शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

एकेरी वाहतुकीचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:28 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग मंगळवारी (दि. २३) राबविला; मात्र हा प्रयोग पहिल्या चार तासांतच फ सला.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग मंगळवारी (दि. २३) राबविला; मात्र हा प्रयोग पहिल्या चार तासांतच फ सला. वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेला नाशिककरांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.  मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नलपर्यंत दुहेरी वाहतूक मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होती. कारण शासकीय कन्या विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता विकसित केला जात आहे. अशाच पद्धतीने सीबीएस ते त्र्यंबक नाक्यापर्यंतचा रस्ता विकसित केला जाणार असल्याने तत्पूर्वी पोलिसांनी या रस्त्यावरील दुहेरी वाहतूक वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न मंगळवारी केला; मात्र हा प्रयत्न शहर वाहतूक शाखेच्या अंगलट आला आणि वाहतूक पोलीसही गोंधळात सापडले. सीबीएस चौकात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.मुंबई नाक्याकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी नव्या अधिसूचनेनुसार प्रवेश दिला जात होता; मात्र शालिमारकडून डावीकडे तसेच शरणपूररोडवरून सीबीएस सिग्नलवरुन उजवीकडे वळण घेत त्र्यंबक नाक्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे सीबीएस चौकात वाहतूक कोंडी झाली. परिणामी शरणपूररोडवरही वाहनांच्या रांगा लागल्या. तसेच शालिमार-सीबीएस रस्त्यावरही वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे नाशिककरांनी पोलिसांच्या नियोजन व नव्या बदलाविषयी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी काहींनी अधिसूचना पालन करण्याकडे दुर्लक्ष केले तर काहींचे वाहतूक पोलिसांसोबत खटके उडाले.पर्यायी मार्गाला नापसंती मुंबईनाक्याकडून सीबीएस, शरणपूररोड अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी वाहनांना प्रवेश दिला जात होता; मात्र रविवार कारंजावर वाहतुकीचा ताण निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मुंबईनाका येथूनच थेट महामार्गाने वडाळानाक्यापर्यंत जाऊन द्वारका, आडगावनाका, काट्या मारुती चौकातून निमाणी या मार्गाचा अवलंब करावा, असे अधिसूचनेत म्हटले होते; मात्र वाहनचालकांनी या लांब पल्ल्याच्या पर्यायी मार्गाकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. त्यामुळे मेहेर चौक, अशोकस्तंभ व रविवार कारंजा चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली.प्रयोगाचा आज दुसरा दिवस रविवारी (दि.२१) प्रसिद्ध करण्यात आलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेचा बुधवारी (दि. २४) दुसरा दिवस असणार आहे. पोलिसांकडून पुन्हा असा प्रयोग या मार्गावर नियोजित वेळेनुसार राबविला जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच या प्रयोगामुळे वाहतूक कोंडी आणि पर्यायी मार्गावरील वाहतूक वळविल्यामुळे अन्य रस्त्यांवर येणारा ताण शहर वाहतूक शाखेकडून विचारात घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसNashikनाशिक