शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर पालिका निवडणूक आख्यान : प्रतिष्ठेच्या मोहापायी वाहते नोटांची गंगा कुशावर्तगावी ‘अर्थ’तीर्थ; ‘भाव’ समजोनी घ्यावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:40 IST

शहराची लोकसंख्या जेमतेम ११ हजार, वर्षाचे अंदाजपत्रक १३ कोटी, क्षेत्रफळ तर एखाद्या ग्रामपंचायतीचे असावे इतके छोटे, उत्पन्नाचे स्रोतही मर्यादित; परंतु तरीही निवडणूक म्हटली की होणारा खर्च तोंडात बोटे घालायला लावणारा.

ठळक मुद्देनिवडणूक विकासापेक्षा आर्थिक मुद्द्यांभोवतीच पंचवीस हजार रुपये भाव फोडला

त्र्यंबकेश्वर : शहराची लोकसंख्या जेमतेम ११ हजार, वर्षाचे अंदाजपत्रक १३ कोटी, क्षेत्रफळ तर एखाद्या ग्रामपंचायतीचे असावे इतके छोटे, उत्पन्नाचे स्रोतही मर्यादित; परंतु तरीही निवडणूक म्हटली की होणारा खर्च तोंडात बोटे घालायला लावणारा... ज्या ब्रह्मगिरीतून गोदावरी नदी उगम पावली, तेथेच आर्थिक गंगाही इतकी प्रवाही असल्याचे बघून भलेभलेही थक्क व्हावे आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतील खर्चिक उमेदवारांनी माघार घ्यावी अशा खर्चाची क्षमता असलेले उमेदवार, त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणूक समस्या आणि विकासापेक्षा आर्थिक मुद्द्यांभोवतीच फिरत असून, भाव किती फुटणार याचीच चर्चा अधिक असते.विशेषत: गेल्या काही दिवसांतच उमेदवारांनी हात ढिले सोडल्याने सात हजार रुपये प्रति मत असा सांप्रतचा भाव चर्चेत असून, मतदानाच्या दिवशी हा भाव आणखीनच वधारेल, असे स्थानिक जाणकार सांगत आहेत. गेल्यावेळी एका वॉर्डात एका उमेदवाराने अखेरच्या तीन तासांत पंचवीस हजार रुपये असा भाव फोडला होता. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी मार्केट किती वाढेल हे सांगणे कठीण आहे, असे काही नागरिक सांगतात. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र असल्यानेच क्षमता नसतानाही येथे नगरपालिका स्थापन झाली. पुरेशी लोकसंख्या नाही आणि केवळ धार्मिक पर्यटन यावरच गावाचे अर्थकारण असल्याने नगरपालिकेला कधीही उत्पन्नाचे स्रोत सापडले नाही. परंतु स्थानिक स्तरावर मात्र धार्मिक पर्यटनातून पैसा खेळू लागला आहे. ही आर्थिक समृद्धी अनेकांच्या डोळ्यात खुपणारी असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत असले तरी तीच निवडणुकीत समृद्धी निर्माण करणारी ठरते. गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या जमिनींना भाव आल्याने त्याचे व्यवहार करणारेदेखील राजकारणात पैसा गुंतवू लागले आणि त्यामुळे प्रतिष्ठेच्या मोहापायी निवडणुकीत नोटांची गंगा वाहू लागली. गेल्या दोन ते तीन निवडणुकीत हे चित्र पार पालटून गेले आहे. त्र्यंबकमधील उमेदवारांची ही समृद्धी प्रमुख राजकीय पक्षांच्या इतकी पथ्यावर पडली आहे की, यंदा तर प्रत्येक उमेदवाराला खर्च किती करणार अशा बोली लावूनच उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातून निष्ठावंतांत न्याय आणि अन्यायाच्या भावना खदखदत असून, निवडणुकीत हेच उट्टे काढण्यासाठी सज्ज असल्याने निवडणुकीचे निकाल काही प्रमाणात तरी आर्थिक व्यवहारापलीकडे उलटफेर करणारे ठरू शकतात, असेही येथील जाणकार सांगतात. निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यापासूनच त्र्यंबकेश्वरात मतदारांची चांदी होण्यास सुरुवात झाली.दिवाळी भेटीचे निमित्त करून सुगंधित उटणे, साबण, अत्तराच्या फायापासून महागड्या साड्यांपर्यंत भेट म्हणून देण्यास सुरुवातझाली आहे. त्यानंतर आता तर निवडणुकीत उमेदवार मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी मांडलेल्या लिलावाचे आकडेही थक्क करणारे ठरत आहेत.