शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

उमरझरी मध्यम प्रकल्पातूनही सिंचनाची समस्या कायम

By admin | Updated: May 3, 2017 01:08 IST

तालुक्यातील सर्वात मोठे मध्यम प्रकल्प म्हणून उमरझरी मध्यम प्रकल्पाची ओळख आहे.

नाशिक : रविवारी जिल्ह्यातील बहुतांशी भागाला वादळीवारा व गारपिटीने झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाने सुमारे पाचशेहून अधिक हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल खात्याने व्यक्त केला असून, गेल्या दोन दिवसांपासून तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून शेतपिकांचे पंचनामे सुरूच असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. निफाड व इगतपुरी या दोन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हवामानातील बदल व गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे रविवारी अचानक अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी वारा, विजेचा कडकडाट करीत गारांसह कोसळलेल्या या पावसामुळे थेट जीवित हानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील उभे पीक व खळ्यात साठवून ठेवलेला माल या पावसात पूर्णपणे नष्ट झाला आहे. वाऱ्यांमुळे द्राक्षबागा कोसळल्या तर काढणीवर आलेले द्राक्षे जमिनीवर गळून पडले. कांदा, डाळींब, टोमॅटो, मिरची या नगदी पिकांनाही जोरदार फटका बसला आहे. या नुकसानीची दखल घेत सोमवारी महसूल खात्याने पीक पंचनाम्याचे आदेश तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहायकांना दिले असता प्रथमदर्शनी सुमारे पाचशे हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज आहे. या पावसामुळे निफाड व इगतपुरी तालुक्यातील प्रत्येकी सुमारे ३३ टक्के पिके उद्ध्वस्त झाली आहेत. निफाड तालुक्यात ६९ हेक्टरवरील द्राक्ष, ७८ हेक्टरवरील कांदा व ९० हेक्टरवरील भाजीपाला असे सुमारे २३७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला तर इगतपुरी तालुक्यात २० हेक्टरवरील भाजीपाला, १० हेक्टर मका व ३० हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. कळवण तालुक्यात ५१ हेक्टर कांदा, ३५ हेक्टर मिरची, ६७ हेक्टर टोमॅटो असे एकूण १७७ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. भिंत कोसळली; जनावरे दगावलीविजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील मौजे झिरे पिंपरे येथील एकनाथ यशवंत शिरसाठ हे जखमी झाले, तर यशवंत रामा सोनवणे यांच्या चार शेळ्या दगावल्या आहेत. झिरे पिंपळ येथे पावसामुळे भिंत कोसळून प्रमिला अहेर, कुणाल अहेर, कल्याणी अहेर, माऊ अहेर हे चौघे जण जखमी झाले तर असाच प्रकार देवळा शिवारात घडून माधुरी पवार, सीमा सचिन जाधव या दोन महिला जखमी झाल्या आहेत.