शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

दोघा भावांचा तळ्यात पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 23:09 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील लोणवाडीतील घटना : अद्याप पोलिसांकडे नोंद नाही

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात राहणाऱ्या माणिक लक्ष्मण गायकवाड यांची दोन मुले कुणाल ( ४) व गौरव (७) ही शेततळ्याच्याच परिसरात खेळत असताना, अचानक कुणाल पाण्यात पडला. त्यावेळी परिसरात कोणीही नव्हते. भाऊ तळ्यात पडल्याचे लक्षात येताच गौरवने आरडाओरडा केला, मात्र कोणीच मदतीला नसल्याने, गौरव स्वतः आपल्या भावाला वाचविण्यासाठी तळ्यात उतरला. मात्र छोट्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.दरम्यान माणिक लक्ष्मण गायकवाड यांना आपली दोन्ही मुले जवळपास न दिसल्याने त्यांनी गौरव आणि कुणाल यांचा शोध घेतला. पण त्यांना दोघे कुठेही दिसले नाहीत. त्यांनी तळ्यात बघितले असता दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.कुणाल आणि गौरव हे दोघेही सोडून गेल्याने संपूर्ण गाव शोकमग्न बनला होता. शोकाकुल वातावरणात या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते आणि आजी असा परिवार आहे.दरम्यान, ही घटना बुधवारी (दि.१६) घडली. मात्र पोलीस ठाण्यात त्याची अद्याप १३ दिवसांनंतरही नोंद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटना घडून आज १३ दिवस झाले, मात्र या घटनेची नोंद अद्यापही केलेली नाही.घटनेला १३ दिवस...लोणवाडीतील या दोन चिमुकल्यांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून अंत झाल्याची घटना बुधवारी (दि. १६) घडली. मात्र याची पोलीस दरबारी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. घटनेच्या दोन आठवड्यांनंतरही अद्याप पोलिसात नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.देशसेवेत पाठविण्याचे स्वप्न अधुरेवडील माणिक गायकवाड यांचे बंधू संदीप गायकवाड हे पोलीस सेवेत मुंबईमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुणाल आणि गौरव पोलीस आणि देशसेवेत जाणार असल्याचे स्वप्न लहान असतानाच बघत होते. मात्र काळाने त्यांना हिरावून नेले.अल्पभूधारक शेतकरीअवघी दोन बिघा जमीन. त्यात दोघे भाऊ. एक मुंबईमध्ये पोलीस, तर दुसरा शेती व्यवसाय करतो. त्यास कुणाल आणि गौरव अशी दोन मुले असल्याने, जमीन न करता त्यांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र नियतीने ते स्वप्न धुळीस मिळवले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू