शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने अडचणीत

By admin | Updated: September 26, 2015 23:26 IST

श्रीराम शेटे : कादवा कारखान्याची वार्षिक सभा

दिंडोरी : यंदा साखरेचे भाव कोसळल्याने सर्वच कारखान्यांपुढे एफ आर पी कशी द्यायची हा प्रश्न पडला असून अनेक कारखान्यांचे गळीत हंगामावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे या अडचणीच्या काळात कादवा कारखाना सुरळीत सुरु राहण्यासाठी सभासदांनी सकारात्मक सहकार्य करावे असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.जिल्ह्यात सहकारी तत्वावर सुरु असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली कारखाण्याच्या प्रांगणात आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी श्रीराम शेटे बोलत होते. किरकोळ अपवाद वगळता सभा शांततेत पार पडली. प्रारंभी गत हंगामात सर्वाधिक उस पुरवठा करणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान कारखान्याने शासनाने जाहीर केलेल्या एफ आर पी (आधारभुत किंमत) मिळावी अशी मागणी सुरेश डोखळे, सचीन बर्डे यांनी केली. सचिन बर्डे यांनी कर्ज काढून रक्कम द्यावी तर सुरेश डोखळे यांनी एफ आर पी कसी द्यायची व कारखाना कसा सुरु ठेवायचा हि जबाबदारी संचालक मंडळाने पार पाडावी असे सांगत परतीच्या ठेवी ठेवण्यास विरोध केला तसेच चार महिन्यापूर्वी नफ्यात असलेला कारखाना तोट्यात कसा गेला असा सवाल उपस्थित केला. बाळासाहेब कामाले अँड विलास निरगुडे, नरेंद्र जाधव माजी संचालक जे डी केदार, संजय कावळे,संपत कावळे, राजदेव आदींनी देखील काही प्रश्न उपस्थीत केले. बापू संधान तानाजी माळी आदि सभासदांनी ठेव ठेवण्याचे मान्य करत कारखान्यास सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे सांगितले राजेंद्र उफाडे यांनी यापूर्वी इतर कारखान्यांना उस देणार्या सभासदांनी कारखाना बंद राहील असी भूमिका घेवू नये असे सांगितले. तर संपत कावळे यांनी ऊस उत्पादक व बिगर ऊस उत्पादक असा भेद न व निर्माण केला जाणार वाद चुकीचा असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी निफाड निसाका वसाका ची जशी परिस्थिती झाली तसी होवू न देण्यासाठी सर्व सभासदांनी कारखान्यास सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगत या प्रश्नवर कुणीही राजकारण करू नये असे आवाहन केले सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कादवाचे अध्यक्ष- श्रीराम शेटे म्हणाले की, राज्यात साखरेचे भाव कोसळल्याने देशभरात सर्वच कारखान्यांना आधारभुत किंमत कशी द्यायची असा प्रश्न पडला असुन साखरेचे भाव कमी मिळाल्याने उत्पादन खर्च कमी होत एफ आर पी ची किंमती शी त्याचा ताळमेळ होत देशातील सर्वच कारखाने कर्ज बाजारी झाले आहे. अशाही परिस्थीतीत कादवाने १८४४ रुपये उस उत्पादकांना अदा केले असुन उर्वरीत रक्कम शिल्लक साखर विक्र ी करु न अदा करण्यात येईल. मात्र शासनाने या मिहणा अखेर साखर कारखान्यांनी पर्यंत पुर्ण आधारभुत किंमत नाही दिली तर गाळप परवाना न देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी गाळप हंगाम कसा सुरु करायचा असा प्रश्न पडला आहे. यावर आपण सभासदांना आता यातून काय मार्ग काढायचे हे विचारले असून रु पये 273 परतीची ठेव देण्याचा पर्याय काही सभासदांनी सुचवला व त्यास या सभेने मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावर कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष उत्तम भालेराव, जि.प.चे उपाध्यक्ष प्रकाश वडजे, आमदार नरहरी झरिवाळ, जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील, दिंडोरी कृउबा चे सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती अनील देशमुख, जे.डी. केदार, सुरेश डोखळे, भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे, अ‍ॅड. विलास निरगुडे, विश्वास देशमुख, विलास कड, नामदेव घडवजे, नरेंद्र जाधव, कादवाचे सचीव बाळासाहेब उगले आदींसह सर्व संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थीत होते.