शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

त्र्यंबकेश्वरला भात आवणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:12 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या भात खोचणी व भात आवणीची कामे सुरू झाली असून, ज्यांची भाताची रोपे खणणी जोगी झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देखोचणी सुरू : तालुका परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीकामांना प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या भात खोचणी व भात आवणीची कामे सुरू झाली असून, ज्यांची भाताची रोपे खणणी जोगी झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला आहे. तरीही तालुका कृषी कार्यालयाने भात, नागली, वरई, उडीद, खुरसणी व अन्य खरीप पिकांसाठी निश्चित केलेल्या व प्रत्येक धान्याच्या लागवडीसाठी जे क्षेत्र निश्चित केले आहे, तेवढ्या क्षेत्रा इतकी पेरणी अद्याप झालेली नाही.त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत भाताची १०२२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यात त्र्यंबक मंडलमध्ये ३५८, हरसूल मंडल १ मध्ये ४०८ हेक्टर, हरसूल २ मध्ये २५५ हेक्टर, नागली सर्वसाधारण क्षेत्र ४०२९ हेक्टर आहे. त्यापैकी त्र्यंबकेश्वर मंडलमध्ये १४४हेक्टर, हरसूल १ मध्ये १६४ हेक्टर, हरसूल २ हेक्टर, १०३ हेक्टर अशी एकूण ४१० हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.वरईचे सर्वसाधारण क्षेत्र ३५२७ हेक्टर आहे. त्यापैकी त्र्यंबकेश्वर १२६ हेक्टर, हरसूल १ मध्ये १४४ हेक्टर, अशी एकूण ३६० हेक्टर क्षेत्रात हरसूल १ ची पेरणी पूर्ण झाली आहे. हरसूल २ मंडलमध्ये ९० हेक्टर मिळून हरसूल दोनमध्ये एकूण ३६० हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.उडीद सर्वसाधारण क्षेत्र १६४८ हेक्टर त्यापैकी त्र्यंबकेश्वर मंडलमध्ये ३२ हेक्टरमध्ये पूर्ण, हरसूल १ मंडलमध्ये ३६ हेक्टर, तर हरसूल २ मध्ये २३ हेक्टर अशी ९० टक्के पेरणी उडिदाची झाली आहे.थोडक्यात तालुक्यात भात १०२२ हेक्टर, नागली ४१० हेक्टर, वरई ३६० हेक्टर, तर उडीद ९० हेक्टर अशी एकूण पेरणी झाली आहे.कृषी विभागातर्फे रोपवाटिकात्र्यंबकेश्वर तालुक्यात मुख्यत्वे वरील चारच पिके सातत्याने घेतली जातात. आदिवासी भागात उडीद दाळ लाकप्रिय कडधान्य आहे. तसेच नागलीची भाकरी व वरई प्रामुख्याने भगर करण्यासाठी काही प्रमाणात भाकरीही केली जाते. भगरीचा भात उपवासासाठीदेखील वापरतात. नागलीला तर खूपच मागणी असते. हॉटेलमध्ये तर नागलीच्या पापडाला भाकरीला खूपच मागणी असते. या भागातील इंद्रायणी तांदूळ, १००८ तांदूळ (जिरा राइस) कमोद आदी उच्च प्रकारचा तांदूळ पिकविला जातो. इगतपुरीच्या खालोखाल भात पिकविण्यात त्र्यंबकेश्वर तालुक्याचा नंबर लागतो. ही जी पेरणी झाली ती रोपवाटिकाद्वारे (जमीन भाजून पेरणी करून रोपे तयार केली जातात. त्यास कृषी विभागाने रोपवाटिका असे नाव दिले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती