शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बारा टँकर घटले

By admin | Updated: July 1, 2016 00:21 IST

दुष्काळी तालुक्यांमध्ये पाऊस : अन्यत्र ओढ

 

 नाशिक : पावसाळा सुरू होेऊन तीन आठवडे उलटले असून, अजूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नसला तरी, जो काही पडला त्यामुळे काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने दुष्काळी तालुक्यातील बारा टॅँकर कमी झाले, तर देवळा व सिन्नर या दोन तालुक्यांत नव्याने टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, दरवर्षी पावसाचे माहेरघर म्हणून झोडपून काढणाऱ्या पावसाने इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा या चार तालुक्यांकडे पाठ फिरविली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्णातील २४१ गावे, ५५७ वाड्यांना २४७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. आठवडाभरात झालेल्या पावसामुळे टॅँकरची संख्या बाराने घटली आहे. विशेष म्हणजे पावसाने नांदगाव, मालेगाव, इगतपुरी व येवला तालुक्यात हजेरी लावल्यामुळे या तालुक्याचा पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली असली, तरी पावसाने पाठ फिरविल्यामुळे देवळा व सिन्नर या दोन तालुक्यांच्या मागणीवरून नव्याने प्रत्येकी एक टॅँकर सुरू करण्यात आल्याने जिल्ह्णातील २३१ गावे, ५८८ वाड्यांना २३७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिन्याच्या एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत यंदा फक्त ६१ टक्केच पाऊस नोंदविला गेला असून, इगतपुरीत ४२ टक्के, पेठ, त्र्यंबकेश्वर १५ टक्के व सुरगाणा १९ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामानाने कमी पावसाची सरासरी असलेल्या सिन्नरला ११५ टक्के, नांदगावला ९३ टक्के, चांदवडला ८६ टक्के, देवळ्याला ७६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ३० जून रोजी जिल्ह्णाच्या सरासरीच्या १६३ टक्के पाऊस नोंदविला गेला होता.