शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:12 IST

त्र्यंबकेश्वर : गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर शहरात हजेरी लावली. सोमवारी (दि. २५) दिवसभर संततधार होती. रविवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजेपासून सोमवारी सकाळी झालेल्या २४ तासांत एकूण ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ३२ मिमी व सोमवारी झालेला ४१ मिमी असा एकूण ७३ मिमी पाऊस जून महिन्याच्या उत्तरार्धात झाला आहे. आजही पावसाचे सातत्य आहे. शेतकामांना वेग आला आहे.

ठळक मुद्देशेतकामांना वेग दोन दिवसात ४१ मिमी पावसाची नोंद

त्र्यंबकेश्वर : गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर शहरात हजेरी लावली. सोमवारी (दि. २५) दिवसभर संततधार होती. रविवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजेपासून सोमवारी सकाळी झालेल्या २४ तासांत एकूण ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ३२ मिमी व सोमवारी झालेला ४१ मिमी असा एकूण ७३ मिमी पाऊस जून महिन्याच्या उत्तरार्धात झाला आहे. आजही पावसाचे सातत्य आहे. शेतकामांना वेग आला आहे.तालुक्यात रोहिणी नक्षत्राने एकदाही हजेरी लावली नाही, तर मृग नक्षत्र संपूर्ण कोरडे गेले. रविवारपासून मात्र पावसाने सातत्य राखले आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना लागवडीसाठी आता पैशांची आवश्यकता भासू लागल्याने राष्ट्रीय बँकांमध्ये शेतकºयांच्या चकरा सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकºयांनी पेरणीची प्राथमिक कामे पूर्ण करण्यास वेग दिला आहे. काहींनी अगोदर पेरणी केल्याने त्यांच्या भाताची रोपे सहा इंचांपेक्षा मोठी झाली आहेत. असाच पाऊस राहिल्यास शेतकरी पुढील आठवड्यात आवणीदेखील आटोपतील.सध्या पाऊस सुरू असल्याने लोकांच्या छत्र्या, रेनकोट आदी बाहेर येत आहेत. पावसापासून संरक्षण करणाºया वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात झुंबड उडाली आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन प्रकारच्या छत्र्या, रेनकोट येत आहेत. त्यामुळे ग्राहक लगेच आकर्षित होत असतो.तालुक्यात विविध जातीची भात बियाणे, खते आदी उपलब्ध आहेत. काही शेतकरी खास पेरणीसाठी बियाणे राखून ठेवतात. आवणीसाठी दरदिवशी अडीचशे ते तीनशे रुपये हजेरी आहे. याशिवाय औतकरी किंवा भाड्याने ट्रॅक्टर लावला तर त्याला तासाच्या हिशेबाने पैसे द्यावे लागतात. हल्ली बैलांच्या माध्यमाने औताने शेती नांगरण्याचा प्रकार मागे पडत चालला आहे. आता यांत्रिकी शेतीकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. तरीही अनेकजण अजूनही बैलांच्या नांगरानेच शेती करतात. ट्रॅक्टर घ्यायची ऐपत असूनही काही शेतकºयांनी मुद्दाम बैल पदरी ठेवले आहेत.उमराळेनजीक पहिल्याच पावसात लालपरी घसरली पेठ : शहरासह तालुक्यात सोमवारी पहाटेपासून दमदार पाऊस सुरू असून, पहिल्याच पावसात रस्त्यांची वाट लागली आहे. पेठ-नाशिक रस्त्यावर बस घसरून अपघात झाल्याने याची प्रचिती आली. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. नाशिकहून सकाळी येणारी जनता बस (क्र . एमएच २० डी ९३४१) उमराळेजवळ नवीन रस्त्याचे काम सुरू असल्याने कच्च्या रस्त्यावरून जात असताना घसरली. यामुळे बसमधील प्रवासी एकमेकांवर जाऊन आदळल्याने किरकोळ जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही. पहिल्याच पावसात तालुक्यातील बत्ती गुल झाल्याने तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. जीर्ण झालेले खांब व लोंबकळणाºया वीजवाहिन्या यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरात समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाला आहे. परिसरात भात व नागलीची पेरणी जोमात सुरू असून, पावसाने बळीराजा सुखावला आहे.