शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

आगळी गानपर्वणी नाशिककरांना लाभली

By admin | Updated: February 17, 2015 01:25 IST

आगळी गानपर्वणी नाशिककरांना लाभली

नाशिक : बालगंधर्वांपासून ते नूतन गंधर्वांपर्यंतच्या गायनशैलीची उलगडून दाखवलेली वैशिष्ट्ये, त्यांच्या जीवनपटावर टाकलेला प्रकाश...खुद्द सवाई गंधर्वांचा सभागृहात घुमलेला स्वर अन् त्यानंतर कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाचे त्यांच्याच शैलीतले गायन... अशी आगळी गानपर्वणी नाशिककरांना लाभली. निमित्त होते ‘संस्कृती वैभव’ गंधर्व महोत्सवाचे...‘संस्कृती वैभव’च्या वतीने आयोजित व मैत्रेय प्रस्तुत गंधर्व महोत्सवाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आज उत्साहात प्रारंभ झाला. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे, ‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे, संतूरवादक पं. उल्हास बापट, आमदार सीमा हिरे, ‘मैत्रेय’च्या संपादक जयश्री देसाई, ‘संस्कृती वैभव’चे अध्यक्ष नंदन दीक्षित, राधाकिसन चांडक, पी. एस. कुलकर्णी, डॉ. सुभाष पवार, रवींद्र देवधर, अरविंद पाठक, सुधीर कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गंधर्व महोत्सवाची स्मरणिका व पं. बापट लिखित ‘सहज स्वरांतून मनातलं’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘स्वरांतून मनातलं’ ही अवस्था कठीण असते. राग व अन्य नियमांच्या कडेकोट खंदकात विद्यार्थी गायन शिकतात. पुढे लिहिणारे व गाणारे वेगळे अशी तटबंदी निर्माण होते; मात्र गायक जेव्हा लिहितो, तेव्हा त्याचे सर्व भावजीवन त्यातून कळते, असे उद्गार यावेळी पं. देशपांडे यांनी पं. बापट यांच्या पुस्तकाविषयी काढले. पं. उल्हास बापट म्हणाले, वाचनाची आवड लागण्याच्या वयात वाद्यसंगीतात रमलो. पुढे माणसे वाचण्याची आवड लागली. स्मरणशक्तीतून व्यक्तिचित्रे, वृत्तीचित्रे, गुरुजनांचे अनुभव लिहून ते पुस्तकबद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार हिरे व जयश्री देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदन दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. उत्तरा मोने यांनी निवेदन केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात रसिकांना गंधर्वांच्या गायकीची झलक अनुभवायला मिळाली. बालगंधर्वांच्या आवाजातील ‘मम आत्मा गमला’ हे पद, तर सवाई गंधर्व यांचा राग शंकरा ऐकून रसिकांचे कान तृप्त झाले. देवगंधर्व, भूगंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, प्रौढ गंधर्व, गुणी गंधर्व आदिंची छायाचित्रे व माहितीच्या स्लाइड्स यावेळी चैतन्य कुंटे यांनी सादर केल्या. त्यानंतर पं. सत्यशील देशपांडे यांनी कुमार गंधर्वांचे ‘शून्य गढ शहर’ हे निर्गुणी भजन सादर केले. ‘गुरुजी मैं तो एक निरंजन’ हे पद व त्यानंतर गौरी रागातील ‘घुंघट ना खोलो जी’ ही बंदिश त्यांनी गायली. त्यांना भरत कामत (तबला) यांनी साथसंगत केली. आनंद भाटे यांनी बालगंधर्व, छोटा गंधर्व, सवाई गंधर्व व कुमार गंधर्वाच्या गायकीची वैशिष्ट्ये अप्रतिमरीत्या उलगडून दाखवली. त्यांना राजीव परांजपे (आॅर्गन), चैतन्य कुंटे (संवादिनी) व भरत कामत (तबला) यांनी साथसंगत केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)