शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

टॅँकरचा प्रस्ताव देऊनही त्र्यंबकेश्वर तालुका अद्याप तहानलेलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:36 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई सुरु आहे. ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. वारंवार मागणी करु नही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करूनही अद्याप टँकरने पाणी मिळत नाही. त्यामुळे तहानलेल्या सोमनाथनगर, होलदार नगर, शिवाजीनगर, मूलवड, मुरंबी, विनायकनगर, देवळा, मेटघर किल्ला व सहा पाडे आदींसह या गावांना प्राधान्याने पिण्याच्या ...

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई सुरु आहे. ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. वारंवार मागणी करु नही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करूनही अद्याप टँकरने पाणी मिळत नाही. त्यामुळे तहानलेल्या सोमनाथनगर, होलदार नगर, शिवाजीनगर, मूलवड, मुरंबी, विनायकनगर, देवळा, मेटघर किल्ला व सहा पाडे आदींसह या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर किंवा अन्य उपाययोजना उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रु पांजली माळेकर यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात कळविले आहे. दोन महिन्यांपुर्वीच सोमनाथनगर येथील ग्रामसेवकांनी पाणी टंचाईचा प्रस्ताव सादर केला असतांना तो लालफितीत अडकल्याने गावकºयांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करु नही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टंचाई शाखेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांचे पाणी टंचाई प्रस्ताव दाखल झालेले आहेत. मात्र अद्याप पाणी टंचाई टँकर सुरु न झाल्याने जनता मेटाकुटीला आली आहे. माळेकर यांनी हरसूल गटात पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्राचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईचा उल्लेख केला आहे. दिवसागणिक परिस्थिती भीषण होत आहे. या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडून ही मार्चनंतर पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. त्यामुळे विविध गावांतुन टँकरची मागणी आल्यानंतर तातडीने टँकरला मंजूरी देण्याची आवश्यकता असते. मात्र,तालुका प्रशासनाकडून पाणी टंचाई प्रस्ताव छोट्या छोट्या कारणांनी फेटाळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेक दिवस हे प्रस्ताव प्रलंबित राहतात. नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.----------------जलयुक्त शिवार योजनेबाबत विचारणागावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश आहे. जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे का ? अशी विचारणा करून प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. कालापव्यय केला जात आहे, यात ग्रामसेवक शासनाचा प्रतिनिधी असल्याने त्यांनी दिलेला पाणी टंचाई प्रस्ताव ग्राह्य धरला जावा जेणे करु न गाव पातळीवरु न जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव येण्यास विलंब होणार नाही. मात्र आलेल्या प्रस्तावाची खातरजमा करण्यासाठी तहसिलदार गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता आदींची समिती प्रस्ताव खरा की खोटा याची खातरजमा करण्यासाठी व्हेरीफिकेशन नाट्य घालुन नाहक कालापव्यय केला जातो. यास्तव गावकºयांना लवकर पाणी मिळावे व टँकर लवकरात लवकर सुुरु करावेत अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक