शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

एकेरी वाहतुकीचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:28 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग मंगळवारी (दि. २३) राबविला; मात्र हा प्रयोग पहिल्या चार तासांतच फ सला.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग मंगळवारी (दि. २३) राबविला; मात्र हा प्रयोग पहिल्या चार तासांतच फ सला. वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेला नाशिककरांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.  मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नलपर्यंत दुहेरी वाहतूक मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होती. कारण शासकीय कन्या विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता विकसित केला जात आहे. अशाच पद्धतीने सीबीएस ते त्र्यंबक नाक्यापर्यंतचा रस्ता विकसित केला जाणार असल्याने तत्पूर्वी पोलिसांनी या रस्त्यावरील दुहेरी वाहतूक वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न मंगळवारी केला; मात्र हा प्रयत्न शहर वाहतूक शाखेच्या अंगलट आला आणि वाहतूक पोलीसही गोंधळात सापडले. सीबीएस चौकात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.मुंबई नाक्याकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी नव्या अधिसूचनेनुसार प्रवेश दिला जात होता; मात्र शालिमारकडून डावीकडे तसेच शरणपूररोडवरून सीबीएस सिग्नलवरुन उजवीकडे वळण घेत त्र्यंबक नाक्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे सीबीएस चौकात वाहतूक कोंडी झाली. परिणामी शरणपूररोडवरही वाहनांच्या रांगा लागल्या. तसेच शालिमार-सीबीएस रस्त्यावरही वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे नाशिककरांनी पोलिसांच्या नियोजन व नव्या बदलाविषयी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी काहींनी अधिसूचना पालन करण्याकडे दुर्लक्ष केले तर काहींचे वाहतूक पोलिसांसोबत खटके उडाले.पर्यायी मार्गाला नापसंती मुंबईनाक्याकडून सीबीएस, शरणपूररोड अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी वाहनांना प्रवेश दिला जात होता; मात्र रविवार कारंजावर वाहतुकीचा ताण निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मुंबईनाका येथूनच थेट महामार्गाने वडाळानाक्यापर्यंत जाऊन द्वारका, आडगावनाका, काट्या मारुती चौकातून निमाणी या मार्गाचा अवलंब करावा, असे अधिसूचनेत म्हटले होते; मात्र वाहनचालकांनी या लांब पल्ल्याच्या पर्यायी मार्गाकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. त्यामुळे मेहेर चौक, अशोकस्तंभ व रविवार कारंजा चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली.प्रयोगाचा आज दुसरा दिवस रविवारी (दि.२१) प्रसिद्ध करण्यात आलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेचा बुधवारी (दि. २४) दुसरा दिवस असणार आहे. पोलिसांकडून पुन्हा असा प्रयोग या मार्गावर नियोजित वेळेनुसार राबविला जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच या प्रयोगामुळे वाहतूक कोंडी आणि पर्यायी मार्गावरील वाहतूक वळविल्यामुळे अन्य रस्त्यांवर येणारा ताण शहर वाहतूक शाखेकडून विचारात घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसNashikनाशिक