शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

विंधनविहिरीवरून ग्रामसेवकांची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:35 IST

जिल्ह्यात पाणी आणि दुष्काळाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असताना विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधन विहिरीस पाणी लागले, तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पाणीटंचाई असतानाही प्रपत्र दिल्याने संताप

नाशिक : जिल्ह्यात पाणी आणि दुष्काळाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असताना विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधन विहिरीस पाणी लागले, तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.नांदगाव पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यात नांदगाव तालुक्यातील १६ योजना प्रस्तावित असून, यापैकी पाच योजनांचे सर्वेक्षण बाकी आहे. सदरचे सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. नांदगाव तालुक्यात सुरू असलेले टँकर नादुरु स्त असल्याची तक्र ार जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी यावेळी केली. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकाºयांनी तत्काळ टँकर बदलून देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. गावात टँकर सुरू असतानाहीविंधन विहिरीसाठी ग्रामसेवकांनी अद्यापही विहित नमुन्यात माहिती दिलेली नसल्याने डा.ॅ गिते यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सदर गावात विंधन विहिरींना पाणी लागल्यास टँकरसाठी होणारा खर्च वसूल करण्याचा इशारा दिला. यावेळी नळ योजना दुरु स्ती, तात्पुरत्या नळ पाणीयोजना, विहीर खोल करणे, विहीर अधिग्रहित करणे याबाबतही आढावा घेण्यात आला.जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी पाणीटंचाईबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून पाणीटंचाईबाबत जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. पाणीटंचाईचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत तत्काळ मार्गी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.बैठकीस पंचायत समिती सभापती विद्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सदस्य सुभाष कुठे, मधुबाला खिराडकर, तहसीलदार भारती सागरे, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, गट विकास अधिकारी जगन सूर्यवंशी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.पाणीपट्टी वसुली न झाल्याने योजना बंदनांदगाव ४२ गाव पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी वसुलीबाबत आढावा घेतला असता वसुली होत नसल्याचे आढळून आले. पाणीपट्टी वसुली झाली नाही व वीज बिलामुळे योजना बंद झाली तर याची जबाबदारी ग्रामसेवक व गटविकास अधिकाºयांची राहील, असेही डॉ. गिते यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाई