शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला साडेबारा हजार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोना संसर्गामुळे गतवर्षी अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. याहीवर्षी कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी जिल्ह्यात कोरोना ...

नाशिक : कोरोना संसर्गामुळे गतवर्षी अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. याहीवर्षी कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी जिल्ह्यात कोरोना नियमांचे पालन करत जवळपास साडेबारा हजार लग्नसोहळे उरकण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. गतवर्षी ऐन लग्नसराईत कोरोनाने पाय पसरले होते. त्यामुळे लग्नतारखा जाहीर झाल्यानंतरही अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. त्यानंतर मध्यंतरी कोरोनाची रुणसंख्या कमी झाली होती. त्यामुळे पुन्हा लग्नसोहळे आयोजित करण्यात येत होते. मंगल कार्यालये बुकिंग करून ठेवले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. केवळ ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली. ५० जणांना परवानगी असली तरी अनेक ठिकाणी शेकडो नातेवाइकांनी लग्नसोहळ्यास उपस्थिती लावली. ग्रामीण भागात तर धूमधडाक्यात लग्नसोहळे आयोजित करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास १२ हजार ५२५ लग्नसोहळे पार पडले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात बहुतांश ठिकाणी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची नजर चुकवून लग्नसोहळे आयोजित करण्यात आले. त्याचवेळी कोरोना नियमांचे पालनही करण्याचा प्रयत्न झाला.

१२४६ जोडप्यांनी केली विवाहाची नोंदणी

नाशिक येथील सह. दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालयातील विशेष विवाह अधिकारी यांच्याकडे गेल्या वर्षभरात ७१९ विशेष विवाहांची नोंदणी झाली तर १७६ जोडप्यांनी ‘फॉर्म १६’ भरून विवाहाची नोंद केली तर चालू वर्षाच आतापर्यंत २८६ विशेष विवाहांसह ६५ विवाहांची फॉर्म १६ अंतर्गत नोंदणी झाली असून कोरोनाच्या संकटात गेल्यावर्षापासून आतापर्यंत सुमारे १ हजार २४६ जोडप्यांनी उपनिबंधक कार्यालयात विवाहाची नोंद केली असून रजिस्टर पद्धतीने विवाहाकडे नागरिकांचा कल वाढत असल्याची माहिती विशेष विवाह अधिकारी संजय ठाकरे यांनी दिली.

तीन महिन्यांत ३१ विवाह मुहूर्त

जिल्ह्यात जवळपास १२ हजार ५२५ हजार विवाह झाले असले तरी अजूनही एप्रिल ते जून या महिन्यात ३१ विवाह मुहूर्त आहेत. त्यात एप्रिल महिन्यात २२, २४, २५.२६.२८.२९, ३० (७ मुहूर्त) मे महिना : १,२,३,४,५,८,१३, १५.२०,२१.२२,२४, २६. २८,३०, ३१

(१६ मुहूर्त) जून महिना : ४.६.१३,१६,२०,२६.२७,२८ (८ मुहूर्त) असे एकूण ३१ मुहूर्त आहेत.

एप्रिल महिना कठीण

जिल्ह्यात सध्या कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही ठिकाणी लग्नसोहळे आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेता एप्रिल महिन्यात विवाह सोहळे आयोजित करणे कठीण असून अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

विवाह उद्योगाला पाचशे कोटींचा फटका

नाशिक शहर परिसरात सुमारे तीनशे लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. एका लॉन्सला एका हंगामात किमान शंभर विवाह सोहळ्यांचे आयोजन होते. त्यामुळे एका लाॅनचालकाची जवळपास ५ कोटींची उलाढाल ठप्प झाली असून नाशिकमधील कॅटरिंग, डेकोरेटर्स, बँड, किराणा या विविध घटकांसह विवाह उद्योगाला जवळपास पाचशे कोटींचा फटका बसला आहे. असे असतानाही लॉनचालकांचा कडक लॉकडाऊनला पाठिंबा असून गरज पडल्यास लॉन प्रशासनाला वापरासाठी देण्याची व्यावसायिकांची तयारी आहे.

- समाधान जेजूरकर, सह. सचिव, लॉन मंगल कार्यालय असोसिएशन चालक

---

कोरोनासारख्या आपत्तीमुळे पूर्ण व्यवसाय ठप्प झाला असून लॉन व मंगल कार्यालयांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन भरून द्यावा लागत आहे. अशा परिस्थितीतही लॉन व मंगल कार्यालये असोसिएशन्सने प्रशासनाला संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतली असून शासनाने १५ दिवस अतिशय कडक निर्बंध लावावे. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी काही विवाह सोहळे होऊ शकतील. त्यासाठी शासनाने कडक भूमिका घ्यावी, ही कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सुविधा पुरविण्याची असोसिएशनची तयारी आहे.

- सुनील चोपडा, अध्यक्ष, लॉन्स व मंगल कार्यालये असोसिएशन, नाशिक