शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:29 IST

दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे.

नाशिक : दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे.  जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, रविवारी दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे राहणारे बाळासाहेब विठोबा कावळे (५२) यांनी आपल्या स्वत:च्या द्राक्षबागेतच विषारी औषध सेवन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कावळे यांच्या नावे बोपेगाव येथे गट नंबर ४६४ मध्ये ०.५० आर एवढे क्षेत्र असून, त्यांच्या नावे कर्ज आहे किंवा नाही याचा उलगडा प्राथमिक चौकशीत होऊ शकला नाही. मात्र तलाठी व पोलीस यंत्रणेने घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास केला जात आहे. तत्पूर्वी भाऊबीजच्या दिवशीच दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथे राहणाºया राहुल विश्वनाथ गवळी या २१ वर्षीय तरुण शेतकºयाने दुपारी एक वाजता विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. राहुल याच्या नावावर शेतजमीन नसली तरी, त्याचे वडील विश्वनाथ मनोहर गवळी यांच्या नावे टिटवे येथे गट नंबर ८३ मध्ये २.६७ आर सामाईक क्षेत्र आहे. त्यामुळे राहुल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली काय याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने यासंदर्भात अधिक चौकशी सुरू केली आहे.ऐन दिवाळीत दोघा शेतकºयांच्या लागोपाठच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, यंदा दुष्काळी परिस्थिती, चारा, पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतकºयांचे आत्महत्या सत्र थोपविण्याची मोठी जबाबदारी शासनावर येऊन पडली आहे. आजपावेतो ८८ शेतकºयांनी विविध मार्गांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या