शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

येवला तालुक्‍यात युरियाची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:26 IST

जळगाव नेऊर : रुसून बसलेला मान्सूनने येवला तालुक्यात हजेरी लावल्याने उत्तर पूर्व भागात तसेच पश्चिम भागात शेतकरी पिकांना अधूनमधून पडणाऱ्या सरींवर खतांचा डोस देत आहे. मात्र, ऐन मोसमात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने ह्यइतर खते घ्या, तरच युरिया मिळेलह्ण या फतव्याने शेतकरी हैराण झाला आहेत.

ठळक मुद्देइतर खते घ्या, तरच युरिया : दुकानदारांचा नवा फतवा

जळगाव नेऊर : रुसून बसलेला मान्सूनने येवला तालुक्यात हजेरी लावल्याने उत्तर पूर्व भागात तसेच पश्चिम भागात शेतकरी पिकांना अधूनमधून पडणाऱ्या सरींवर खतांचा डोस देत आहे. मात्र, ऐन मोसमात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने ह्यइतर खते घ्या, तरच युरिया मिळेलह्ण या फतव्याने शेतकरी हैराण झाला आहेत.येवला तालुक्‍यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात असून, सोयाबीन, मका, बाजरी कापूस, मुग, तूर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. तसेच पेरणी केलेली पिके खते देणे योग्य आल्याने शेतकऱ्यांची धडपड चालू असताना युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.सोयाबीन, बाजरी, कापूस, मका या पिकांना रासायनिक खतांबरोबर योग्य प्रकारे डोस देण्यासाठी युरिया खताची आवश्यकता आहे. या पिकांना योग्यवेळी खते देण्यासाठी शेतकरी विक्रेत्यांकडे फिरत आहे. युरिया हवा असेल तर इतर विद्राव्य खतांची सक्ती केली जात आहे. केवळ युरिया हवा असेल तर विविध कारणे सांगितली जात आहेत. युरिया खत मिळविणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले असून, दुकानदाराच्या हातापाया पडण्याची वेळ आली आहे. ठराविक कंपनीचे युरिया खत बाजारात उपलब्ध असून, युरियाबरोबर इतर खत घेण्याची अट दुकानदारांकडून घातली जात आहे.प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामात खतांच्या किमती वाढल्या जातात. ऐन मोसमात युरीया खताचा डोस पिकांना मिळाला नाही तर पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कितीही पैसे घेऊन युरिया द्या, अशी मागणी शेतकरी कृषी दुकानदारांकडे करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आधिच आर्थिक अडचणीत सापडला आहे.येवला तालुक्यात युरिया खतांसाठी दुकानदार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. आज मका, बाजरी या पीकासाठी युरियाची गरज असुन दुकानदार सांगतात एक गोणी इतर कोणत्याही खताची घ्या, नंतरच एक गोणी युरियाची मिळेल, दुकानात युरिया खत शिल्लक असुन सुद्धा शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. सरकारने दुकानदारांवर लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.- श्रावण पाटील देवरे, संपर्क प्रमुख स्वाभिमानी संघटनासंग्रहित छायाचित्र (१५ जळगावनेऊर, १)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी