शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

By admin | Updated: November 30, 2015 23:39 IST

नाशिकमध्ये अंमलबजावणी : शासनाचा केला धिक्कार

नाशिक : जलसंपदा मंत्रालयाने गंगापूर आणि दारणा धरणांतून नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात केल्यानंतर महापालिकेने पाणी नियोजनासंबंधी तातडीने बोलाविलेल्या महासभेत शहरात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन महिन्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन एक दिवसाआड पाणीपुरवठ्यावर विचार केला जाणार आहे. दरम्यान, महासभेत भाजपा वगळता सर्व पक्षांच्या सदस्यांनी काळे डगले घालून शासनाचा निषेध नोंदविला.

महापौर अशोक मुर्तडक यांनी सुमारे सहा तास चाललेल्या महासभेत सदस्यांनी सुचविलेल्या विविध उपाययोजनांचा विचार करत डिसेंबर २०१५ आणि जानेवारी २०१६ या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दोन महिन्यांत एकवेळ पाणीपुरवठ्या व्यतिरिक्त अतिरिक्त सुमारे १०० दलघफू पाण्याची बचत होणार आहे. त्याचबरोबर महापौरांनी दारणा धरणातील १५० दलघफू आणि एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी सोडण्यात येणारे ३०० दलघफू पाण्याचे आरक्षणही गंगापूर धरणाकडे वर्ग करण्याची सूचना केली. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षीय शिष्टमंडळाने भेट घेण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, पाणी आरक्षणात कपात झाल्याने ओढवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी शहरातील विहिरींचे अधिग्रहण व त्यांची स्वच्छता करणे, बोअरवेल्स खोदणे, टॅँकरने पाणीपुरवठा करणे यासाठी खर्च येणार असल्याने शासनाकडे २० कोटी रुपयांची मागणीही करण्याचा निर्णय घेण्यात आला. दि. ४ डिसेंबरला उच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणीसाठी महापालिकेमार्फत निष्णात वकील देण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय पाणीबचतीसाठी नागरिकांचे प्रबोधन करतानाच भविष्यात पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता मोठे जनआंदोलन उभारण्यावर सभागृहाचे एकमत झाले. (प्रतिनिधी)

चणकापूर, हरणबारीचा आज फैसला

समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या आधारे जळगाव शहरासाठी चणकापूर, हरणबारीसह चार धरणांतून गिरणा धरणात पाणी सोडण्याच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक होत असून, या धरणांमधून पाणी सोडण्यास कसमादेच्या लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांनी केलेला विरोध तसेच गंगापूर व दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर जिल्ह्यात सर्वपक्षीय नेते, शेतकर्‍यांचा उठलेला क्षोभ लक्षात घेता खुद्द पाटबंधारे खातेच जळगावसाठी पाणी सोडण्यास अनुत्सुक असल्याचे वृत्त आहे.