शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

केळी पिकविण्यास कार्बाईडचा बेसुमार वापर

By admin | Updated: March 1, 2015 23:13 IST

व्यापाऱ्यांचा खेळ : कर्करोग, पोटाचे विकार वाढले; प्रशासनाकडून कारवाईची गरज

अशोक डोंबाळे - सांगलीतील व्यापारी केळाला चांगला रंग येण्यासाठी कार्बाईडचा वापर करीत आहेत. कार्बाईडचा वापर करून पकविलेली केळी खाणाऱ्यांना कर्करोग, पोटाचे गंभीर विकार होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.केळी, आंबा, चिकू या तीनही फळपिकातून ठोस उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्याप्रमाणात तिकडे वळू लागला आहे. परंतु, या शेतकऱ्यांना फळे व्यापाऱ्यांनी बदनाम करण्यास सुरुवात केली आहे. व्यापारी कोकणातील शेतकऱ्यांकडून आंबे विकत घेऊन फळाला चांगला रंग येण्यासाठी कार्बाईडचा वापर करीत होते. यामुळेच गेल्यावर्षी परदेशात देवगड हापूस आंबा नाकारला गेला. आंब्यावर बंदी घातली होती. कार्बाईडसह अन्य रसायने वापरून आंबा पिकविणार नसल्याची हमी केंद्र आणि राज्य शासनाने दिल्यामुळे यावर्षी आंब्याची निर्यात होणार आहे. आंबा उत्पादक आणि निर्यात करणारे व्यापारी बऱ्याच वर्षानंतर आता जागे झाले आहेत.तसेच शेतकऱ्यांकडून हिरवी केळी किलोवर घेतली जातात. सात ते पंधरा रुपये किलोने व्यापारी ती शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. ही केळी पिकविण्यासाठी आणि त्याला पिवळा रंग येण्यासाठीही कार्बाईडचा मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. कार्बाईड पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये केळीचे घड बुडवून बंद खोलीत थप्पी मारली जाते. त्यामुळे केळांना पिवळा रंग येतो. पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. सांगली शहरासह इस्लामपूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, विटा, मिरज शहरातही कार्बाईडच्या साहाय्यानेच केळी पिकविली जात आहेत. सध्या बाजारात येणारी ८५ टक्के केळी कार्बाईडयुक्त पाण्यात भिजवूनच पिकवली जात आहेत. ही केळी खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण दिल्यासारखे आहे. यामुळे पोटाचे विकार तर शंभर टक्के होतातच, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करणे बंद करून नागरिकांच्या जिवाशी खेळणे थांबवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कार्बाईडचा असाच वापर सुरु राहिल्यास नागरिकच अशा केळांवर बहिष्कार घालतील, अशी स्थिती आहे. कार्बाईडचा असा केला जातो वापरकार्बाईड पाण्यात मिसळले, तर उष्णता तयार होऊन गॅस तयार होतो. खेड्यात आणि शहरातही छोट्या टँकमधील पाण्यात कार्बाईड मिसळतात. यामध्ये केळींचा घड बुडवून काढला जातो. त्यावेळी ही उष्णता केळात उतरते आणि त्यामुळे केळी पिकतात. कार्बाईडचा अनिर्बंध वापर होतो. त्यामुळे अतिरिक्त उष्णता केळांमध्ये साठून राहते व ती पोटात जाते. त्यामुळे पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. भविष्यात कर्करोगासही बळी पडू शकतो.कार्बाईडचा वापर कसा ओळखाल?जेव्हा केळी नैसर्गिकरित्या पिकवली जातात, त्यावेळी त्याचे देठ कोमेजते (काळे पडते). नैसर्गिकरित्या पिकविलेल्या केळांचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे डाग असतात. तीच केळी कार्बाईडचा वापर करून पिकवली असतील, तर त्यांचे देठ हिरवे असते आणि केळींचा रंग हिरवट पिवळा दिसतो. केळावर डाग नसतात.