शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
2
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
3
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
4
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
5
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
6
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
7
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
8
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
9
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
10
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
11
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
12
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
13
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
14
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
15
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
16
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
17
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
19
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
20
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:44 IST

मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हिंदू संस्कृतीमध्ये कोजागरी पौर्णिमेप्रमाणे कार्तिकी पौर्णिमेलाही महत्त्व असते. या दिवशी स्नान करून भगवान कार्तिकेच्या दर्शनाला अत्यंत महत्त्व असल्याचे मानले जाते. वर्षभर महिलांना दर्शन न दिले जाणाऱ्या भगवान कार्तिकेच्या मंदिरात एक दिवसासाठी महिलांना दर्शन खुले असते. कार्तिक मासात येणाºया पौर्णिमेच्या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा, असेही संबोधले जाते. ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असे म्हणतात. याच दिवशी देवदिवाळी हा सणदेखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून, त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते, तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय व श्रीगणेशाची पूजा करावी, असे केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशीदेखील श्रद्धा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सामान्य आकाराहून अधिक मोठा दिसतो. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो.  त्यामुळे या दिवशी चंद्राचे दर्शन अधिक शुभ आणि मन प्रसन्न करणारे असल्याचे मानले जाते.त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वत: कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात अशी श्रद्धा आहे. या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी शंकराची नावे घेऊन आणि विष्णूचे सहस्रनाम घेऊन बेल आणि तूळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्त्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते. म्हणून त्यावेळी बेल व तूळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे.दीपोत्सव सोहळाकार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषत: शिवमंदिरातून त्रिपूर वाती लावतात. महाराष्ट्रातील अन्य सर्व मंदिरे अशा तºहेने उजळून निघतात, जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, विविध देवस्थानात जे दीपस्तंभ असतात ते सुद्धा प्रकाशमान होऊन झळाळतात. महादेव मंदिरांमध्ये भाविक दीप लावून उत्सव साजरा करतात. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिकTempleमंदिर