शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

येवला तालुक्‍यात युरियाची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:26 IST

जळगाव नेऊर : रुसून बसलेला मान्सूनने येवला तालुक्यात हजेरी लावल्याने उत्तर पूर्व भागात तसेच पश्चिम भागात शेतकरी पिकांना अधूनमधून पडणाऱ्या सरींवर खतांचा डोस देत आहे. मात्र, ऐन मोसमात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने ह्यइतर खते घ्या, तरच युरिया मिळेलह्ण या फतव्याने शेतकरी हैराण झाला आहेत.

ठळक मुद्देइतर खते घ्या, तरच युरिया : दुकानदारांचा नवा फतवा

जळगाव नेऊर : रुसून बसलेला मान्सूनने येवला तालुक्यात हजेरी लावल्याने उत्तर पूर्व भागात तसेच पश्चिम भागात शेतकरी पिकांना अधूनमधून पडणाऱ्या सरींवर खतांचा डोस देत आहे. मात्र, ऐन मोसमात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने ह्यइतर खते घ्या, तरच युरिया मिळेलह्ण या फतव्याने शेतकरी हैराण झाला आहेत.येवला तालुक्‍यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात असून, सोयाबीन, मका, बाजरी कापूस, मुग, तूर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. तसेच पेरणी केलेली पिके खते देणे योग्य आल्याने शेतकऱ्यांची धडपड चालू असताना युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.सोयाबीन, बाजरी, कापूस, मका या पिकांना रासायनिक खतांबरोबर योग्य प्रकारे डोस देण्यासाठी युरिया खताची आवश्यकता आहे. या पिकांना योग्यवेळी खते देण्यासाठी शेतकरी विक्रेत्यांकडे फिरत आहे. युरिया हवा असेल तर इतर विद्राव्य खतांची सक्ती केली जात आहे. केवळ युरिया हवा असेल तर विविध कारणे सांगितली जात आहेत. युरिया खत मिळविणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले असून, दुकानदाराच्या हातापाया पडण्याची वेळ आली आहे. ठराविक कंपनीचे युरिया खत बाजारात उपलब्ध असून, युरियाबरोबर इतर खत घेण्याची अट दुकानदारांकडून घातली जात आहे.प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामात खतांच्या किमती वाढल्या जातात. ऐन मोसमात युरीया खताचा डोस पिकांना मिळाला नाही तर पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कितीही पैसे घेऊन युरिया द्या, अशी मागणी शेतकरी कृषी दुकानदारांकडे करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आधिच आर्थिक अडचणीत सापडला आहे.येवला तालुक्यात युरिया खतांसाठी दुकानदार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. आज मका, बाजरी या पीकासाठी युरियाची गरज असुन दुकानदार सांगतात एक गोणी इतर कोणत्याही खताची घ्या, नंतरच एक गोणी युरियाची मिळेल, दुकानात युरिया खत शिल्लक असुन सुद्धा शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. सरकारने दुकानदारांवर लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.- श्रावण पाटील देवरे, संपर्क प्रमुख स्वाभिमानी संघटनासंग्रहित छायाचित्र (१५ जळगावनेऊर, १)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी