेखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून, त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते, तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय व श्रीगणेशाची पूजा करावी, असे केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशीदेखील श्रद्धा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सामान्य आकाराहून अधिक मोठा दिसतो. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो.  त्यामुळे या दिवशी चंद्राचे दर्शन अधिक शुभ आणि मन प्रसन्न करणारे असल्याचे मानले जाते.त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वत: कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात अशी श्रद्धा आहे. या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी शंकराची नावे घेऊन आणि विष्णूचे सहस्रनाम घेऊन बेल आणि तूळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्त्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते. म्हणून त्यावेळी बेल व तूळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे.दीपोत्सव सोहळाकार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषत: शिवमंदिरातून त्रिपूर वाती लावतात. महाराष्ट्रातील अन्य सर्व मंदिरे अशा तºहेने उजळून निघतात, जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, विविध देवस्थानात जे दीपस्तंभ असतात ते सुद्धा प्रकाशमान होऊन झळाळतात. महादेव मंदिरांमध्ये भाविक दीप लावून उत्सव साजरा करतात. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिकTempleमंदिर