शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे पूर्ण करण्यास लागणार आणखी दोन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:49 IST

नाशिक : परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता असून, आत्तापर्यंत सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे पूर्ण करण्यास गती दिली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

ठळक मुद्देमोठ्या क्षेत्रामुळे विलंब : दोन लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता असून, आत्तापर्यंत सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे पूर्ण करण्यास गती दिली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.जिल्ह्यातील पीक पंचनामे दि. ६ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यात पीक पंचनामे करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. जिल्ह्यातही संपूर्ण यंत्रणा पंचनामा कामात गुंतली असून प्रत्यक्ष शेतांवर जाऊन वैयक्तिक पंचनामे केले जात आहेत. सुमारे ३ लाखांच्या जवळपास पीक नुकसानीचे क्षेत्र असल्यामुळे पंचनामे करण्यास काहीसा विलंब होत असला तरी येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने व्यक्त केला आहे.अनेक तालुक्यांमध्ये १२ तासांमध्ये १५० हून अधिक मिमी पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सव्वातीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनातर्फे युध्दपातळीवर सुरू आहेत. पंचनामे करताना जिरायती, बागायती तसेच बहुवार्षिक फळबागा अशा तीन टप्प्यांत पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्णातील संपूर्ण नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवस म्हणजेच शनिवारपर्यंत पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पंचनाम्यांची कामे जलदगतीने सुरू आहे.परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच चक्रीवादाळाचेदेखील सावट असल्याने पंचनामे पूर्ण करण्याच्या कामात अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.चक्रीवादळाचा धोका टळल्यामुळे पंचनामे करण्याच्या कामाला अधिक गती दिली जाणार असल्याचे जिल्हा प्रशाासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पंचनामे अचूक होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी असेदेखील आदेश देण्यात आले आहेत. एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतजिल्ह्यातील महसूल कर्मचारी आणि ग्रामसेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नुकसानीची तीव्रता लक्षात घेता कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन शेतकरी बांधवांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी