शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केळी पिकविण्यास कार्बाईडचा बेसुमार वापर

By admin | Updated: March 1, 2015 23:13 IST

व्यापाऱ्यांचा खेळ : कर्करोग, पोटाचे विकार वाढले; प्रशासनाकडून कारवाईची गरज

अशोक डोंबाळे - सांगलीतील व्यापारी केळाला चांगला रंग येण्यासाठी कार्बाईडचा वापर करीत आहेत. कार्बाईडचा वापर करून पकविलेली केळी खाणाऱ्यांना कर्करोग, पोटाचे गंभीर विकार होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.केळी, आंबा, चिकू या तीनही फळपिकातून ठोस उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्याप्रमाणात तिकडे वळू लागला आहे. परंतु, या शेतकऱ्यांना फळे व्यापाऱ्यांनी बदनाम करण्यास सुरुवात केली आहे. व्यापारी कोकणातील शेतकऱ्यांकडून आंबे विकत घेऊन फळाला चांगला रंग येण्यासाठी कार्बाईडचा वापर करीत होते. यामुळेच गेल्यावर्षी परदेशात देवगड हापूस आंबा नाकारला गेला. आंब्यावर बंदी घातली होती. कार्बाईडसह अन्य रसायने वापरून आंबा पिकविणार नसल्याची हमी केंद्र आणि राज्य शासनाने दिल्यामुळे यावर्षी आंब्याची निर्यात होणार आहे. आंबा उत्पादक आणि निर्यात करणारे व्यापारी बऱ्याच वर्षानंतर आता जागे झाले आहेत.तसेच शेतकऱ्यांकडून हिरवी केळी किलोवर घेतली जातात. सात ते पंधरा रुपये किलोने व्यापारी ती शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. ही केळी पिकविण्यासाठी आणि त्याला पिवळा रंग येण्यासाठीही कार्बाईडचा मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. कार्बाईड पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये केळीचे घड बुडवून बंद खोलीत थप्पी मारली जाते. त्यामुळे केळांना पिवळा रंग येतो. पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. सांगली शहरासह इस्लामपूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, विटा, मिरज शहरातही कार्बाईडच्या साहाय्यानेच केळी पिकविली जात आहेत. सध्या बाजारात येणारी ८५ टक्के केळी कार्बाईडयुक्त पाण्यात भिजवूनच पिकवली जात आहेत. ही केळी खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण दिल्यासारखे आहे. यामुळे पोटाचे विकार तर शंभर टक्के होतातच, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करणे बंद करून नागरिकांच्या जिवाशी खेळणे थांबवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कार्बाईडचा असाच वापर सुरु राहिल्यास नागरिकच अशा केळांवर बहिष्कार घालतील, अशी स्थिती आहे. कार्बाईडचा असा केला जातो वापरकार्बाईड पाण्यात मिसळले, तर उष्णता तयार होऊन गॅस तयार होतो. खेड्यात आणि शहरातही छोट्या टँकमधील पाण्यात कार्बाईड मिसळतात. यामध्ये केळींचा घड बुडवून काढला जातो. त्यावेळी ही उष्णता केळात उतरते आणि त्यामुळे केळी पिकतात. कार्बाईडचा अनिर्बंध वापर होतो. त्यामुळे अतिरिक्त उष्णता केळांमध्ये साठून राहते व ती पोटात जाते. त्यामुळे पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. भविष्यात कर्करोगासही बळी पडू शकतो.कार्बाईडचा वापर कसा ओळखाल?जेव्हा केळी नैसर्गिकरित्या पिकवली जातात, त्यावेळी त्याचे देठ कोमेजते (काळे पडते). नैसर्गिकरित्या पिकविलेल्या केळांचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे डाग असतात. तीच केळी कार्बाईडचा वापर करून पिकवली असतील, तर त्यांचे देठ हिरवे असते आणि केळींचा रंग हिरवट पिवळा दिसतो. केळावर डाग नसतात.