शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

लॉकडाऊन काळात दोन लाख खटले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:59 IST

नाशिक : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. न्यायव्यवस्थाही यामुळे प्रभावित झाली. मोजक्याच न्यायाधीशांच्या उपस्थितीत न्यायदान करत अत्यावश्यक खटले दाखल करून घेत न्यायनिवाड्यावर भर दिला गेला. मात्र त्यानंतरही संपूर्ण राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांत मार्च ते जुलै या कालावधीत तब्बल २ लाख २२ हजार ४३१ खटले दाखल झाले. त्यापैकी ६१ हजार ९८६ खटल्यांवर सुनावणी होऊन निकाली काढले गेले.

ठळक मुद्दे६१ प्रकरणांचा निपटारा : कोरोनाच्या सावटाखाली न्यायदान

लोकमत न्यूज नेटवर्क,नाशिक : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. न्यायव्यवस्थाही यामुळे प्रभावित झाली. मोजक्याच न्यायाधीशांच्या उपस्थितीत न्यायदान करत अत्यावश्यक खटले दाखल करून घेत न्यायनिवाड्यावर भर दिला गेला. मात्र त्यानंतरही संपूर्ण राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांत मार्च ते जुलै या कालावधीत तब्बल २ लाख २२ हजार ४३१ खटले दाखल झाले. त्यापैकी ६१ हजार ९८६ खटल्यांवर सुनावणी होऊन निकाली काढले गेले.महाराष्ट्रासह अन्य काही राज्ये वगळता देशातील दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोनाचे संक्र मणाचे वेग कमी असल्याने खूप काही कठोरपणे लॉकडाऊन पाळला गेला नाही. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वच जिल्हा व सत्र न्यायालयांत जूनअखेरपर्यंत केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी तीदेखील विविध अटी-शर्थींच्या अधीन राहून करण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविली गेली. केवळ दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी उपस्थित राहत आपापल्या आशिलांची बाजू मांडली. न्यायालयांच्या आवारात गर्दी होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेतली गेली. कर्मचारी वर्ग व न्यायालयांची संख्येतही कपात केली गेली होती.राज्यभरातील जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये या लॉकडाऊनच्या काळात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जात होती.या काळात तब्बल २ लाख २२ हजार ४३१ खटले दाखल होऊन ६१ हजार ९८६ खटले या कोरोनाच्या सावटाखाली निकाली काढले गेले. यामध्ये बहुतांशी जामीन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. व्हिडिओ कॉन्सफरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली गेली. आधुनिकपद्धतीने न्यायिकप्रक्रि या चालविली गेली आणि न्यायदान अविरतपणे सुरू ठेवण्यातआले.तातडीच्या प्रकरणांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे खटले लॉकडाऊन काळात जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये दाखल केले गेले नाही. नाशकात सुद्धा अशाचप्रकारच्या खटल्यांवर सुनावणी करण्यात आली.देशभरात चार महिन्यात १८ लाख खटले दाखलसर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या निर्देशाखाली देशभरातील न्यायालयांमध्ये न्यायदानाची प्रक्रि या लॉकडाऊनकाळात पार पाडली गेली. गेल्या २४ मार्च ते २४ जुलै या कालावधीत देशभरातील विविध न्यायालयांचे मिळून सुमारे १८ लाख तीन हजार ३२७ खटले दाखल झाले.७ लाख १९ हजार ११२ खटले निकाली काढण्यात यश आले. महाराष्ट्रात या कालावधीत २ लाख २२ हजार खटले दाखल झाले, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी ई-गव्हर्नन्स केंद्राच्या आनलाइन उद्घाटनाच्या भाषणात दिली.नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात लॉकडाऊनकाळात केवळ अतिमहत्त्वाच्या आणि तातडीच्या प्रकरणांवरच कामकाज चालले. राज्यात कोरोनासंक्र मणाचा वेग अधिक असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खबरदारीच्या उपाययोजना करत मर्यादित कर्मचारीसंख्या आणि मोजक्याच न्यायालयांत न्यायिक प्रक्रि या पार पाडली गेली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcorona virusकोरोना वायरस बातम्या