शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

समृद्धीसाठी स्थानिक यंत्रणा वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:39 IST

सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी विकासकामांना तालुक्यातील यंत्रणाच वापरण्यात यावी, या मागणीचे निवेदन तालुका अर्थमुव्हर्स संघटनेने तहसीलदार यांनी देण्यात आले.

ठळक मुद्देअर्थमुव्हर्स संघटना : तहसीलदारांना निवेदन

सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी विकासकामांना तालुक्यातील यंत्रणाच वापरण्यात यावी, या मागणीचे निवेदन तालुका अर्थमुव्हर्स संघटनेने तहसीलदार यांनी देण्यात आले.सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू झालेले आहे. संबंधित काम ज्या विकासकांनी घेतले आहे ते या कामासाठी लागणारी यंत्रसामग्री बाहेरून आणत असल्याचे निदर्शनास येत आहे. समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या स्वरूपाचे आहे. या कामासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री, कच्चा माल लागणार आहे. तालुका दुष्काळी असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री कर्ज काढून खरेदी करून त्यावरच उदरनिर्वाह करीत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता वाहनधारकांना काम मिळावे, असे निवेदनात म्हटले आहे.यावर्षी पडलेला भीषण दुष्काळ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कामांच्या कमरतेमुळे तालुक्यातील बहुतांश लोकांची सर्व यंत्रसामग्री उभी आहे. तरी या प्रकल्पासाठी लागणारी सर्व यंत्रणा ही अगोदर स्थानिकांची घेण्यात यावी अशी सक्ती आपल्या स्तरावरून करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, अशी अपेक्षा सिन्नर तालुका अर्थमुव्हर्स असोसिएशनच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, संघटनेचे अध्यक्ष रमेश पांगारकर, सरचिटणीस पंकज जाधव, शांताराम नवाळे, मंगेश शेळके, नीलेश जगताप, सोमनाथ पेखळे, रमेश शेळके, विलास सांगळे, दशरथ रूपवते, ज्ञानेश्वर सानप, अजय हुळहुळे, अरुण उगले, रामदास सानप, सचिन शिंदे, बाळासाहेब शेळके, सुदाम रूपवते, सुनील घुगे, महेश ढवळे, संचित शेळके, दत्ता मुंगसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.