शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सीता सरोवरात बुडून दोघा मित्रांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:25 IST

म्हसरूळ शिवारात असलेल्या सीता सरोवर येथे आंघोळीसाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल राजेंद्र साळुंखे (३४) व हेमंत श्रीधर गांगुर्डे (३३) अशी मयत झालेल्यांची नावे असून, अन्य तिघे मात्र बचावले आहेत.

ठळक मुद्देतिघे बचावले : रात्री आंघोळीसाठी उतरले पाण्यात

नाशिक : म्हसरूळ शिवारात असलेल्या सीता सरोवर येथे आंघोळीसाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल राजेंद्र साळुंखे (३४) व हेमंत श्रीधर गांगुर्डे (३३) अशी मयत झालेल्यांची नावे असून, अन्य तिघे मात्र बचावले आहेत.स्वामीनगर येथे राहणारा हर्षल साळुंखे, म्हसरूळ गावातील रहिवासी हेमंत गांगुर्डे व त्यांचे मित्र संजय बोंबले, दवंगे, विभांडिक असे पाच मित्र गुरुवारी (दि.२१) दिवसभर बरोबर होते. रात्री ११ वाजता पाचही जण म्हसरूळ शिवारातील सीता सरोवर येथील प्राचीन कुंडाजवळ गेले होते. त्यावेळी काहींना आंघोळ करण्याचा मोह झाल्याने ही घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.पाच मित्रांपैकी साळुंखे, गांगुर्डे आणि दवंगे असे तिघे पाण्यात आंघोळीसाठी उतरले, तर बोंबले आणि विभांडिक हे थंडी वाजते म्हणून ते कुंडाबाहेर थांबले. साळुंखे, गांगुर्डे व दवंगे या तिघांनी पाण्यात उड्या घेतल्यानंतर दवंगे याला पोहता येत असल्याने तो पाण्यातून कुंडाबाहेर आला, मात्र गांगुर्डे आणि साळुंखे पाण्यात गटांगळ्या खाऊन पाण्यात बुडू लागले तेव्हा दवंगे याने पुन्हा पाण्यात उडी मारून त्यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शोध घेतला असता ते मिळून आले नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू