शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दोघा भावांचा तळ्यात पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 23:09 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील लोणवाडीतील घटना : अद्याप पोलिसांकडे नोंद नाही

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात राहणाऱ्या माणिक लक्ष्मण गायकवाड यांची दोन मुले कुणाल ( ४) व गौरव (७) ही शेततळ्याच्याच परिसरात खेळत असताना, अचानक कुणाल पाण्यात पडला. त्यावेळी परिसरात कोणीही नव्हते. भाऊ तळ्यात पडल्याचे लक्षात येताच गौरवने आरडाओरडा केला, मात्र कोणीच मदतीला नसल्याने, गौरव स्वतः आपल्या भावाला वाचविण्यासाठी तळ्यात उतरला. मात्र छोट्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.दरम्यान माणिक लक्ष्मण गायकवाड यांना आपली दोन्ही मुले जवळपास न दिसल्याने त्यांनी गौरव आणि कुणाल यांचा शोध घेतला. पण त्यांना दोघे कुठेही दिसले नाहीत. त्यांनी तळ्यात बघितले असता दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.कुणाल आणि गौरव हे दोघेही सोडून गेल्याने संपूर्ण गाव शोकमग्न बनला होता. शोकाकुल वातावरणात या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते आणि आजी असा परिवार आहे.दरम्यान, ही घटना बुधवारी (दि.१६) घडली. मात्र पोलीस ठाण्यात त्याची अद्याप १३ दिवसांनंतरही नोंद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटना घडून आज १३ दिवस झाले, मात्र या घटनेची नोंद अद्यापही केलेली नाही.घटनेला १३ दिवस...लोणवाडीतील या दोन चिमुकल्यांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून अंत झाल्याची घटना बुधवारी (दि. १६) घडली. मात्र याची पोलीस दरबारी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. घटनेच्या दोन आठवड्यांनंतरही अद्याप पोलिसात नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.देशसेवेत पाठविण्याचे स्वप्न अधुरेवडील माणिक गायकवाड यांचे बंधू संदीप गायकवाड हे पोलीस सेवेत मुंबईमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुणाल आणि गौरव पोलीस आणि देशसेवेत जाणार असल्याचे स्वप्न लहान असतानाच बघत होते. मात्र काळाने त्यांना हिरावून नेले.अल्पभूधारक शेतकरीअवघी दोन बिघा जमीन. त्यात दोघे भाऊ. एक मुंबईमध्ये पोलीस, तर दुसरा शेती व्यवसाय करतो. त्यास कुणाल आणि गौरव अशी दोन मुले असल्याने, जमीन न करता त्यांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र नियतीने ते स्वप्न धुळीस मिळवले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू