शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

केळी पिकविण्यास कार्बाईडचा बेसुमार वापर

By admin | Updated: March 1, 2015 23:13 IST

व्यापाऱ्यांचा खेळ : कर्करोग, पोटाचे विकार वाढले; प्रशासनाकडून कारवाईची गरज

अशोक डोंबाळे - सांगलीतील व्यापारी केळाला चांगला रंग येण्यासाठी कार्बाईडचा वापर करीत आहेत. कार्बाईडचा वापर करून पकविलेली केळी खाणाऱ्यांना कर्करोग, पोटाचे गंभीर विकार होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.केळी, आंबा, चिकू या तीनही फळपिकातून ठोस उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्याप्रमाणात तिकडे वळू लागला आहे. परंतु, या शेतकऱ्यांना फळे व्यापाऱ्यांनी बदनाम करण्यास सुरुवात केली आहे. व्यापारी कोकणातील शेतकऱ्यांकडून आंबे विकत घेऊन फळाला चांगला रंग येण्यासाठी कार्बाईडचा वापर करीत होते. यामुळेच गेल्यावर्षी परदेशात देवगड हापूस आंबा नाकारला गेला. आंब्यावर बंदी घातली होती. कार्बाईडसह अन्य रसायने वापरून आंबा पिकविणार नसल्याची हमी केंद्र आणि राज्य शासनाने दिल्यामुळे यावर्षी आंब्याची निर्यात होणार आहे. आंबा उत्पादक आणि निर्यात करणारे व्यापारी बऱ्याच वर्षानंतर आता जागे झाले आहेत.तसेच शेतकऱ्यांकडून हिरवी केळी किलोवर घेतली जातात. सात ते पंधरा रुपये किलोने व्यापारी ती शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. ही केळी पिकविण्यासाठी आणि त्याला पिवळा रंग येण्यासाठीही कार्बाईडचा मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. कार्बाईड पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये केळीचे घड बुडवून बंद खोलीत थप्पी मारली जाते. त्यामुळे केळांना पिवळा रंग येतो. पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. सांगली शहरासह इस्लामपूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, विटा, मिरज शहरातही कार्बाईडच्या साहाय्यानेच केळी पिकविली जात आहेत. सध्या बाजारात येणारी ८५ टक्के केळी कार्बाईडयुक्त पाण्यात भिजवूनच पिकवली जात आहेत. ही केळी खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण दिल्यासारखे आहे. यामुळे पोटाचे विकार तर शंभर टक्के होतातच, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करणे बंद करून नागरिकांच्या जिवाशी खेळणे थांबवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कार्बाईडचा असाच वापर सुरु राहिल्यास नागरिकच अशा केळांवर बहिष्कार घालतील, अशी स्थिती आहे. कार्बाईडचा असा केला जातो वापरकार्बाईड पाण्यात मिसळले, तर उष्णता तयार होऊन गॅस तयार होतो. खेड्यात आणि शहरातही छोट्या टँकमधील पाण्यात कार्बाईड मिसळतात. यामध्ये केळींचा घड बुडवून काढला जातो. त्यावेळी ही उष्णता केळात उतरते आणि त्यामुळे केळी पिकतात. कार्बाईडचा अनिर्बंध वापर होतो. त्यामुळे अतिरिक्त उष्णता केळांमध्ये साठून राहते व ती पोटात जाते. त्यामुळे पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. भविष्यात कर्करोगासही बळी पडू शकतो.कार्बाईडचा वापर कसा ओळखाल?जेव्हा केळी नैसर्गिकरित्या पिकवली जातात, त्यावेळी त्याचे देठ कोमेजते (काळे पडते). नैसर्गिकरित्या पिकविलेल्या केळांचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे डाग असतात. तीच केळी कार्बाईडचा वापर करून पिकवली असतील, तर त्यांचे देठ हिरवे असते आणि केळींचा रंग हिरवट पिवळा दिसतो. केळावर डाग नसतात.