शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

असंघटित कामगार विकासाच्या प्रवाहापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:15 IST

असंघटित कामगार दिवसाला १० ते १४ तास काम करतात. कोणत्याही सोयी-सुविधा आणि सवलती नाहीत. नोकरीची हमी किंवा कसलीही सुरक्षितता नाही, नियमितपणे काम असे ठरलेले नाही, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसानभरपाई नाही, भविष्य निर्वाह निधी आणि विमा पॉलिसीचा प्रश्न येतच नाही, त्याचप्रमाणे काही आजार झाल्यास मालकवर्गाकडून नुकसानभरपाई दिली जात नाही.

नाशिक : असंघटित कामगार दिवसाला १० ते १४ तास काम करतात. कोणत्याही सोयी-सुविधा आणि सवलती नाहीत. नोकरीची हमी किंवा कसलीही सुरक्षितता नाही, नियमितपणे काम असे ठरलेले नाही, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसानभरपाई नाही, भविष्य निर्वाह निधी आणि विमा पॉलिसीचा प्रश्न येतच नाही, त्याचप्रमाणे काही आजार झाल्यास मालकवर्गाकडून नुकसानभरपाई दिली जात नाही.असंघटित कामगार विकासाच्या प्रवाहापासून दूर जात असून, शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे बालमजुरीत मात्र वाढ होत आहे. नाशिक शहरासह राज्यातील अनेक भागांत हेच चित्र दिसून येते.असंघटित आशा कामगारांना डावलून तो फक्त कार्यालयामध्ये बसणाऱ्या कामगारांसाठी थोड्याशा सुविधा मिळतात. मात्र मोल मजुरी करणाºया कामगारांकडे शासनाचे लक्ष जात नाही तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे याकडे त्यामुळे हे असंघटित कामगार मोलमजुरी करत आपल्या लहान बालकांसह दारिद्र्र्य सहन करत असतात व बालमजुरीला येथूनच सुरुवात होत असते.आज २१व्या शतकात सुद्धा मालकवर्गाकडून, भांडवलदारांकडून असंघटित मोलमजुरी करणाºया कामगारांचे फार भयानकरीत्या शोषण होत आहे आणि त्यामुळे शोषित कामगार शोषितच राहिला आणि अस्तित्वात असलेल्या अनेक चांगल्या कामगार कायद्यांचा लाभ या कामगारांना मिळू शकला नाही. किमान वेतन कायदा असूनही या कामगारांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही. औद्योगिकदृष्ट्य अत्यंत सुधारलेल्या शहरात सुद्धा मालकवर्ग, भांडवलदार अजूनही या कामगारांचे शोषण करून एकाचे अनेक उद्योग उभे करून धनदांडगे, धनसंपन्न झालेले ठेकेदार व भांडवलदार आहे, पण त्यांची नजर या सामान्य कामगारांकडे गेलीच नाही.या असंघटित कामगारांसाठी सरकारने किती कायदे बनवले तरी सरकार त्यांच्या अंमलबजावणीकडे काटेकोरपणे लक्ष देत नाही. त्यामुळे असंघटित कामगारांमध्ये प्रचंड बालमजुरीला खतपाणी घातले गेले आहे. त्यामुळे शासनाने या असंघटित कामगारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे जेणे करून बालमजुरीकडे वळालेल्या बालकांना शिक्षणाच्या व विकासाच्या प्रवाहात आणण्यास मदत होईल.सरकारी कामगारांना पगारी सुट्टी शिवाय वेतन भत्ता व बोनसदेखील मिळते व आमच्यासारख्या मोलमजुरी करणाºया कामगारांकडे ना ठेकेदाराचे लक्ष ना शासनाचे शिवाय आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे देखील लक्ष नाही त्यामुळे आम्हाला त्यांना आमच्यासोबत कामावर घेऊन यावे लागते. पगारात वाढही नाही, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येते. असंघटित कामगारांच्या शोषण आणि पिळवणुकीविरोधात कायदे करण्यात आले.- रामदास राठोड, कामगार

टॅग्स :Nashikनाशिक