शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

‘त्या’ दोघा महंतांना त्र्यंबकेश्वरी समाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:26 IST

श्री मौनीबाबा मठाचे कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज (७०) आणि त्यांचे कांदिवलीस्थित शिष्य सुशीलगिरी महाराज (३०) यांच्यासह त्यांचे वाहनचालक नीलेश तेलवडे (३०) ह्या तिघांची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर दोघा महंतांना आखाड्याच्या नियमानुसार रविवारी (दि.१९) रात्री उशिरा समाधिस्त करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा साधू-महंतांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्देहत्येचे तीव्र पडसाद : कारवाईची मागणी

त्र्यंबकेश्वर : येथील श्री मौनीबाबा मठाचे कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज (७०) आणि त्यांचे कांदिवलीस्थित शिष्य सुशीलगिरी महाराज (३०) यांच्यासह त्यांचे वाहनचालक नीलेश तेलवडे (३०) ह्या तिघांची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर दोघा महंतांना आखाड्याच्या नियमानुसार रविवारी (दि.१९) रात्री उशिरा समाधिस्त करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा साधू-महंतांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.त्र्यंबकेश्वर येथील कल्पवृक्षगिरी, सुशीलगिरी आणि नीलेश तेलवडे हे तिघे महाराजांच्या शिष्याच्या अंत्यविधीसाठी सुरत येथे जात असताना डहाणू तालुक्यातील कासाजवळील गडचिंचले गावातील सुमारे २०० ते २५०च्या संख्येने जमलेल्या जमावाने चोर असल्याच्या अफवेतून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत या तिघांना ठार मारले. या घटनेचे तीव्र पडसाद त्र्यंबकेश्वरसह देशभर उमटले. दरम्यान, रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज यांना श्री पंचायती दशनाम जुना तथा भैरव आखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज व महंत सहजानंदगिरी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली आखाड्याच्या नियमानुसार समाधिस्थ करण्यात आले, तर चालक नीलेश तेलवडे यांच्या पार्थिवावर कांदिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.महंत कल्पवृक्षगिरी हे जुना आखाड्याशी संबंधित असल्याने त्यांना समाधी देऊन अंत्यविधी करण्यात आला. पुढील सोपस्कार आखाडा ठरविल त्याप्रमाणे त्यांचे शिष्य किंवा उत्तराधिकारी कोणी असल्यास त्यांना महंत कल्पवृक्षगिरी महाराज यांच्या गादीवर बसविले जाईल. हा सोहळा सोळशीच्या दिवशी होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, समाधिप्रसंगी दहा पंचायती आखाड्याचे व गोरक्षनाथ मठाचे संत महात्मा सोशल डिस्टिन्संगच्या कारणामुळे एकत्र जमा झाले नाही....तर नागा साधूंचा मुख्यमंत्र्यांना घेरावया हत्या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. जर कारवाई होणार नसेल तर नागा साधू घेऊन मुख्यमंत्र्यांना घेराव घातला जाईल. प्रसंगी त्या गावातही नागा साधू जाऊन पोहोचतील. या निंदनीय घटनेचा मी निषेध करतो. असे वाराणसीस्थित अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज यांनी म्हटले आहे.या दुर्दैवी घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे झाली असून, साधू-महात्मा पोलिसांच्या आधाराने जात असताना पोलिसाने आपला हात सोडवून घेतला ही बाब योग्य नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे.- श्री स्वामी सागरानंद सरस्वती, अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर षड्दर्शन अखाडा परिषद

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस