शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

भोजापूर धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:30 IST

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदीवर असणारे भोजापूर धरण गुरुवारी (दि.२३) दुपारी ११ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. सिन्नर तालुक्याचा पूर्वभाग अद्याप कोरडाठाक असल्याने पूरपाणी दुशिंगपूर व फुलेनगर बंधाºयात सोडण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदिलासा : सिन्नरच्या पूर्व भागात पूरपाणी सोडण्याची मागणी

सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण गुरुवारी ओसंडून वाहू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

 

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदीवर असणारे भोजापूर धरण गुरुवारी (दि.२३) दुपारी ११ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. सिन्नर तालुक्याचा पूर्वभाग अद्याप कोरडाठाक असल्याने पूरपाणी दुशिंगपूर व फुलेनगर बंधाºयात सोडण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवडाभर पाऊस पडल्याने ठाणगाव जवळील उंबरदरी धरण १५ आॅगस्ट रोजी भरले आहे. त्यामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सुमारे महिनाभर पावसाने विश्रांती घेतल्याने भोजापूर धरणात १७ जुलैपर्यंत ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. १६ आॅगस्टपासून पश्चिम पट्ट्यात पावसाचा पुन्हा जोर वाढल्यामुळे म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात पुन्हा एकदा १७ आॅगस्टपासून नवीन पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. धरणात येणारी पाण्याची आवक दररोज वाढत असल्याने भोजापूर धरण भरण्याकडे शेतकºयांचे लक्ष लागले होते.अवघ्या पाच दिवसात धरणात २०० दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. त्यामुळे ३६१ क्षमतेच्या भोजापूर धरणात बुधवारी (दि. २२) सकाळपर्यंत ३०४ दशलक्ष घनफूटपाणी म्हणजे ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. बुधवारी दिवसभर व रात्री म्हांळुगी नदीद्वारे धरणात पाण्याची चांगल्या प्रमाणात आवक झाल्याने धरण गुरुवारी (दि. २३) रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे.तर सांडव्यातून सुमारे १०० क्युसेक वेगाने पाणी पडत होते. चास शिवारात दुपारनतंर पाणी पोहचले होते. भोजापूर धरण भरल्याने रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावे नळपाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर परिसाराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. या परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून या वर्षी तब्बल लाभ क्षेत्रातील शेतक री करत आहे.भोजापूर धरण उशिरा का होईना पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसाच्या जोरावर धरण भरले असले तरी पूर्व भागात विशेषत: वावी परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. वावीसह पूर्व भागात अद्यापही दुष्काळसदृश परिस्थितीआहे.भोजापूर धरणातून दुशिंगपूर व फुलेनगर या बंधाºयात पूरपाणी सोडण्यासाठी चाºयांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुशिंगपूर व फुलेनगर हे दोन्ही बंधारे कोरडेठाक आहेत. भोजापूरच्या पूरपाण्याने पूर्व भागातील या बंधाºयांत पाणी सोडल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल व परिसरातील विहिरींना पाणी उतरेल. त्यामुळे पूरपाणी पूर्व भागात सोडण्याची मागणी होत आहे.