शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निर्यात अनुदान बंद केल्याने कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 15:04 IST

सिन्नर : कांदा निर्यातीवरील १० टक्के अनुदान केंद्र शासनाने बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याचा परिणाम बुधवारी सिन्नर कृषी उत्पन्न बाजारात दिसून आला.

सिन्नर : कांदा निर्यातीवरील १० टक्के अनुदान केंद्र शासनाने बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याचा परिणाम बुधवारी सिन्नर कृषी उत्पन्न बाजारात दिसून आला. येथे सरासरी १०० रूपये क्विंटल दराने कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांत काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गेल्या वर्षभरात कांद्याच्या घसरत्या दराने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र, गेल्या महिनाभरात दरात सुधारणा झाल्याने शेतक-यांत समाधानाचे वातावरण होते. कांद्याचे दर सुधारत असतानाच भविष्यात खूप दरवाढ होऊ नये यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात अनुदान बंद केल्याची बातमी धडकताच त्याचे दृश्य परिणाम बाजार समित्यांमध्ये दिसायला सुरूवात झाली आहे. दरातील या घसरणीने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि. १०) ७ हजार ६८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. या दिवशी जास्तीत जास्त १४९० रूपये तर सरासरी १३७५ रूपये क्विंटल दराने व्यापाºयांनी कांद्याची खरेदी केली. मंगळवारी १९७५ क्विंटल आवक झाली होती. जास्तीत जास्त १३७५ तर सरासरी १२७५ रूपये दर कांद्यास मिळाला. बुधवारी सरासरी दरात आणखी १०० रूपयांची घसरण झाल्याचे दिसले. अवघी १७२० क्विंटल कांद्याची आवक होऊनही जास्तीत जास्त १३१५ रूपये तर सरासरी ११७५ रूपये दराने कांदा विकला गेला. सध्या खरीप हंगाम उभा करण्यासाठी शेतकरी कांदे बाजारात आणून पैसे मोकळे करत आहेत. मात्र, दरात घसरण झाल्याने त्यांना कमी दरात कांद्याची विक्री करणे भाग पडणार आहे. परिणामी ढासळत्या दरामुळे आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेण्याच्या वल्गना करणा-या युती शासनाने लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच कांद्याच्या निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने शेतक-यांत हा चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक