शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

त्र्यंबकेश्वर पालिका निवडणूक आख्यान : प्रतिष्ठेच्या मोहापायी वाहते नोटांची गंगा कुशावर्तगावी ‘अर्थ’तीर्थ; ‘भाव’ समजोनी घ्यावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:40 IST

शहराची लोकसंख्या जेमतेम ११ हजार, वर्षाचे अंदाजपत्रक १३ कोटी, क्षेत्रफळ तर एखाद्या ग्रामपंचायतीचे असावे इतके छोटे, उत्पन्नाचे स्रोतही मर्यादित; परंतु तरीही निवडणूक म्हटली की होणारा खर्च तोंडात बोटे घालायला लावणारा.

ठळक मुद्देनिवडणूक विकासापेक्षा आर्थिक मुद्द्यांभोवतीच पंचवीस हजार रुपये भाव फोडला

त्र्यंबकेश्वर : शहराची लोकसंख्या जेमतेम ११ हजार, वर्षाचे अंदाजपत्रक १३ कोटी, क्षेत्रफळ तर एखाद्या ग्रामपंचायतीचे असावे इतके छोटे, उत्पन्नाचे स्रोतही मर्यादित; परंतु तरीही निवडणूक म्हटली की होणारा खर्च तोंडात बोटे घालायला लावणारा... ज्या ब्रह्मगिरीतून गोदावरी नदी उगम पावली, तेथेच आर्थिक गंगाही इतकी प्रवाही असल्याचे बघून भलेभलेही थक्क व्हावे आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतील खर्चिक उमेदवारांनी माघार घ्यावी अशा खर्चाची क्षमता असलेले उमेदवार, त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणूक समस्या आणि विकासापेक्षा आर्थिक मुद्द्यांभोवतीच फिरत असून, भाव किती फुटणार याचीच चर्चा अधिक असते.विशेषत: गेल्या काही दिवसांतच उमेदवारांनी हात ढिले सोडल्याने सात हजार रुपये प्रति मत असा सांप्रतचा भाव चर्चेत असून, मतदानाच्या दिवशी हा भाव आणखीनच वधारेल, असे स्थानिक जाणकार सांगत आहेत. गेल्यावेळी एका वॉर्डात एका उमेदवाराने अखेरच्या तीन तासांत पंचवीस हजार रुपये असा भाव फोडला होता. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी मार्केट किती वाढेल हे सांगणे कठीण आहे, असे काही नागरिक सांगतात. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र असल्यानेच क्षमता नसतानाही येथे नगरपालिका स्थापन झाली. पुरेशी लोकसंख्या नाही आणि केवळ धार्मिक पर्यटन यावरच गावाचे अर्थकारण असल्याने नगरपालिकेला कधीही उत्पन्नाचे स्रोत सापडले नाही. परंतु स्थानिक स्तरावर मात्र धार्मिक पर्यटनातून पैसा खेळू लागला आहे. ही आर्थिक समृद्धी अनेकांच्या डोळ्यात खुपणारी असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत असले तरी तीच निवडणुकीत समृद्धी निर्माण करणारी ठरते. गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या जमिनींना भाव आल्याने त्याचे व्यवहार करणारेदेखील राजकारणात पैसा गुंतवू लागले आणि त्यामुळे प्रतिष्ठेच्या मोहापायी निवडणुकीत नोटांची गंगा वाहू लागली. गेल्या दोन ते तीन निवडणुकीत हे चित्र पार पालटून गेले आहे. त्र्यंबकमधील उमेदवारांची ही समृद्धी प्रमुख राजकीय पक्षांच्या इतकी पथ्यावर पडली आहे की, यंदा तर प्रत्येक उमेदवाराला खर्च किती करणार अशा बोली लावूनच उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातून निष्ठावंतांत न्याय आणि अन्यायाच्या भावना खदखदत असून, निवडणुकीत हेच उट्टे काढण्यासाठी सज्ज असल्याने निवडणुकीचे निकाल काही प्रमाणात तरी आर्थिक व्यवहारापलीकडे उलटफेर करणारे ठरू शकतात, असेही येथील जाणकार सांगतात. निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यापासूनच त्र्यंबकेश्वरात मतदारांची चांदी होण्यास सुरुवात झाली.दिवाळी भेटीचे निमित्त करून सुगंधित उटणे, साबण, अत्तराच्या फायापासून महागड्या साड्यांपर्यंत भेट म्हणून देण्यास सुरुवातझाली आहे. त्यानंतर आता तर निवडणुकीत उमेदवार मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी मांडलेल्या लिलावाचे आकडेही थक्क करणारे ठरत आहेत.