शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:18 IST

कांदा निर्यातबंदी आणि व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेले कांद्यासाठ्याचे निर्बंध उठविण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत येथे जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींची बैठक

पिंपळगाव बसवंत : कांदा निर्यातबंदी आणि व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेले कांद्यासाठ्याचे निर्बंध उठविण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापती व सचिवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, नाशिक जिल्हा कांदा असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, राजेंद्र डोखळे, शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे, संतू पाटील झांबरे आदी उपस्थित होते.यावेळी सुवर्णा जगताप म्हणाल्या, केंद्रीय पथक आल्यानंतरच कांद्याचे दर कमी झालेत. यात काहीअंशी आपणही दोषी आहोत. पाच हजार रुपये दर झाल्यानंतरच केंद्रीय पथक आले. त्यामुळे भाव नियंत्रणात ठेवण्याची आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले. राजेंद्र डोखळे यांनी कांद्याचेच दर का पाडले जातात, असा प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्या बंदचा निर्णय योग्य असल्याचे मत पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी मांडले.यावेळी नाशिकचे युवराज कोठुळे, चांदवडचे आत्माराम कुंभार्डे, दिंडोरीचे दत्तात्रय पाटील,देवळ्याचे केदा आहिरे, उमराणेचे सुजय पोटे, येवल्याच्या उषा शिंदे, कळवणचे धनंजय पवार, मालेगावचे राजेंद्र जाधव, मनमाडचे बिडगर, सिन्नरचे विनायक तांबे, सटाण्याचे संजय सोनवणे, नामपूरचे हेमंत कोर, नांदगावचे तेज कवडे, घोटीच्या इंदुमती गुळवे, सुरगाण्याचे लक्ष्मण गायकवाड आदींसह सचिव उपस्थित होते.बाजार समित्या शेतकºयांच्या पाठीशीबैठकीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तसेच कांदा व्यापारी यांच्यावर पाचशे क्ंिवटल कांदा विक्रीची मर्यादा घातली. यावर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार कांदाच केंद्रस्थानी ठेवून का निर्णय घेत आहे, मागील वर्षी कांद्याला मातीमोल भाव मिळाला व दोनशे रु पये प्रतिक्विंटल असे मर्यादित अनुदान दिले. ते पण फार उशिराने आणि आज शेतकरीवर्गानी पाच ते सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवला व त्यातही पन्नास टक्के खराब झाला. 2पावसाने लाल कांद्याची रोपे व लागवड केलेली कांदा रोपे खराब झाली असताना केवळ कांद्यालाच जीवनावश्यक मुद्दा बनवून कांदा निर्यातबंदी घातली गेली. मुळातच कांदा हा अल्प प्रमाणात शिल्लक असून, भारतीय बाजारपेठांतच मोठी मागणी असूनही पाहिजे तेवढा कांदा सध्या तरी उपलब्ध नाही. नवीन लाल कांदा हा दसºयापर्यंत येणे अपेक्षित होते; मात्र पावसामुळे नवीन लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.केंद्र सरकारने चुकीचा निर्णय घेतला असून, हा निर्णय मागे घ्यावा यासाठी दि. ५ आॅक्टोबरपर्यंत जर केंद्र व राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर शेतकरीवर्ग बाजार समितीमध्ये कांदा विक्रीस आणणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. तसे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने पिंपळगाव बसवंत बाजार समितीला देण्यात आले आहे. या निर्णयाचे सर्व बाजार समितीच्या सभापतींनी संमती देऊन शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी पिंपळगाव बाजार समितीचे सचिव एस. बी. पाटील, चांदवडचे जगदीश आहेर, घोटीचे जे. आर. सांगळे, कळवणचे आर. एन. हिरे, लासलगावचे एन. एस. वाढवणे, मालेगावचे ए. आर. दिसले मनमाडचे आर. के. कºहाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदा