शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

कातकरी समाजासाठी उत्थान योजना तत्काळ सुरू करावी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:53 IST

ग्रामीण  अतिदुर्गम भागातील विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी जमातीतील कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्थान योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देजनसेवा मंडळ : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाचे निवेदन

पेठ : ग्रामीण  अतिदुर्गम भागातील विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी जमातीतील कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्थान योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पेठ-सुरगाणा जनसेवा मंडळ व  जनजाती कल्याण आश्रमामार्फत उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यातील कातकरी घटकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवल्या. तरीदेखील सर्वच योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एकून सहा  विभागांपैकी कोकण, पुणे, नाशिक या तीन विभागांमध्ये कातकरी जमाती असून, शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. त्यातील सहा विभागापैकी कोकण विभागामध्ये  कातकरी बांधवांच्या विकासासाठी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी अनुलोम या सामाजिक संस्थेच्या मदतीने उत्थान योजनेला शुभारंभ करून विविध उपयोजना कार्यक्रम चालू आहेत. त्याअनुषंगाने जनजाती कल्याण आश्रम व जनसेवा मंडळ यांच्यामार्फत कातकरी समाजाच्या सर्वांगीण  विकासासाठी ‘उत्थान’ योजनेअंतर्गत तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषी विभागातील कर्मचारी यांची समिती स्थापन करून कातकरी समाजाचा विकास करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.  याप्रसंगी जनजाती कल्याण आश्रमाचे स्वप्निल वाघमारे, सागर चव्हाण, जनसेवा मंडळाचे जनसेवक कमलेश वाघमारे, दिलीप महाले उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार