शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

किल्ले संवर्धनासाठी धरणे

By admin | Updated: December 16, 2015 00:19 IST

आंदोलन : सह्याद्री प्रतिष्ठान-शिवकार्य गडकोट मोहीम

नाशिक : जिल्ह्यासह राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार मागणी करूनदेखील किल्ले वाचविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ऐतिहासिक पाऊलखुणा पुसण्याच्या मार्गावर असून, महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे किल्ले व गड नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ले संवर्धनासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न करण्याच्या मागणीसाठी शिवकार्य गडकोट मोहीम व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.राज्यातील भुईकोट, समुद्री आणि डोंगरी गडकिल्ल्यांचे सर्वेक्षण करून सर्वच गडकोट संवर्धन कार्यासाठी तातडीने पूरेपूर निधी मंजूर करून किल्ले संवर्धनाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तंबू उभारून त्यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील विविध गड-किल्ल्यांची दुरवस्था दर्शविणारी छायाचित्रे लावून शासनाच्या उदासीनतेचा निषेध करत तीव्र घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमधील किल्ल्यांवर करण्यात आलेल्या विकासकामांची वास्तव चौकशी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. तीर्थक्षेत्र विकास निधी, पर्यटन निधी, वनविभागाचा निधी, खासदार-आमदार निधीमधून करण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अजिंक्य महाले, योगेश कापसे, कृष्णा भोर, विनायक येवले, पवन माळवे, अभिजित गोस्वामी, राम खुर्दळ आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)