शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

विंधनविहिरीवरून ग्रामसेवकांची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:35 IST

जिल्ह्यात पाणी आणि दुष्काळाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असताना विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधन विहिरीस पाणी लागले, तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पाणीटंचाई असतानाही प्रपत्र दिल्याने संताप

नाशिक : जिल्ह्यात पाणी आणि दुष्काळाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असताना विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधन विहिरीस पाणी लागले, तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.नांदगाव पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यात नांदगाव तालुक्यातील १६ योजना प्रस्तावित असून, यापैकी पाच योजनांचे सर्वेक्षण बाकी आहे. सदरचे सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. नांदगाव तालुक्यात सुरू असलेले टँकर नादुरु स्त असल्याची तक्र ार जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी यावेळी केली. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकाºयांनी तत्काळ टँकर बदलून देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. गावात टँकर सुरू असतानाहीविंधन विहिरीसाठी ग्रामसेवकांनी अद्यापही विहित नमुन्यात माहिती दिलेली नसल्याने डा.ॅ गिते यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सदर गावात विंधन विहिरींना पाणी लागल्यास टँकरसाठी होणारा खर्च वसूल करण्याचा इशारा दिला. यावेळी नळ योजना दुरु स्ती, तात्पुरत्या नळ पाणीयोजना, विहीर खोल करणे, विहीर अधिग्रहित करणे याबाबतही आढावा घेण्यात आला.जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी पाणीटंचाईबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून पाणीटंचाईबाबत जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. पाणीटंचाईचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत तत्काळ मार्गी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.बैठकीस पंचायत समिती सभापती विद्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सदस्य सुभाष कुठे, मधुबाला खिराडकर, तहसीलदार भारती सागरे, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, गट विकास अधिकारी जगन सूर्यवंशी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.पाणीपट्टी वसुली न झाल्याने योजना बंदनांदगाव ४२ गाव पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी वसुलीबाबत आढावा घेतला असता वसुली होत नसल्याचे आढळून आले. पाणीपट्टी वसुली झाली नाही व वीज बिलामुळे योजना बंद झाली तर याची जबाबदारी ग्रामसेवक व गटविकास अधिकाºयांची राहील, असेही डॉ. गिते यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाई