शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कोकणगाव फाट्यावर तिहेरी भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:21 IST

पिंपळगाव बसवंत : मुंबई- आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर असलेल्या शनी मंदिराजवळ गुरुवारी (दि.१८) दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकल्यानंतर बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या तिहेरी भीषण अपघातात बागलाण येथील तरुणी जागीच ठार झाली असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देतरुणी ठार : चार गंभीर जखमी, कार चक्काचूर

पिंपळगाव बसवंत : मुंबई- आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर असलेल्या शनी मंदिराजवळ गुरुवारी (दि.१८) दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकल्यानंतर बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या तिहेरी भीषण अपघातात बागलाण येथील तरुणी जागीच ठार झाली असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहून बागलाणच्या दिशेने जाणाऱ्या टाटा टॅगो कार (क्र. एमएच-०५ डीएच-९३५७) चालकाला कोकणगाव येथील शनी मंदिराजवळ नादुरुस्त असलेल्या ट्रकचा (क्र. एमएच-१५ बीजे-३३५५) अंदाज न आल्याने त्याने ट्रकला कट मारला. त्यातून चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुसऱ्या लेनला गेली असता मागून येणाऱ्या चाळीसगाव डेपोच्या एसटी बसने (क्र. एमएच-२० बीएल-२४१०) कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे कार महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकली गेल्याने कारमधील मुंबई येथे कार्यरत असलेले व बागलाण तालुक्यातील बाभुळना येथील रहिवासी पोलीस हवालदार पंडित बाबूराव चौरे (४७), पत्नी वैशाली पंडित चौरे (३९), मुलगा सागर पंडित चौरे (२२), चालक संजय बागूल (४२) हे गंभीर जखमी झाले, तर मुलगी मयुरी पंडित चौरे (१८) हिचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तीन वाहनांच्या झालेल्या अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक निकुंभ, पवार आदी करत आहेत.टोल प्रशासनाची दिरंगाईमहामार्गावर अपघात घडला अथवा एखादे वाहन रस्त्यातच नादुरुस्त झाले, तर त्याठिकाणी तात्काळ टोल प्रशासन सेवा पुरवत असते. नादुरुस्त वाहनाच्या आजूबाजूला बॅरिकेडस्‌ लावणे, ते वाहन जर महामार्गाच्या मधोमध असेल, तर टोचन करून ते रस्त्याच्या कडेला उभे करणे, अशी टोल प्रशासनाकडून अपेक्षा असते. मात्र, टोलनाक्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर ट्रक नादुरुस्त होऊनही टोलनाका प्रशासनाने त्यासंबंधी काहीही कार्यवाही न केल्याने अशा अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू