शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

दोघा भावांचा तळ्यात पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 23:09 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील लोणवाडीतील घटना : अद्याप पोलिसांकडे नोंद नाही

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात राहणाऱ्या माणिक लक्ष्मण गायकवाड यांची दोन मुले कुणाल ( ४) व गौरव (७) ही शेततळ्याच्याच परिसरात खेळत असताना, अचानक कुणाल पाण्यात पडला. त्यावेळी परिसरात कोणीही नव्हते. भाऊ तळ्यात पडल्याचे लक्षात येताच गौरवने आरडाओरडा केला, मात्र कोणीच मदतीला नसल्याने, गौरव स्वतः आपल्या भावाला वाचविण्यासाठी तळ्यात उतरला. मात्र छोट्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.दरम्यान माणिक लक्ष्मण गायकवाड यांना आपली दोन्ही मुले जवळपास न दिसल्याने त्यांनी गौरव आणि कुणाल यांचा शोध घेतला. पण त्यांना दोघे कुठेही दिसले नाहीत. त्यांनी तळ्यात बघितले असता दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.कुणाल आणि गौरव हे दोघेही सोडून गेल्याने संपूर्ण गाव शोकमग्न बनला होता. शोकाकुल वातावरणात या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते आणि आजी असा परिवार आहे.दरम्यान, ही घटना बुधवारी (दि.१६) घडली. मात्र पोलीस ठाण्यात त्याची अद्याप १३ दिवसांनंतरही नोंद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटना घडून आज १३ दिवस झाले, मात्र या घटनेची नोंद अद्यापही केलेली नाही.घटनेला १३ दिवस...लोणवाडीतील या दोन चिमुकल्यांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून अंत झाल्याची घटना बुधवारी (दि. १६) घडली. मात्र याची पोलीस दरबारी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. घटनेच्या दोन आठवड्यांनंतरही अद्याप पोलिसात नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.देशसेवेत पाठविण्याचे स्वप्न अधुरेवडील माणिक गायकवाड यांचे बंधू संदीप गायकवाड हे पोलीस सेवेत मुंबईमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुणाल आणि गौरव पोलीस आणि देशसेवेत जाणार असल्याचे स्वप्न लहान असतानाच बघत होते. मात्र काळाने त्यांना हिरावून नेले.अल्पभूधारक शेतकरीअवघी दोन बिघा जमीन. त्यात दोघे भाऊ. एक मुंबईमध्ये पोलीस, तर दुसरा शेती व्यवसाय करतो. त्यास कुणाल आणि गौरव अशी दोन मुले असल्याने, जमीन न करता त्यांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र नियतीने ते स्वप्न धुळीस मिळवले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू