शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:29 IST

दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे.

नाशिक : दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे.  जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, रविवारी दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे राहणारे बाळासाहेब विठोबा कावळे (५२) यांनी आपल्या स्वत:च्या द्राक्षबागेतच विषारी औषध सेवन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कावळे यांच्या नावे बोपेगाव येथे गट नंबर ४६४ मध्ये ०.५० आर एवढे क्षेत्र असून, त्यांच्या नावे कर्ज आहे किंवा नाही याचा उलगडा प्राथमिक चौकशीत होऊ शकला नाही. मात्र तलाठी व पोलीस यंत्रणेने घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास केला जात आहे. तत्पूर्वी भाऊबीजच्या दिवशीच दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथे राहणाºया राहुल विश्वनाथ गवळी या २१ वर्षीय तरुण शेतकºयाने दुपारी एक वाजता विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. राहुल याच्या नावावर शेतजमीन नसली तरी, त्याचे वडील विश्वनाथ मनोहर गवळी यांच्या नावे टिटवे येथे गट नंबर ८३ मध्ये २.६७ आर सामाईक क्षेत्र आहे. त्यामुळे राहुल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली काय याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने यासंदर्भात अधिक चौकशी सुरू केली आहे.ऐन दिवाळीत दोघा शेतकºयांच्या लागोपाठच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, यंदा दुष्काळी परिस्थिती, चारा, पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतकºयांचे आत्महत्या सत्र थोपविण्याची मोठी जबाबदारी शासनावर येऊन पडली आहे. आजपावेतो ८८ शेतकºयांनी विविध मार्गांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या