शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

किल्ले संवर्धनासाठी धरणे

By admin | Updated: December 16, 2015 00:19 IST

आंदोलन : सह्याद्री प्रतिष्ठान-शिवकार्य गडकोट मोहीम

नाशिक : जिल्ह्यासह राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार मागणी करूनदेखील किल्ले वाचविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ऐतिहासिक पाऊलखुणा पुसण्याच्या मार्गावर असून, महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे किल्ले व गड नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ले संवर्धनासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न करण्याच्या मागणीसाठी शिवकार्य गडकोट मोहीम व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.राज्यातील भुईकोट, समुद्री आणि डोंगरी गडकिल्ल्यांचे सर्वेक्षण करून सर्वच गडकोट संवर्धन कार्यासाठी तातडीने पूरेपूर निधी मंजूर करून किल्ले संवर्धनाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तंबू उभारून त्यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील विविध गड-किल्ल्यांची दुरवस्था दर्शविणारी छायाचित्रे लावून शासनाच्या उदासीनतेचा निषेध करत तीव्र घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमधील किल्ल्यांवर करण्यात आलेल्या विकासकामांची वास्तव चौकशी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. तीर्थक्षेत्र विकास निधी, पर्यटन निधी, वनविभागाचा निधी, खासदार-आमदार निधीमधून करण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अजिंक्य महाले, योगेश कापसे, कृष्णा भोर, विनायक येवले, पवन माळवे, अभिजित गोस्वामी, राम खुर्दळ आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)