शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

लॉकडाऊन काळात दोन लाख खटले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:59 IST

नाशिक : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. न्यायव्यवस्थाही यामुळे प्रभावित झाली. मोजक्याच न्यायाधीशांच्या उपस्थितीत न्यायदान करत अत्यावश्यक खटले दाखल करून घेत न्यायनिवाड्यावर भर दिला गेला. मात्र त्यानंतरही संपूर्ण राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांत मार्च ते जुलै या कालावधीत तब्बल २ लाख २२ हजार ४३१ खटले दाखल झाले. त्यापैकी ६१ हजार ९८६ खटल्यांवर सुनावणी होऊन निकाली काढले गेले.

ठळक मुद्दे६१ प्रकरणांचा निपटारा : कोरोनाच्या सावटाखाली न्यायदान

लोकमत न्यूज नेटवर्क,नाशिक : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. न्यायव्यवस्थाही यामुळे प्रभावित झाली. मोजक्याच न्यायाधीशांच्या उपस्थितीत न्यायदान करत अत्यावश्यक खटले दाखल करून घेत न्यायनिवाड्यावर भर दिला गेला. मात्र त्यानंतरही संपूर्ण राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांत मार्च ते जुलै या कालावधीत तब्बल २ लाख २२ हजार ४३१ खटले दाखल झाले. त्यापैकी ६१ हजार ९८६ खटल्यांवर सुनावणी होऊन निकाली काढले गेले.महाराष्ट्रासह अन्य काही राज्ये वगळता देशातील दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोनाचे संक्र मणाचे वेग कमी असल्याने खूप काही कठोरपणे लॉकडाऊन पाळला गेला नाही. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वच जिल्हा व सत्र न्यायालयांत जूनअखेरपर्यंत केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी तीदेखील विविध अटी-शर्थींच्या अधीन राहून करण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविली गेली. केवळ दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी उपस्थित राहत आपापल्या आशिलांची बाजू मांडली. न्यायालयांच्या आवारात गर्दी होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेतली गेली. कर्मचारी वर्ग व न्यायालयांची संख्येतही कपात केली गेली होती.राज्यभरातील जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये या लॉकडाऊनच्या काळात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जात होती.या काळात तब्बल २ लाख २२ हजार ४३१ खटले दाखल होऊन ६१ हजार ९८६ खटले या कोरोनाच्या सावटाखाली निकाली काढले गेले. यामध्ये बहुतांशी जामीन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. व्हिडिओ कॉन्सफरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली गेली. आधुनिकपद्धतीने न्यायिकप्रक्रि या चालविली गेली आणि न्यायदान अविरतपणे सुरू ठेवण्यातआले.तातडीच्या प्रकरणांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे खटले लॉकडाऊन काळात जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये दाखल केले गेले नाही. नाशकात सुद्धा अशाचप्रकारच्या खटल्यांवर सुनावणी करण्यात आली.देशभरात चार महिन्यात १८ लाख खटले दाखलसर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या निर्देशाखाली देशभरातील न्यायालयांमध्ये न्यायदानाची प्रक्रि या लॉकडाऊनकाळात पार पाडली गेली. गेल्या २४ मार्च ते २४ जुलै या कालावधीत देशभरातील विविध न्यायालयांचे मिळून सुमारे १८ लाख तीन हजार ३२७ खटले दाखल झाले.७ लाख १९ हजार ११२ खटले निकाली काढण्यात यश आले. महाराष्ट्रात या कालावधीत २ लाख २२ हजार खटले दाखल झाले, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी ई-गव्हर्नन्स केंद्राच्या आनलाइन उद्घाटनाच्या भाषणात दिली.नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात लॉकडाऊनकाळात केवळ अतिमहत्त्वाच्या आणि तातडीच्या प्रकरणांवरच कामकाज चालले. राज्यात कोरोनासंक्र मणाचा वेग अधिक असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खबरदारीच्या उपाययोजना करत मर्यादित कर्मचारीसंख्या आणि मोजक्याच न्यायालयांत न्यायिक प्रक्रि या पार पाडली गेली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcorona virusकोरोना वायरस बातम्या