शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात दोन मुलींचा विहिरीत बुडून अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:14 IST

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा येथे विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे नेहमी सोबत राहणाऱ्या जिवलग मैत्रिणींचा सोबतच करुण अंत

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा येथे विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील सावरपाडा येथील पल्लवी विश्वनाथ वाघमारे (१२), नीलम धर्मराज गवारी (१५) आणि कल्पना नामदेव गुंबाडे (१०) या तिघी मैत्रिणी कपडे धुण्यासाठी मंगळवारी (दि.१) दुपारच्या सुमारास सावरपाडा शिवारातील विहिरीवर गेल्या होत्या. कपडे धुऊन झाल्यानंतर पल्लवी आणि नीलम विहिरीच्या पाण्यात अंघोळ करू लागल्या. अचानक पल्लवी पाण्यात बुडायला लागल्याचे बघून नीलम तिला वाचवण्यासाठी धडपड करू लागली; पण दुर्दैवाने दोघीही पाण्यात बुडू लागल्या. विहिरीच्या काठावर बसलेल्या कल्पनाने आपल्या मैत्रिणींना पाण्यात बुडताना पाहून एकच आक्रोश करत गावात जाऊन ग्रामस्थांना बोलावून आणले.ग्रामस्थांनी या दोघींना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले; पण दुर्दैवाने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले आणि पल्लवी व नीलम या दोघी जिवलग मैत्रिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील नेहमी सोबत राहणाऱ्या जिवलग मैत्रिणींचा सोबतच करुण अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात सीआरपीसी १७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गाढेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वसावे, हवालदार उशिरे, पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गावित, मोरे, घुटे हे करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू