शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

‘त्या’ दोघा महंतांना त्र्यंबकेश्वरी समाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:26 IST

श्री मौनीबाबा मठाचे कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज (७०) आणि त्यांचे कांदिवलीस्थित शिष्य सुशीलगिरी महाराज (३०) यांच्यासह त्यांचे वाहनचालक नीलेश तेलवडे (३०) ह्या तिघांची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर दोघा महंतांना आखाड्याच्या नियमानुसार रविवारी (दि.१९) रात्री उशिरा समाधिस्त करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा साधू-महंतांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्देहत्येचे तीव्र पडसाद : कारवाईची मागणी

त्र्यंबकेश्वर : येथील श्री मौनीबाबा मठाचे कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज (७०) आणि त्यांचे कांदिवलीस्थित शिष्य सुशीलगिरी महाराज (३०) यांच्यासह त्यांचे वाहनचालक नीलेश तेलवडे (३०) ह्या तिघांची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर दोघा महंतांना आखाड्याच्या नियमानुसार रविवारी (दि.१९) रात्री उशिरा समाधिस्त करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा साधू-महंतांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.त्र्यंबकेश्वर येथील कल्पवृक्षगिरी, सुशीलगिरी आणि नीलेश तेलवडे हे तिघे महाराजांच्या शिष्याच्या अंत्यविधीसाठी सुरत येथे जात असताना डहाणू तालुक्यातील कासाजवळील गडचिंचले गावातील सुमारे २०० ते २५०च्या संख्येने जमलेल्या जमावाने चोर असल्याच्या अफवेतून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत या तिघांना ठार मारले. या घटनेचे तीव्र पडसाद त्र्यंबकेश्वरसह देशभर उमटले. दरम्यान, रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज यांना श्री पंचायती दशनाम जुना तथा भैरव आखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज व महंत सहजानंदगिरी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली आखाड्याच्या नियमानुसार समाधिस्थ करण्यात आले, तर चालक नीलेश तेलवडे यांच्या पार्थिवावर कांदिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.महंत कल्पवृक्षगिरी हे जुना आखाड्याशी संबंधित असल्याने त्यांना समाधी देऊन अंत्यविधी करण्यात आला. पुढील सोपस्कार आखाडा ठरविल त्याप्रमाणे त्यांचे शिष्य किंवा उत्तराधिकारी कोणी असल्यास त्यांना महंत कल्पवृक्षगिरी महाराज यांच्या गादीवर बसविले जाईल. हा सोहळा सोळशीच्या दिवशी होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, समाधिप्रसंगी दहा पंचायती आखाड्याचे व गोरक्षनाथ मठाचे संत महात्मा सोशल डिस्टिन्संगच्या कारणामुळे एकत्र जमा झाले नाही....तर नागा साधूंचा मुख्यमंत्र्यांना घेरावया हत्या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. जर कारवाई होणार नसेल तर नागा साधू घेऊन मुख्यमंत्र्यांना घेराव घातला जाईल. प्रसंगी त्या गावातही नागा साधू जाऊन पोहोचतील. या निंदनीय घटनेचा मी निषेध करतो. असे वाराणसीस्थित अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज यांनी म्हटले आहे.या दुर्दैवी घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे झाली असून, साधू-महात्मा पोलिसांच्या आधाराने जात असताना पोलिसाने आपला हात सोडवून घेतला ही बाब योग्य नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे.- श्री स्वामी सागरानंद सरस्वती, अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर षड्दर्शन अखाडा परिषद

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस