शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

यशस्वी करिअरसाठी त्रिसूत्रीची आवश्यकता - अविनाश धर्माधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:00 IST

‘स्व’ची ओळख, त्यानुसार कामाच्या क्षेत्राची निवड आणि निवड केलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी तपश्चर्या करण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वी करिअर करता येते, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले़

नाशिक : ‘स्व’ची ओळख, त्यानुसार कामाच्या क्षेत्राची निवड आणि निवड केलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी तपश्चर्या करण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वी करिअर करता येते, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले़ दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘दहावी-बारावीनंतर काय’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते़  करिअरबाबत अधिक मार्गदर्शन करताना धर्माधिकारी यांनी सांगितले की, केवळ डॉक्टर, इंजिनिअर होणे म्हणजेच करिअर नव्हे, तर त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत असणे म्हणजे करिअर होय़ नृत्य, संगीत, शेती, अभिनय, खेळ अशी करिअरचीवेगवेगळे क्षेत्र असून, यामधील सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन हे त्यांच्या क्षेत्रातील राजे आहेत़ प्रत्येकाला आपापल्या आवडीच्या क्षेत्रात राजा होता आले पाहिजे़ हे राजा होणे म्हणजे त्रिसूत्रीचा अंगीकार करणे होय़ करिअरचा कल कोठे आहे, काय येते, किती समजते यावर करिअरची दिशा अवलंबून असते़ त्यामुळे मनाचा, बुद्धीचा कल कोठे आहे हे समजणे गरजेचे आहे़  मेंदू असलेला व इजा न झालेला प्रत्येक जण बुद्धिमान आहे. मात्र प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असून, ती वेगवेगळ्या क्षेत्रात चालते़ करिअरच्या दृष्टिकोनातून सर्व क्षेत्र ही समान आहेत. स्वत:ची ओळख करून घेत त्यानुसार करिअरची निवड करणे, करिअरला आवश्यक गुण स्वत:मध्ये असणेही तितकेच महत्त्वाचे आहे़  चाणक्य मंडळातील यशस्वी विद्यार्थ्यांची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली़ धर्माधिकारी यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांना श्रद्धांजली वाहिली़कागदावर निवड होण्याचे दिवस संपलेशैक्षणिक व व्यावसायिक नोकरीसाठी सुयोग्य व्यक्तीच्या निवडीसाठी जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात़ केवळ कागदावर निवड होण्याचे दिवस आता संपले असून, यापुढे मुलाखत, व्यक्तिमत्त्व विकास चाचणी, तुमचे वागणे-बोलणे, प्रश्नांची उत्तरे येत नसेल तर नाही म्हणण्याचे धारिष्ट्य यावर निवड अवलंबून असते़ दु:खितांचे अश्रू पुसता आले का यावर करिअरची यशस्वीता अवलंबून असल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले़

टॅग्स :Nashikनाशिक