शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘त्या’ दोघा महंतांना त्र्यंबकेश्वरी समाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:26 IST

श्री मौनीबाबा मठाचे कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज (७०) आणि त्यांचे कांदिवलीस्थित शिष्य सुशीलगिरी महाराज (३०) यांच्यासह त्यांचे वाहनचालक नीलेश तेलवडे (३०) ह्या तिघांची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर दोघा महंतांना आखाड्याच्या नियमानुसार रविवारी (दि.१९) रात्री उशिरा समाधिस्त करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा साधू-महंतांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्देहत्येचे तीव्र पडसाद : कारवाईची मागणी

त्र्यंबकेश्वर : येथील श्री मौनीबाबा मठाचे कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज (७०) आणि त्यांचे कांदिवलीस्थित शिष्य सुशीलगिरी महाराज (३०) यांच्यासह त्यांचे वाहनचालक नीलेश तेलवडे (३०) ह्या तिघांची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर दोघा महंतांना आखाड्याच्या नियमानुसार रविवारी (दि.१९) रात्री उशिरा समाधिस्त करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा साधू-महंतांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.त्र्यंबकेश्वर येथील कल्पवृक्षगिरी, सुशीलगिरी आणि नीलेश तेलवडे हे तिघे महाराजांच्या शिष्याच्या अंत्यविधीसाठी सुरत येथे जात असताना डहाणू तालुक्यातील कासाजवळील गडचिंचले गावातील सुमारे २०० ते २५०च्या संख्येने जमलेल्या जमावाने चोर असल्याच्या अफवेतून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत या तिघांना ठार मारले. या घटनेचे तीव्र पडसाद त्र्यंबकेश्वरसह देशभर उमटले. दरम्यान, रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज यांना श्री पंचायती दशनाम जुना तथा भैरव आखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज व महंत सहजानंदगिरी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली आखाड्याच्या नियमानुसार समाधिस्थ करण्यात आले, तर चालक नीलेश तेलवडे यांच्या पार्थिवावर कांदिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.महंत कल्पवृक्षगिरी हे जुना आखाड्याशी संबंधित असल्याने त्यांना समाधी देऊन अंत्यविधी करण्यात आला. पुढील सोपस्कार आखाडा ठरविल त्याप्रमाणे त्यांचे शिष्य किंवा उत्तराधिकारी कोणी असल्यास त्यांना महंत कल्पवृक्षगिरी महाराज यांच्या गादीवर बसविले जाईल. हा सोहळा सोळशीच्या दिवशी होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, समाधिप्रसंगी दहा पंचायती आखाड्याचे व गोरक्षनाथ मठाचे संत महात्मा सोशल डिस्टिन्संगच्या कारणामुळे एकत्र जमा झाले नाही....तर नागा साधूंचा मुख्यमंत्र्यांना घेरावया हत्या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. जर कारवाई होणार नसेल तर नागा साधू घेऊन मुख्यमंत्र्यांना घेराव घातला जाईल. प्रसंगी त्या गावातही नागा साधू जाऊन पोहोचतील. या निंदनीय घटनेचा मी निषेध करतो. असे वाराणसीस्थित अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज यांनी म्हटले आहे.या दुर्दैवी घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे झाली असून, साधू-महात्मा पोलिसांच्या आधाराने जात असताना पोलिसाने आपला हात सोडवून घेतला ही बाब योग्य नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे.- श्री स्वामी सागरानंद सरस्वती, अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर षड्दर्शन अखाडा परिषद

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस