शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:18 IST

कांदा निर्यातबंदी आणि व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेले कांद्यासाठ्याचे निर्बंध उठविण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत येथे जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींची बैठक

पिंपळगाव बसवंत : कांदा निर्यातबंदी आणि व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेले कांद्यासाठ्याचे निर्बंध उठविण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापती व सचिवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, नाशिक जिल्हा कांदा असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, राजेंद्र डोखळे, शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे, संतू पाटील झांबरे आदी उपस्थित होते.यावेळी सुवर्णा जगताप म्हणाल्या, केंद्रीय पथक आल्यानंतरच कांद्याचे दर कमी झालेत. यात काहीअंशी आपणही दोषी आहोत. पाच हजार रुपये दर झाल्यानंतरच केंद्रीय पथक आले. त्यामुळे भाव नियंत्रणात ठेवण्याची आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले. राजेंद्र डोखळे यांनी कांद्याचेच दर का पाडले जातात, असा प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्या बंदचा निर्णय योग्य असल्याचे मत पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी मांडले.यावेळी नाशिकचे युवराज कोठुळे, चांदवडचे आत्माराम कुंभार्डे, दिंडोरीचे दत्तात्रय पाटील,देवळ्याचे केदा आहिरे, उमराणेचे सुजय पोटे, येवल्याच्या उषा शिंदे, कळवणचे धनंजय पवार, मालेगावचे राजेंद्र जाधव, मनमाडचे बिडगर, सिन्नरचे विनायक तांबे, सटाण्याचे संजय सोनवणे, नामपूरचे हेमंत कोर, नांदगावचे तेज कवडे, घोटीच्या इंदुमती गुळवे, सुरगाण्याचे लक्ष्मण गायकवाड आदींसह सचिव उपस्थित होते.बाजार समित्या शेतकºयांच्या पाठीशीबैठकीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तसेच कांदा व्यापारी यांच्यावर पाचशे क्ंिवटल कांदा विक्रीची मर्यादा घातली. यावर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार कांदाच केंद्रस्थानी ठेवून का निर्णय घेत आहे, मागील वर्षी कांद्याला मातीमोल भाव मिळाला व दोनशे रु पये प्रतिक्विंटल असे मर्यादित अनुदान दिले. ते पण फार उशिराने आणि आज शेतकरीवर्गानी पाच ते सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवला व त्यातही पन्नास टक्के खराब झाला. 2पावसाने लाल कांद्याची रोपे व लागवड केलेली कांदा रोपे खराब झाली असताना केवळ कांद्यालाच जीवनावश्यक मुद्दा बनवून कांदा निर्यातबंदी घातली गेली. मुळातच कांदा हा अल्प प्रमाणात शिल्लक असून, भारतीय बाजारपेठांतच मोठी मागणी असूनही पाहिजे तेवढा कांदा सध्या तरी उपलब्ध नाही. नवीन लाल कांदा हा दसºयापर्यंत येणे अपेक्षित होते; मात्र पावसामुळे नवीन लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.केंद्र सरकारने चुकीचा निर्णय घेतला असून, हा निर्णय मागे घ्यावा यासाठी दि. ५ आॅक्टोबरपर्यंत जर केंद्र व राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर शेतकरीवर्ग बाजार समितीमध्ये कांदा विक्रीस आणणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. तसे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने पिंपळगाव बसवंत बाजार समितीला देण्यात आले आहे. या निर्णयाचे सर्व बाजार समितीच्या सभापतींनी संमती देऊन शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी पिंपळगाव बाजार समितीचे सचिव एस. बी. पाटील, चांदवडचे जगदीश आहेर, घोटीचे जे. आर. सांगळे, कळवणचे आर. एन. हिरे, लासलगावचे एन. एस. वाढवणे, मालेगावचे ए. आर. दिसले मनमाडचे आर. के. कºहाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदा