शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मेसनखेडेत दोन एकर कांदा रोपे गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:05 IST

चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारातील गट नं. दोनशे अकरामधील रंजना संजय खताळ यांचे पाझर तलावालगतचे दोन एकर लागवड केलेले कांद्याचे क्षेत्र वाहून गेले.

ठळक मुद्देशासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी

चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारातील गट नं. दोनशे अकरामधील रंजना संजय खताळ यांचे पाझर तलावालगतचे दोन एकर लागवड केलेले कांद्याचे क्षेत्र वाहून गेले.जमिनीतील पूर्णपणे माती खरडली गेल्याने आत खडकावर आल्याने हे शेतकरी कुटुंब हतबल झाले असून, बळीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे चांदवड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते; परंतु दि. १ नोंव्हेबर रोजी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मेसनखेडे शिवारातील रंजना संजय खताळ या महिलेचे दोन एकर लागवड केलेल्या कांद्यातून पाझर तलावातील पाणी गेल्याने संपूर्ण कांदा पीक शेतातील मातीसहीत वाहून गेले आहे.खताळ यांना कांद्याचे शेत तयार करण्यापासून ते लागवडीपर्यंत एक लाखाच्यावर खर्च आला आहे. शासनाने त्वरित नुकसानभरपाईद्यावी, अशी मागणी खताळ यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणी