शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

टॅँकरचा प्रस्ताव देऊनही त्र्यंबकेश्वर तालुका अद्याप तहानलेलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:36 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई सुरु आहे. ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. वारंवार मागणी करु नही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करूनही अद्याप टँकरने पाणी मिळत नाही. त्यामुळे तहानलेल्या सोमनाथनगर, होलदार नगर, शिवाजीनगर, मूलवड, मुरंबी, विनायकनगर, देवळा, मेटघर किल्ला व सहा पाडे आदींसह या गावांना प्राधान्याने पिण्याच्या ...

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई सुरु आहे. ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. वारंवार मागणी करु नही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करूनही अद्याप टँकरने पाणी मिळत नाही. त्यामुळे तहानलेल्या सोमनाथनगर, होलदार नगर, शिवाजीनगर, मूलवड, मुरंबी, विनायकनगर, देवळा, मेटघर किल्ला व सहा पाडे आदींसह या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर किंवा अन्य उपाययोजना उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रु पांजली माळेकर यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात कळविले आहे. दोन महिन्यांपुर्वीच सोमनाथनगर येथील ग्रामसेवकांनी पाणी टंचाईचा प्रस्ताव सादर केला असतांना तो लालफितीत अडकल्याने गावकºयांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करु नही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टंचाई शाखेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांचे पाणी टंचाई प्रस्ताव दाखल झालेले आहेत. मात्र अद्याप पाणी टंचाई टँकर सुरु न झाल्याने जनता मेटाकुटीला आली आहे. माळेकर यांनी हरसूल गटात पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्राचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईचा उल्लेख केला आहे. दिवसागणिक परिस्थिती भीषण होत आहे. या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडून ही मार्चनंतर पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. त्यामुळे विविध गावांतुन टँकरची मागणी आल्यानंतर तातडीने टँकरला मंजूरी देण्याची आवश्यकता असते. मात्र,तालुका प्रशासनाकडून पाणी टंचाई प्रस्ताव छोट्या छोट्या कारणांनी फेटाळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेक दिवस हे प्रस्ताव प्रलंबित राहतात. नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.----------------जलयुक्त शिवार योजनेबाबत विचारणागावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश आहे. जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे का ? अशी विचारणा करून प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. कालापव्यय केला जात आहे, यात ग्रामसेवक शासनाचा प्रतिनिधी असल्याने त्यांनी दिलेला पाणी टंचाई प्रस्ताव ग्राह्य धरला जावा जेणे करु न गाव पातळीवरु न जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव येण्यास विलंब होणार नाही. मात्र आलेल्या प्रस्तावाची खातरजमा करण्यासाठी तहसिलदार गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता आदींची समिती प्रस्ताव खरा की खोटा याची खातरजमा करण्यासाठी व्हेरीफिकेशन नाट्य घालुन नाहक कालापव्यय केला जातो. यास्तव गावकºयांना लवकर पाणी मिळावे व टँकर लवकरात लवकर सुुरु करावेत अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक